बुधवार, १२ मार्च, २०१४

समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिले

शिवराय गेले...आणि संभाजीराजे स्वराज्याचे छत्रपती झाले...

समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिले, ते सर्वांना माहित आहे...

शिवरायांचे आठवावे रूप।
शिवरायांचा आठवावा प्रताप...

या पत्रातील शेवटच्या ओळी अपार महत्वाच्या आहेत!

"याहुनी करावे विशेष ।
तरीच म्हणवावे पुरुष ।
याऊपरी आता विशेष ।
काय लिहावे॥"

अर्थात, शिवरायांहून विशेष पराक्रम गाजवून दाखवाल तरच तुम्ही खरे!
काय पोटतिडकीचा संदेश आहे पहा!

संभाजी महाराजांनी हा संदेश मनावर घेतला असेल का हो? इतिहासात याचे उत्तर सापडते!

छत्रपती शिवरायांना एकुण ३५ वर्षांचे सामरिक आयुष्य लाभले...(युद्ध केलेला काळ), या काळात त्यांनी सुमारे २३० लढाया केल्या...त्यात ७ वेळा त्यांना पराभूतही व्हावे लागले...परंतु त्यांनी मोठ्या चातुर्याने नेहेमी एका वेळी एकच शत्रू अंगावर घेतला!

या उलट शंभुराजांना केवळ ९ वर्षात १३० युद्धे करावी लागली...व शत्रू आता सावध झालेला असल्याने सर्वजण मिळुन हिंदवी स्वराज्यावर तुटून पडले होते!डच,फ़्रेंच,पोर्तुगीज,इंग्रज,हबशी,निजामशाह,आदिलशाह,कुतुबशाह,बरीदशाह,इमादशाह,मुघल असे सर्वजण एकदम महाराजांवर तुटून पडले व या सर्वांना दाताडावर आपटवून संभाजी महाराजांनी १३० च्या १३० लढायांत विजय संपादन केला!!!!
काय तोडीचा योद्धा असेल हा!!!
शेवटी शत्रूला कळाले की हा गडी समरांगणात आटोपत नाही! यांना धरावयास केवळ कपटनीतीच करावी लागेल! फ़ंदफ़ितुरीशिवाय हे शक्य नाही!
आणि तेच करीत, राजांच्या सख्या मेहुण्यास फ़ितवून (गणोजी शिर्के), मुकर्रबखानाने हा डाव साधला...शंभुराजांबद्दल,त्यांचा समकालीन एक अरब लेखक, व औरंग्याचा चरित्रलेखक, खफ़ीखान त्याच्या "बादशाही-इ-आलमगिरी" या ग्रंथात म्हणतो,
"संभुजी कपटीपणात, क्रूरपणात,पराक्रमात आपल्या बापाहून दहापट अधीक भयानक आहे!"
आणि इथेच सिद्ध होते की "याहुनी करावे विशेष" या शब्दांना काय वजन महाराज देतहोते!

संभाजी महाराजांच्या बलिदानामुळेच पुढे मराठ्यांनी चवताळून उठत, ना सेना, ना सेनापती, ना राजा, ना राजधानी अशा अवस्थेत दिल्लीवरच काय तर अटकेपार भगवे झेंडे फ़डकविले!
हा इतिहास समाजाच्या लक्षात राहिला तर आपला देश उन्नत होईल, प्रखर होईल, प्रगत होईल..
जोवर संभाजीराजे हिंदूंच्या हृदयात जिवंत आहेत तोवर हिंदुस्थान जगाचा बाप आह!!!

www.dasbodh.com

संथ तुकाराम महाराज व संत रामदास स्वामी

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत वारकरी समाजात सर्वमान्य आहे. या प्रतीच्या प्रस्तावनेत सदानंद मोरे यांनी रामदासी संप्रदायाची यथेच्छ बदनामी केल्याने ब्रिगेड्यांनाही ती प्रत आवडणार! त्याच प्रतीतील जगद्गुरु तुकोबारायांचे काही अभंग (मुख्य ओळी) अभंग क्रमांकानुसार देत
आहे.सर्वांनीच लक्ष देऊन वाचा! व मग ठरवा तुकाराम महाराजांनी आज ब्रिगेडची काय अवस्था केली असती...तुकोबा व समर्थांमध्ये गुरुत्व व अन्य
विषय चघळणे म्हणाजे ब्रिगेडचा समर्थांसोबतच तुकोबांनाही संपविण्याचा हा हिरवा-निळा-पांढरा डाव आहे...

