सोमवार, २५ मे, २०१५

राजा शिवछत्रपति वरील आक्षेप व खंडण

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांना आत्ता ह्याच वेळी समजेल का राजा शिवछत्रपति ह्या पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी चुकीचे संदर्भ दिले आहेत ते. राजा शिवछत्रपति ह्या पुस्तकाचे १९ आवृत्ती निघाल्या नंतर ह्यांना जाग आली का? कि ह्या मागे फक्त राजकारण आहे? जितेंद्र साहेब तुम्ही जर खरेच शिवप्रेमी असाल तर गेल्या वर्षी तुम्ही कळवा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या स्मारकाच उदघाटन केल त्या स्मारकाकडे कधी स्वतहून लक्ष दिल आहे का? त्या स्मारकावर जाम धूळ बसली आहे. ती लांबून पण दिसते तशीच त्यावर कावळे चिमण्या नी शी करून ठेवली आहे ते तुम्ही कधी बघितल आहे का? तुम्ही जर खरच शिव प्रेमी असाल तर ह्या गोष्टी कडे स्वतःहून लक्ष द्याल अशी अपेक्षा आहे. असो मूळ मुद्यावर येतो. तुम्ही जे महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपति ह्या पुस्तकाच्या काही लिखाण वर आक्षेप घेतले ते त्याच मी माझ्या पद्धतीने खंडन करतो.
१)       बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी त्यांचा राजा शिवछत्रपति पुस्तकात असे लिहले आहे कि [तिला (आऊ साहेब जिजाबाई) रामायण, महाभारत फार फार आवडे. राम, हनुमान, सीता, कृष्ण, द्रोपदी, कुंती, विदुला या सर्वांच्या कथा ऐकताना तिच्या मनावर विलक्षण परिणाम होई. तिला वाटे, आपण नाही का कुंतीच्या पंगतीला बसू शकणार? तिचा भीम, तिचा अर्जुन अत्यंत पराक्रमी निपजले. त्यांनी राक्षस अन कौरव मारले. सुखसमृद्ध धर्मराज्य स्थापन केले. कुंती वीरमाता, राजमाता ठरली. मला तिच्या पंगतीला बसायचे! बसेन का?”] आत्ता मला सांग ह्यात गैर काय लिहल आहे. तुम्ही आधी तुमची नियत बदला मग तुम्हाला काय ते नीट समजेल. ह्यात बाबासाहेबांनी कुंती चे चांगले गुण घेतले आहे. तुम्ही चुकीचा व अल्शील संदर्भ देत आहात. तुमच्या सारख्या अल्शील माणसाला सगळ्या गोष्टी अल्शीलच दिसणार. आऊसाहेब जिजाबाई ह्याना कुंती सारखे राजमाता व्ह्यायचे आहे. तिचे पुत्र भीम व अर्जुन सारखे शूर वीर सत्य व धर्मचे रक्षण करणारे हवे आहेत. असो तुमच्या सारख्या अल्शील विचार करण्याला लोकांना आम्ही सभ्य लोक काय सांगणार. (राजा शिवछत्रपति १९ वी आवृत्ती प्रकरण नाव सकल सौभाग्यसम्पन जिजाबाई पान नंबर ८० वर लिहले आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी वाचावे.)
२)       अफजल वधाच्या वेळी आईसाहेब जिजाऊ ह्या राजगड वर होत्या. आणि त्या फक्त अफजल प्रतापगडच्या पायथ्याशी येण्याआधी त्या प्रतापगड वर जाऊन शिवाजी महाराज ह्यांची भेट घेतली. अफजल वधावली शिवाजी महाराज ह्यांचे वकील दत्ताची पंत नसून पंताजी गोपिनात बोकील होते. असे महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी नमूद केले आहे. ह्यावरून असे लक्षात येते कि तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचले नाही.
