मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जिझिया कर बाबतीत ओरंगजेब ला लिहलेल पत्र.

प्रति ओरंगजेब (इ.स. १६७९)
      माज्या दुर्देवामुळे मी आपली परवानगी न घेता दरबारातून निघून आलो. एक हितचिंतक म्हणून मी काही गोष्ठी आपल्यासमोर मांडीत आहे.
अलीकडे माझ्या ऐकण्यात आले की, माझ्यावरील मोहिमांमुळे आपला खजिना रिकामा झाला आहे. त्यामुळे हिंदुकडून जिझिया कर वसूल करून त्या उत्पन्नाने राज्याचा खर्च भरून काढावा असे आपण ठरविले आहे.
      अकबराने बावन्न वर्ष राज्य केले, सर्व जमातीबरोबर समभावाने वागण्याचे धोरण त्याने स्विकारले होते. म्हणूनच तो जगदगुरु या नावाने प्रसिद्ध झाला. जहांगीर बादशाहाने बावीस वर्ष या जगावर कृपेची सावली धरली. शाह्जहान बादशाहाने बत्तीस वर्ष राज्य केले आणि सत्क्रुत्याच्या योगे आपल्या जीवनाचे सार्थक केले. त्या बादशाहानी मनात आणले असते तर जिझिया कर लादण्याची त्यांना शक्ती होती. पण सर्व माणसे परमेश्वराची आहेत आणि सर्व धर्म ही परमेश्वराच्या आराधनेची साधने आहेत असे ते समजत. म्हणून त्यांचे वैभव दिवसेदिवस वाढत गेले आणि त्यांना आपल्या कामात यश येत गेले.
      पण तुमच्या काळात अनेक प्रांत आणि किल्ले तुमच्या ताब्यातून निघून गेले आहेत आणि उरलेले प्रांत आणि किल्ले पण तुमच्या हातातून निघून जातील. तुमचे प्रांत उद्ध्वस करण्यात मी कसूर करणार नाही. तुमची प्रजा चिरडली जात आहे आणि तुमच्या परगण्याचे वसूल दिवसेदिवस कमी होत आहेत. तुमचे सैनिक असंतुष्ट आहेत. मुसलमान आक्रोश करीत आहेत आणि हिंदू पोळले आहेत. त्यांची दुर्दशा झाली असता त्यांच्यावर आपण जिझिया कराचा बोजा लादला आहे. जनमनात ही गोष्ट नमूद होईल की हिंदुस्थानचा बादशाहा भिक्षापात्र हातात घेऊन ब्राम्हण, जैन, साधू, गरीबगुरीब यांच्याकडून जिझिया वसूल करण्यास निघाला आहे. तैमूर घरण्याचे नाव तो मातीत मिळवीत आहे. कुराणात परमेश्वराला रबुल आलमीन (म्हणजे विश्वाचा नाथ) म्हटले आहे; रबुल मुसलमीन (म्हणजे मुसलमानाचा नाथ) म्हटले नाही. इस्लाम आणि हिंदुधर्म हे दोन्ही परमेश्वराच्या रूपाचे मधुर आविष्कार आहेत. मशिदीत परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी अजा (म्हणजे बांग) देतात. मंदिरातील घंटानाद परमेश्वाराच्या आराधनेसाठी असतो. धर्माच्या बाबतीत द्वेष आणि कट्टरपणा दाखविणारा प्रत्येकजण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या (या विश्वाच्या) चित्रावर रेघोट्या ओढू पाहणे म्हणजे (म्हणजे परमेश्वरावर) दोषारोप करणे आहे.
      न्यायबुद्धीने पाहता जिझिया हा कोणत्याही दुर्ष्टीने योग्य नाही. हिंदुस्थानात हा नव्याने सुरु करण्यात येत आहे. तुम्हाला धर्माच्या आणि न्यायाच्या दृष्टीने हा कर लादणे आवश्यक्त वाटत असेल तर तो तुम्ही राजा रामसिंग यांच्याकडून घेण्यास हवा. कारण ते हिंदूंचे पुढारी आहेत त्यानंतर या हितचिंतकाकडून (म्हणजे माझ्याकडून) कर वसूल करणे अवघड जाणार नाही.

“सदर पत्र छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी ओरंगजेब ह्याला लिहले आहे. शिवछत्रपतीची पत्रे खंड १ पान नंबर ३६३ वर वाचण्यात येईल.”
जय भवानी जय शिवराय