मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

सावरकर आक्षेप आणि खंडन




आता परवा २६ फेब्रुवारीला मी "कल्याण येथे क्षीतज ग्रुप "
आयोजित सावरकर ग्रंथ प्रदर्शन आणि दुर्मिळ फोटोंच प्रदर्शन भरवलं होत
त्या मी छोटे खाणी भाषण ठोकलं त्यात मी मझ्या परीने

श्री.सावरकरांवरील आक्षेपांच खंडन केल
त्याचा त्याचा काही भाग,,,,
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मी बोलाव ईतका मी मोठा नाही पण उद्याच्या
येणाऱ्या पिढीला जर सावरकर समजले नाहीत तर
पुन्हा सावरकरांचा दादोजी कोंडदेवां नंतर नंबर असेल
असो,
मध्यंतरी जेव्हा संसदेत सावरकरांच्या तैल्चीत्रावरून जो गोंधळ घातला गेला
त्यात विरोधकांनी सांगितलं कि म्हणे सावरकरांची अशी काही पत्र
उपलब्ध आहेत त्यात त्यांनी चक्क ईन्ग्र्ज सरकारची माफी मागितली आहे
कि "मायबाप सरकार मी चुकलो हा स्वराज्याचा उद्योग माझ्या हातून पुन्हा
होणार नाही मला सोडा वैगेरे वैगेरे,,,,,
_________________________________________
येथे जरा मागे ईतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल
जेव्हा आदिलशहाने हरामखोर बाजी घोर्पड्याच्या मदतीने दगाबाजीने जेव्हा
शहाजी राजांना अटक केली त्याही वेळी ,,,
शिवाजी राजांनी महाराष्ट्रात आलेल्या "शहाजहानच्या" मुलाला "शहजादा मुरादला " भेटून
त्याला पत्र धाडून विनवणी केली कि,
"मी आणि माझे वडील शहाजी राजे आपल्या दरबारात हजार होवून
आपल्याला कुर्निसात करायला तयार आहोत
शहाजहान राजा शाजी राजना पुरता ओळखून होता कारण
हा शाजाहन जेव्हा महाराष्ट्रावर ८० हजारांची फौज घेवून आला होता
तेव्हा याच शहाजी राजांनी त्याला पराभूत केला होता
त्यामुळे लगेचच शहजादा मुरादच्या हातून आदिलशाला पत्र गेल
आणि त्याला शहाजी राजाला सोडव लागल ,,,,,
अर्थातच पत्रातील भाषा आणि महाराजंच वागण
हे दोन्ही वेगळ होत उलट त्या नंतर महाराजांच्या कारवाया अधिक वाढल्या
_________________________
"युद्धनीती आहे हि "
युद्धात वेळप्रसंगी खोट बोलाव लागत आणि प्रेमात हि ,,,
अरे म्हणून तर येथे व्ह्यालेनटाइन जोशात साजरा होतो खोटच बोलायचं असत ,
"या वर्षी ती त्या वर्षी ती" ,"तू नाही और सही और नाही और सही"
असो सांगायचा मुद्दा असा
युद्धात वेळ प्रसंगी खोट बोलाव लागत आणि महाराजांनी तेच म्हणून
महाराज खोटारडे नाही ठरत ,,,,
दुसर्या एका प्रसंगात "अफजलखान वधात"
तेव्हा हि महाराजांनी अफझलखानाला अशीच पत्र पाठवून
गोड बोलून त्याला जावळीच्या खोर्यात बोलावलं आणि
मग त्याचा वध केला ,,,,
का त्याला खर खर सांगायचं होत कि,
"अफझुल्या साल्या ये तुंला मारायची मी जय्यत तयारी केली आहे
वाघ नख तयार ठेवलीत तुझा कोथळा काढायला "
चालल असता का ते? अशी खोटी खोटी पत्र लिहावी लागतात ,,,
________________________
तेव्हा ज्याला "राजकारण "युध्दकारण" कळत नाही त्याने
सावरकरांवर आक्षेप घेवू नये ,,,,,
सावरकरही जे बोलले तसे वागलेच नाही हे सर्वश्रुत आहे
त्यामुळे ती पत्र खोटी होती हेच सिध्द होत,,,
अरे वयाच्या २३ वर्षी जो माणूस इंग्लंडला जातो
बॉम्ब बनवतो, पिस्तुल गोळा करतो, ती स्वतः चालतो ती चालवायच
प्रशिक्षण देतो
तुम्हाला पिस्तुल उडवायचं सोडा हाताळायच कस ते तरी माहित आहे का?
पिस्तुल उडवण म्हणजे पतंग उडवण्या ईतक सोप्प आहे का?
१८५७ सारखा ग्रंथ लिहितो ,,,
बर ईतक्या वर थांबतील ते विद्वान कसले,,,?
ते तत्काळ म्हणाले,
बर बर पण सावरकरांचं चित्र लावायचं म्हणताय
पण त्यांच्या पावलावर पावूल टाकण जमणार आहे काय?
हे विचारतय कोण तर गांधी वादी,,,?
ज्या गांधीने आयुष्य वेचल दारू बंदी साठी त्या गांधी हे चेले
ह्याचा दिवस उजाडत नाही आणि मावळत हि नाही दारू पिल्याशिवाय,,,,
वर रामदास फुटाणे सारखे कोन्ग्रेस्सी चारोळ्या करून त्यांची
थट्टाच उडवतात रामदास फुटाणे म्हणतात,
"सरकारने लोकांना मुद्दामच दारूबाज केले
ड्राय-डे मुळे कळले महात्मा गांधी आज गेले"
हि त्या गांधी शोकांतिका केव्हा तर पुण्यतिथीला,,,,
पावलावर पावूल टाकण ईतका सोप्प असत का महाराजा ?
पण संसदेत त्याचं तैलचित्र पाहून काही अंशी चुकीच वागताना
लाज तरी वाटेल
__________________
ज्या पायांवर डोक ठेवाव असे खूप कमी पाय या महाराष्ट्रात जन्माला आले
त्या सावरकरांच्या पावलावर डोक ठेवून गुंज भर तरी नेते मंडळी
पापमुक्त होतील वाईट वागताना निदान १० वेळा तरी विचार करतील?
फोटो त्यासाठी हवा ,,,,
सावरकर जेव्हा ईंग्रजांना लिहितात
कि मला सोडा ,,माझ्या हातून देशसेवे सारखी घोडचूक झाली
ती पुन्हा होणार नाही तेव्हा लक्षात घ्या हे सर खोट खोट
स्वतःची सुटका करवून घेण्यासाठी होत ते त्यांना काही सुटका करवून घेवून
स्वतःच्या संसाराचा गाडा नव्हता चालवायचा ,,,,
तर देशाचा संसार त्यांच्या समोर हात जोडून उभा होता
आणि त्या संसाराचा गाडा समर्थ पणे ओढून त्यांनी
स्वतःच नाव सार्थ केल आपल्या देशाला त्यांच्या "दोन्ही करांनी "
सावरून धरल ते सावरकर