३)       नीटस, गोऱ्या कुणबिणी चा उल्लेख हा शिवाजी महाराज ह्यांच्या जन्म आधी चा आहे. तुम्ही आधी नीट पुस्तक वाचा. तुम्ही पुस्तकच वाचल नाही हे ह्या वरून नक्की सिद्ध होत आहे. आत्ता राहिला प्रश्न ह्या शिवचरित्र मध्ये का लिहले ते, तर ह्या पुस्तकात अल्लुदिन खिलजी च्या स्वारी च्या आधी पासून लिहल आहे. ह्यात बाबासाहेब ह्यांनी जाती वरून लिहल नाही तर तुम्ही जातीवरून त्याचा अर्थ काढला आहे ते पण स्वताच्या शुल्क स्वार्थ साठी. आमच्या सारख्या सच्चा शिव प्रेमी ला वाटत नाही. अश्या गोष्ठी तुमच्या सारख्या जातीयवादी व्यक्तीलाच वाटू शकतात. आणि तुम्ही जर पुस्तक नीट वाचले तर तुम्हास असे दिसून येईल कि बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी नुसती मराठे, कुणबी, वैश्य, शुद्र लोकांवर टीका नाही केली तर ब्राम्हण लोकांवर पण टीका केली आहे. व काही ठिकाणी औरंगजेब व अफजल बद्दल पण चांगल लिहल आहे.
४)       तुमच्या पत्रातल्या ३ नंबर पानावर जे काही अक्षेप घेतले त्यातला मुद्धा क्रमांक १ चे उत्तर:- राजा शिवछत्रपति पुस्तकात पान नंबर ७८-७९ वर असे लिहले आहे कि [ ती (म्हणजे आऊसाहेब जिजाबाई) असंतुष्ट होती. जहागीदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही. मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष !] ह्यात त्यांनी त्या काळातील सरदार लोकांना उद्धेशून म्हटले आहे. जे सरदार खरोखर शूर आहेत पण दे कोणत्या ना कोणत्या बदशाची चाकरी करतात त्यांच्या बद्दल लिहले आहे. मग मला तुम्ही सांगा शिवाजी महाराज ह्यांच्या आधी कर्तबगार स्वाभिमानी सरदार कोण कोण होते व त्यांनी ह्या बादशाही विरुद्ध बंड केले आपण सांगू शकतात का?
५)       राजा शिवछत्रपति पुस्तकातील पान नंबर ३१, ३२, ४२, ४४, ४५, ४७, ५०, ५२, ६७ वरील उतारे वाचल्यावर असे कुठे ही वाटत नाही मराठे हे टाकाऊ होते ते. असे फक्त तुम्हास वाटे. हे सगळे शिव जन्म च्या आधी च्या घटना आहेत. बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी त्याकाळातील म्हणजे शिवाजी महाराज ह्यांच्या जन्म आधीच्या सरदार लोकांना उद्देशून म्हटले आहे. आणि मराठे म्हणजे कोण हे तुम्हाला माहित नाही तर मी तुम्हास सांगतो मराठे म्हणजे महाराष्ट्र मध्ये राहून मराठी बोलतात ते मराठे. मराठे ही जात नाही. मराठे मध्ये ब्राम्हण, मराठा, वैश्य व शुद्र हे सगळे ह्या मराठे मध्ये मोडतात. हे तुम्ही आधी जाणून घ्या. परत परत सांगतो कि तुम्ही आधी पूर्ण स्वतः राजा शिवछत्रपती वाचा.
६)       राजा शिवछत्रपति पुस्तकाच्या पान क्रमांक ७२, ७६, ९१ व १३७ वरील पानात स्त्री विषयी कुठे लिहले आहे. व नेमके तुम्हाला काय दाखवयचे आहे ते स्पष्ट करा. व कितव्या आवृत्ती मध्ये लिहल आहे. ते पण जरा स्पष्ट करा.
७)       राजा शिवछत्रपति ह्या पुस्तकात कुठे ही असा उल्लेख नाही की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज ह्यांचे गुरु होते. असे तुम्ही आम्हास दाखवा. उलट दादोजी कोंडदेव हे चाकर होते असे नमूद केले आहे. व त्यात असे ही लिहले आहे शहाजी राजे भोसले व दादोजी कोंडदेव ह्यांचे नाते स्वामी व सेवक होते असे लिहले आहे.
८)       पान क्रमांक ८० वर असे लिहले आहे की [ सोनोपंत डबीर, नारोपंत मुजुमदार, बालकृष्णपंत हणमंते इत्यादी वृद्ध अनुभवी कारभारयांच्या सहवासात जिजाबाई राजकारणातील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टीची उकल शिकत होती. ] ह्या वाक्यात काही गैर आहे असे वाटत नाही. कारण जिजाबाई ह्या वरिष्ठ व अनुभवी लोकांन कढून फक्त राजकारण समजून घेत होत्या. तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून बघतात त्यावर अवलंबून आहे. व तसेच तुमच्या सारखा अल्शील विचार तुमची करू शकतात. एखाद वाक्य जेवढ पाहिजे तेवढच घेऊन त्याचा बोबाटा करायचा तुमच्या सारख्या मूर्ख व अल्शील लोकच करू शकतात.