टीप: तुकाराम महाराज हे आम्हाला समर्थ रामदास स्वामींइतकेच वंद्य व पूज्य आहेत...आज हे दोघे जिवंत असते तर त्यांनी एकत्र येऊन ब्रिगेडींचा समाचार घेतला असता..सुदैवाने दोघे वाङ्मय रूपाने जिवंत आहेत! दासबोध आणी गाथा वाचून, सखोल अभ्यासून या कुत्र्यांना उत्तरे देऊन निरुत्तर करणे हेच ख-या वारक-याचे व धारक-याचे काम आहे!

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९७२:

नाम न वदे ज्याची वाचा । तो लेक दो बापांचा॥
हेची ओळख तयाची। खूण जाणा अभक्ताची॥
ज्याची विठठल नाही ठावा। त्याचा संग न करावा॥
नाम न म्हणॆ ज्याचे तोंड । तेचि चर्मकाचे कुंड ॥
तुका म्हणे त्याचे दिवशी । रांड गेली महारापाशी॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९७४

तुका म्हणे नाही जातीसवे काम। ज्याचे मुखी नाम तोची धन्य॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९६२

ऐका कलीचे हे फ़ळ। पुढे होईल ब्रह्मगोळ॥
चारी वर्ण अठरा याती। भोजन करिती एके पंक्ती॥
पुजिती असुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा॥
वामकवळ मार्जन । जन जाईल अधोपतन॥
तुका हरिभक्ती करी। शक्ती पाणी वाहे घरी॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९६३

अन्य जा्ती गुरुत्व करू लागल्याबद्दलचा व त्यांचे शिष्यत्व करणारांबद्दलचा राग-->

गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥1॥
पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ध्रु.॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥2॥
कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥3॥
नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥4॥
इंिद्रयांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥5॥
नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥6॥
तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥7॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २८७२ ते २८७५

चिंचवडचे गणेशभक्त संत श्री मोरया गोसावी यांची भेट घेतल्यावर त्यांनी
तुकोबांना आपल्याच ताटात जेवायला सांगितले त्या सर्व प्रसंगांचे वर्णन
करणारे अभंग...

2872. परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥1॥
न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥
पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी आह्मां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥3॥

2873
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥1॥
देव ह्मणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥2॥
तुका ह्मणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥3॥

2874
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥1॥
भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥2॥
कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका ह्मणे ॥3॥

2875
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥1॥
तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥3॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९४४

भिक्षा प्रशस्ती

इहलोकीं आह्मां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥1॥
निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥2॥
तुका ह्मणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥3॥

*******************************************
****** तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०४० ******
*******************************************

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥

कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥

मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥

जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥

*******************************************
*******************************************

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०५६

साधूसंतांना शरण न जाता रांडेकडे जाणा-यास तुकोबा शिव्या हासडतात.

साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥1॥
वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥2॥
तुका ह्मणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥3॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०५७

देवाब्राह्मणास शरण न जाणारा भाग्यहीन!!!

राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥
देवाब्राह्मणासी जाइना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें॥3॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥

**************************************
तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०६७
**************************************

संतांना नावे ठेवणा-या व त्यांचेवर संशोधन करणा-याच्या वीर्यात नक्की
भेसळ आहे! त्याला समाजापासून लांबच ठेवा!

संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥धृ.॥
भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥1॥
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥2॥
तुका ह्मणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥3॥

**********************************************

***********************************************
*****तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३२६२******
***********************************************
या अभंगात तुकोबारायांनी ब्रिगेडचेच वर्णन केले आहे असे वाटते!

संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान॑^ ॥1॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥2॥
तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥3॥

***********************************************
^ http://muslimbrigade.blogspot.in/p/blog-page_27.html
***********************************************

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३५५८

ब्राह्मणाला जो दक्षिणा देत नाही त्याच्या जिण्याचा धिक्कार असो, त्याला
वर्मच कळाले नाही.

दगडाच्या देवा बगाड नवस । बाइल कथेस जाऊं नेदी ॥1॥
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी॥ध्रु.॥
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥2॥
करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥3॥
तुका ह्मणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥4॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३५९८

हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे॥1॥
त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥2॥
तुका ह्मणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥3॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३९४८

तुकोबाराय स्नानसंध्येला किती महत्व देतात पहा. ते न करणारा जन्मजातीचा जरी ब्राह्मण असला तरी त्यास ब्राह्मण मानू नये असे ते सांगताहेत.

जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥1॥
तो एक नांवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥
सांडुनियां शािळग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥2॥
नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥3॥
तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥4॥

***************************************
तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ४०१२

**************************************
तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ॥1॥
आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥
िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥2॥
श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥3॥
चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥4॥
म्हणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥5॥
ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥6॥
तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धी पाणी वाहे घरीं ॥7॥

****************************************
तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०२
****************************************
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥

****************************************