-- राम प्रहार यांच्या ब्लॉग वरुन साभार

समर्थ रामदास स्वामी हे छ. शिवरायांच्या भोसले घराण्याचे गुरु असल्याचे काही पुरावे -



१) महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्या पदरी तारो गोपाळ नावाचा कारकून होता. त्याला आज्ञा करून राजेंनी समर्थांच्या अनेक ग्रंथांच्या प्रती शके १५९६ ते १६०६ या दरम्यान तयार करून घेतल्या (या प्रती आजही तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात आहेत) त्यापैकी दासबोधाची प्रत कल्याण स्वामी यांचे लहान बंधू दत्तात्रेय स्वामी यांनी लिहिलेल्या व ग्वाल्हेर येथील प्रतींशी तंतोतंत जुळते.

२) भोसले घराण्याचे सध्याचे जे वंशज तंजावर येथे राहतात त्यांच्या नित्यपुजेत दासबोध हा ग्रंथ असून तो सोनेरी शाईने लिहिलेला आहे.

३) शिवरायांच्या वंशजांपैकी नागपूरचे वंशज हे देखील समर्थ भक्त आहेत आणि त्यांच्या देवघरात समर्थ रामदासांची पंचधातूंची मूर्ती पहावयास मिळते.

४) सातारा गादीचे वंशज देखील दर वर्षी न चुकता गुरुगादी म्हणून सज्जनगडावरील समर्थ मठास भेट देतात व समर्थांपुढे नतमस्तक होतात.

५) ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व गड-कोट पडण्यास सुरुवात केली...याबाबत त्यांनी तत्कालीन छत्रपती श्री प्रतापसिंह महाराज (छ. शाहू महाराजांचे वडील) यांना कळविले. याचा छत्रपती प्रतापसिंहांच्या उत्तर पेशवाईतील एका रोजनिशीमध्ये उल्लेख असा आहे की “इंग्रजांनी रंगो बापु करवी गड-कोट पाडण्यासंबंधी विचारले असता राजे म्हणाले – ...….२ गडांना तसवीस देऊ नये, १ प्रतापगड आमच्या भवानीदेवीचा व १ गड परळी (सज्जनगड) आमच्या गुरूचा ….” (नोंद-यावेळी इंग्रजांनी बहुतांश राज्य गिळंकृत केले होते)
यावरून हेच सिद्ध होते कि छ. प्रतापसिंह महाराज सुद्धा समर्थांना भोसले घराण्याचे गुरु मानत होते.

६) "छत्रपती शिवाजी" या काशिनाथ गोविंद जोगळेकर यांनी हिंदीतून लिहिलेल्या ग्रंथात एक उल्लेख आहे कि शिवाजी महाराज हे संत तुकाराम आणि संत रामदास यांचे भक्त होते. (पान क्र. २- भूमिका)

७) समर्थांनी महाराजांना दिलेला संदेश आहे - "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा".

८) खुद्द छत्रपतींनीच समर्थांना सज्जनगड मुक्कामास देवू केला होता. स्वराज्यासाठी मिळवलेला एखादा किल्ला महाराज असाच कुणालातरी देतील हे होणे शक्यच नाही.

९) शंभू राजांना महाराजांनी आत्मशांतीसाठी सज्जनगडला समर्थ अनुग्रहासाठी पाठवले होते. बाबा याकूत किंवा कोणी अजून एखादे साधुसंत यांच्याकडे नाही. (जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे काही वर्षे अगोदर निधन झाले होते.)

१०) राज्याभिषेकाच्या वेळी समर्थ प्रदीर्घ काळ उत्तर भारतात गेले असल्या कारणाने कल्याणस्वामी राज्याभिषेकाला उपस्थित असल्याची नोंद आहे.

११) दक्षिण दिग्विजय आटोपून महाराज परत आल्यानंतर ते सर्वप्रथम समर्थांची भेट घेण्यास सज्जनगडावर गेले व नंतर प्रतापगडावर भवानी देवीचे दर्शन घेण्यास गेले. याच भेटीत महाराजांना समर्थांनी दासबोधाची एक प्रत दिली.

१२) खुद्द तुकाराम महाराजांनीच छत्रपतींना समर्थांना गुरु करण्याचा उपदेश केला होता. याबाबत त्यांचे उपदेशपर आणि समर्थांचे वर्णन करणारे अभंग प्रसिद्ध आहेत.

१३) शिवरायांवर ज्यांनी ज्यांनी काव्य केले त्यात तुकाराम महाराज आणि समर्थ यांचेच नाव सर्वात पुढे आहे. बाकीचे जे आहेत ते इतिहासकार आहेत.

१४) तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर शिवरायांना धर्मोपदेश करणारे फक्त रामदास स्वामीच असू शकतात कारण इतर कोणी सिद्ध पुरुष त्या काळात अस्तित्वात असल्याची जास्त माहिती नाही. ज्या काही लोकांची माहिती आहे ते बहुतेक सर्वच मुस्लीम आहेत. त्यामुळे महाराज समर्थांना सोडतील आणि मुस्लीम संतांकडून अनुग्रह घेतील हे कसेकाय होवू शकते...???

१५) प्रबोधनकार ठाकरेंनी समर्थांच्या वर जो ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु असे दाखविले आहे.

१६) जोतीराव फुलेंनी महाराजांवर जो पोवाडा केला त्यात सुद्धा त्यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु असे दाखविले आहे.

१७) स्वराज्य आणि महाराज यांच्यावर कोणतेही संकट आले असता समर्थ त्यांना उपदेशपर पत्र अथवा संदेश अथवा संकटातून तरण्यासाठी, धीर देण्यासाठी एखादे काव्य करून पाठवतात. या गोष्टी फक्त एखादा गुरूच करू शकतो, कोणता बाबा किंवा मौलवी नाही.

लेखन संदर्भ -
१) समर्थ व महाराज यांचा अन्योन्य संबध (भास्कर वामन भट - शके १८५०).
२) छ शिवाजी महाराज आणि दासबोध (www.dasbodh.com).
३) सभासद बखर.
४) ब्लॉग - इतिहासकाळात डोकावताना.
५) Other books from (www.dasbodh.com).
ज्या लोकांना खरोखर इतिहासात रस आहे त्यांनी www.dasbodh.com या साईट वर जावून तेथील ऐतिहासिक ग्रंथ, बखरी, इंग्रजी पुरावे तपासायला हवेत.
पुरावा संकलन - समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