९)       दादोजी कोंडदेव ह्यांचे वय ७५ होते म्हणजे आजोबांच्या वयाचे. राजा शिवछत्रपति पुस्तकाच्या पान नंबर ११९ वर दादोजी कोंडदेव बद्दल असे लिहले आहे कि [ शहाजीराजांनी दादाजी कोंडदेव मलठणकर यांचा कडवा, निष्टावंत, प्रामाणिक, आज्ञाधारक, कष्टाळू, कडक शिस्तीचा, हिशेबी, रयतेची आणि कारभारातील लहान मोठ्या माणसांची कडत शिस्तीने पण तेवड्याच मायेच्या कळवल्याने काळजी घेणारा स्वभाव ओळखला होता दादाजी पंतांचे हात आणि मन तीर्थोदक कायमचे तळहाती असावे, तसे निर्मल होते. ते स्वभावाने कडक होते. कारभारात त्यांचा स्वभाव सुईसारखा टोकदार होता. टोचणारा. पण अश्याच स्वामिनिष्ठ, दक्ष, बुद्धिमान, अनुभवी, निस्पृह वृद्धाकडे आपल्या ३६ गावांच्या जहागिरीचे कारभारीपण सोपवावे असे शहाजीराजांच्या मनाने नक्की केले. जिजाऊराणीसाहेबांची सर्व आस्था, व्यवस्था आणि काळजी अगदी लेकीसारखी आणि चिरंजीव शिवबाराजांची जपणूक नातवंडासारखी पंत घेतील, अशी राजांना खात्री वाटत होती.] ह्या अर्थाने बघितले असता दादोजी कोंडदेव ह्यांचे शिवाजी महाराज माया असणे गैर नाही. दादोजी कोंडदेव ह्यांचे वय ७५ वर्ष होते तर शिवाजी महाराज ह्यांचे वय वर्ष ६ होते. तुम्ही जाणून घ्या आता.
१०)   शिवाजी महाराज व दादोजी कोंडदेव ह्यांचे गोत्र एकच! ते म्हणजे सह्याद्री! असे लिहले आहे. तुम्हाला गोत्र हा प्रकार माहित आहे का? जर माहित असता असा मूर्ख सारखा प्रश्न केला नसता. सह्याद्री ह्या नावाचा कोणताच गोत्र अस्तिवात नाही ते पहिले जाणून घ्या.
११)   ही मूर्ती मीच घडवली असे कुठेही लिहले नाही. उलट पान क्रमांक १२४ वर असे लिहले आहे कि [ आईसाहेबांना पुराण-प्रवचन-कीर्तनाची अतिशय आवड होती. तीच आवड शिवबाला लागली. महाभारत, रामायण, भागवत वैगरे ग्रंथातली नवीन नवीन गोष्टी तो ऐके. त्याला चटक लागली. ध्यानीमनी ति पराक्रमी माणसे व देव त्याला दिसू लागले. राम, हनुमान, कृष्ण, अभिमन्यू, भीम अन त्यांच्या गदा, धनुष्ये, बाण अन तलवारी अन चक्रे ! पुण्यात कोणी साधूसत्पुरुष किंव्हा विद्वान शास्त्री पंडित आला, की लाल महालात त्याचा सदरेवर सन्मान व्हावा. आईसाहेबानी पडद्यात बसावे, पंतानी शिवबांकडून त्यांचा सत्कार करवावा. अन मग शिवबाला सत्पुरुषांची भेटीगाठीचा छंदच जडावा. अशा संस्कारांनी शिवबाची मूर्ती घडत होती. ] ह्यात कुठेही असे लिहले नाही कि हीच मूर्ती मीच घडवली. पहिले स्वतः राजा शिवछत्रपति पुस्तक वाचा. उगीच पराचा कावळा करू नका.
१२)   पान क्रमांक १३२ वर असे लिहले आहे की [ पंतानी शहाजीराजे ह्यांना लग्नासाठी पत्रे पाठवली. परंतु राजे कर्नाटक प्रांती दूर होते. त्यांचे येणे घडेना. पण त्यांचा आशीर्वाद मात्र आल्यावाचून कसा राहील?
शाहजी राजे या लग्नास येऊ शकले नाहीत. मुलाचे अन सुनेचे कौतुक त्यांना दृष्टीआडून करावे लागले. राजे बंगळुरास होते. बादशाह आदिलशाह याने शहाजीराजांची दक्षिणेवर रणदुल्लाखानाबरोबर रवानगी केली. खानाच्या हाताखाली काम करण्याची राजांवर पाळी आली. ] असे लिहले आहे व हे लग्न दिनांक १६ मे १६४० ला पुण्यात लाल महाल येथे फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई हिच्याशी संपन्न झाला. तसेच पान क्रमांक १३५ वर असेल लिहले आहे की [ शिवबाच्या लग्नात राजे स्वतः हजर नव्हते म्हणून, त्यांनी शिवबांचे आणखी एक लग्न करायचे ठरविले ! मोहित्यांची मुलगी सोयराबाई हिच्याशी मोठ्या थाटामाटात शिवबाचा विवाह झाला. मोठ्या हौसेने राजांनी शिवबाचे हे आणखी एक लग्न केले ! वडील असावे तर ते असे ! ] म्हणजे शिवाजी महाराज ह्यांचे दुसरे लग्न बंगळुरास झाले. ते पण शहाजी राजे ह्यांच्या उपस्थित मध्ये. जितेंद्र आव्हाड ह्यांनी ह्यांच्या शुल्क व स्वार्थी राजकारण पायी हे असे अर्धे व अपुरे ज्ञान पाजळत आहे.
१३)   हो शिवाजी महाराज ह्यांच्या कोणत्याही जाती व धर्म विरुद्ध लढा दिला नाही हेच राजा शिवछत्रपति ह्या पुस्तकातून वारंवार दिसून येते. त्यांनी त्याकाळातील बड्या साम्राज्य विरुद्ध लढा होता. राजा शिवछत्रपति ह्या पुस्तकात तर अफजल खान च कोतूक केल आहे. पान क्रमांक २५१ व २५२ वर दिसून येईल. त्याचा मजकूर असा आहे [अफजलखान अत्यंत कडक शिस्तीचा उत्तम प्रशाशक होता. तो आपल्या अमलाखालील प्रजेवर कधीही जुलूम-अन्याय करीत नसे. रयतेच्या कल्याणासाठीच तो कारभारात अतिशय कडवी शिस्त राखीत असे. त्यात मग बहुदा क्रूरतेने जुलूम करण्याची प्रवृत्ती नसे. रयतेच्या हिचाची दृष्टी असे. न्याय देतांना तो पक्षपात करीत नसे. त्याच्या अमलाखालील काही जबाबदार गावकामगारानी एन पेरणीच्या दिवसात, पेरणीच्या कामांचा खोळंबा करून दुसरीकडे मुक्काम ठोकला व आपल्या गावच्या व रयतेच्या हिताच्या कर्तव्यात बेपर्वाई दाखवली, म्हणून अफजलखानाला त्या लोकांचा राग आला. त्या लोकांत प्रमुख होता लिंगशेटी मोकदम. अफजलखानाने त्याला पत्र लिहले (दि. १५ जुले १६५४ रोजी). त्या पत्रात खान लिहतो, ‘रयत आमचे पोंगडे आहेती.’ ह्या पत्रांत खानाची कडक शिस्त व दक्ष दक्ष प्रशासन अगदी स्पष दिसून यते. ] तसेच काही दर्गा ला चदरी चढवले आहेत. व तसेच काही मुसलमान धर्मगुरू ह्यांचे पण दर्शन घेतले असे नमूद केले आहे. जेतेंद्र आव्हाड तुम्ही तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात. कोणतेही गैरसमज करून न घेता पुस्तक नीट शांत पणे वाचा.
१४)   जितेंद्र आव्हाड तुमची दृष्टी अधूर झाली आहे का? तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. पान क्रमांक ३२९ ओळ क्रमांक खालून ४, ५ वर बादशाच्या सैन्यात चाकरी करण्यार्या मराठे सरदार लोकांना उधेशून म्हटले आहे. सर्व मराठ्यांना नाही म्हटले. उघडा डोळे बगा नीट.
अजून कोणते आक्षेप आहेत? ते आक्षेप घेण्याआधी तुम्ही पूर्ण राजा शिवछत्रपति पुस्तक वाचा. मग बोला. अर्धी कुठली तरी वाक्य घ्यायचं मग बोम मारत सुटायचं. हे तुमचे बिन बुडाचे आरोप आहेत. ह्याला कोणते ही शात्रीय आधार नाहीत. तुमच्या या आरोपां मधून इतक प्रकशाने जाणवत आहे की तुम्ही स्वतः राजा शिवछत्रपति पुस्तक वाचले नाही. जर वाचले असेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वाचले आहे. तुमच मन फार अल्शील आहे. म्हणून काही ठिकाणी तुम्ही अल्शील अर्थ घेतला आहे. तुम्हाला डॉक्टर ही पदवी मिळाली आहे ना? तर त्या पदवी ला शोभेल असे वर्तणूक जरा करा. उगाच अडाणी माणसावरी वागू नका.
शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यां महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळणार तसेच भारत रत्न पण मिळाला पाहिजे. व तुमचा धिक्कार करतो.
तुम्हाला आई तुळजा भवानी सुबुद्धी देवो हीच प्रार्थना!
जय भवानी जय शिवराय
जय नथुराम गोडसे
-एक सच्चा शिवप्रेमी


 तेजस चिटणीस 

~: छत्रपती :~

शिवाजीमहाराजांपूर्वी अनेकांनी राजा हि पदवी घेतली होती व मुसलमान सत्तांनी तशी दिलीही होती. पण त्या पदव्या स्वातंत्र्य निदर्शक नव्हत्या. पदवीधर राजे बरोबरीच्या भूमिकेवरून तह करू शकत नव्हते. मराठा सरदारास 'स्वतंत्र' या शब्दातील अर्थाची कल्पनाच त्याकाळी नव्हती. स्वतंत्र म्हणजे दुसर्यांचे हुकुम पाळणारा नव्हे, हि कल्पना शिवाजीमहाराज त्यांस शिकवणार होते. स्वतंत्र राजा सैन्य जमा करतो, कर लादतो, स्वार्या करतो, बरोबरीच्या नात्याने तह करतो, न्यायनिवाडे करतो; या सर्व गोष्टींचा मूलभुत हक्क प्राप्त होतो तो राज्याभिषेकाने, हा स्वाभिमान तत्कालीन मांडलिकास शिकवायचे होते.
- © परशुराम चव्हाण



शनिवार, २३ मे, २०१५

छत्रपती शिवाजी महाराज


छत्रपती संभाजी महाराज


जय परशुराम


जितेन्द आव्हाड हे महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची माफी कधी मागणार.