समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठविलेले हे पत्र अतिशय प्रसिद्ध
आहे... यशवंतराव चव्हाण म्हणत की या पत्रासारखे शिवरायांचे समर्पक वर्णन
करणे आजवर
कुणाला जमलेले नाही!!!
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
अशी या पत्राची सुरुवात होते...
या पत्रातून शिवराय व समर्थ यांच्या मधील संबंधांचे अनेक पैलू उघड होत जातात. या पत्रातील ओळ अन ओळ, शब्द अन शब्द महत्वाचा व लाख मोलाचा आहे...
श्री समर्थांनी यात शिवरायांना उद्देशून वापरलेला प्रत्येक शब्द अतिशय जपून, पारखून, परीक्षून, स्वत: अनुभव घेऊन मगच वापरलेला आहे!!!
या पत्रातूनच दोघांमधील संबंध अत्यंत जवळचे व तरीही अत्यंत आदराचे कसे होते तेही स्पष्ट होते!!!
याच पत्रात समर्थांनी शिवरायांना दिलेली "श्रीमंतयोगी",
"जाणता राजा","शिवकल्याणराजा" यासारखी विशेषणे आज अजरामर झालेली आहेत!!!
पत्राचे प्रामुख्याने ३ भाग पडतात, पहिला भाग बराच मोठा असून यात शिवरायांचे कौतुक, वर्णन, त्यांच्या कार्याचा गौरव आलेला आहे!!!
संपूर्ण भारतभर मठांचा पसारा व भ्रमण असणारे समर्थ पत्राच्या शेवटून तिस-या ओवीत म्हणतात की तुमच्याच राज्यात सध्या फ़िरत फ़िरत आलो होतो परंतु आपण जवळपासच आलेले आहात, हे तुम्ही सध्या कुठे आहात त्याची मी चौकशी न कळल्याने माहिती नाही झाले...
यावरून हे दिसते की समर्थ महाराष्ट्रात आल्या आल्या दर वेळेस आधी शिवरायांचे वर्तमान घेत असत! मग अन्य
कामे करीत असत! याच ऋणानुबंधाचा उल्लेखही ते पत्रात करतात व त्याचमुळे या खेपेस माहिती घेणे जमले
नाही अशी प्रांजळ कबुलीही ते या दुस-या भागात
देतात. यावरून दोघांचे संबंध किती प्रेमपूर्ण होते हे
कळते पहा! शिवराय पुढच्या भेटीत नक्की हा विषय काढतील की यंदा इथे येऊनही आमची भेट नाही घेतलीत, या प्रेमळ आग्रहापोटी समर्थ त्यांची समजूत काढताना दिसत आहेत!!!
इतके सर्व कौतुक करून झाल्यावर मात्र समर्थ मूळ विषयाला शेवटी तिस-या भागात हात घालतातच! ते म्हणतात तुम्ही तर जाणताच की उभ्या भारतात अनेक
धर्ममूर्ती म्हणता येतील अशा व्यक्ती असून तुम्ही धर्मसंस्थापक म्हणून अशा सर्व लोकांचे राजे म्हणून विराजमान आहात व धर्मसंस्थापक अशीच तुमची किर्ती आहे!
परंतु ही किर्ती आपण सांभाळलीच पाहिजे! तिला तडा देता कामा नये! अशा पद्धतीने अत्यंत कठोर शब्दात एका चक्रवर्ती सम्राट छत्रपतीला धर्मरक्षणासाठी जणु तंबी दिल्यावर समर्थ पुन्हा मवाळ होतात व जो मोठ्या लोकांमध्ये पाळला जणारा शिष्टाचार आहे त्याला अनुसरून इतके कठोर बोलण्याचे कारण काय तेही विषद करतात, ते कारण म्हणजे त्या काळात भारतभर पसरलेले विकृत राजकारण होय जे हिंदू धर्माच्या मुळावर उठलेले होते, ते पाहून समर्थांचे चित्त उद्विग्न झाले होते हे ही ते मान्य करतात व त्यापोटीच हा कठोर सल्ला, जाणीव आपणास करून दिली असे सांगत त्याबद्दल उदार अंत:करणाने त्यांची क्षमाही मागतात! कारण शिवराय
अगोदरच ते कार्य करीत आहेत अशा मनुष्यास पुन्हा जाणीव करून देणे तसे योग्य नाही हे समर्थ जाणताहेत परंतु विषयाचे गांभिर्यच तसे असल्याने ते करावे लागत आहे याचे शल्यही ते प्रांजळपणॆ कबूल करून टाकतात!!!
उदंड राजकारण तटले । तेणॆ चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥
असे हे पत्र सर्वांनी पाठ करावे, मुखोद्गत करावे असेच आहे!
या पत्राबद्दल काही मुघलजनसहकारी बीग्रेडी असा आक्षेप घेतात की या पत्रात रामदास शिवरायांची माफ़ी मागत आहेत...
त्यांना आता काय उत्तर द्यायचे हे तुम्हीच पत्र पूर्ण वाचून ठरवावे...
॥ www.dasbodh.com ॥
कुणाला जमलेले नाही!!!
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
अशी या पत्राची सुरुवात होते...
या पत्रातून शिवराय व समर्थ यांच्या मधील संबंधांचे अनेक पैलू उघड होत जातात. या पत्रातील ओळ अन ओळ, शब्द अन शब्द महत्वाचा व लाख मोलाचा आहे...
श्री समर्थांनी यात शिवरायांना उद्देशून वापरलेला प्रत्येक शब्द अतिशय जपून, पारखून, परीक्षून, स्वत: अनुभव घेऊन मगच वापरलेला आहे!!!
या पत्रातूनच दोघांमधील संबंध अत्यंत जवळचे व तरीही अत्यंत आदराचे कसे होते तेही स्पष्ट होते!!!
याच पत्रात समर्थांनी शिवरायांना दिलेली "श्रीमंतयोगी",
"जाणता राजा","शिवकल्याणराजा" यासारखी विशेषणे आज अजरामर झालेली आहेत!!!
पत्राचे प्रामुख्याने ३ भाग पडतात, पहिला भाग बराच मोठा असून यात शिवरायांचे कौतुक, वर्णन, त्यांच्या कार्याचा गौरव आलेला आहे!!!
संपूर्ण भारतभर मठांचा पसारा व भ्रमण असणारे समर्थ पत्राच्या शेवटून तिस-या ओवीत म्हणतात की तुमच्याच राज्यात सध्या फ़िरत फ़िरत आलो होतो परंतु आपण जवळपासच आलेले आहात, हे तुम्ही सध्या कुठे आहात त्याची मी चौकशी न कळल्याने माहिती नाही झाले...
यावरून हे दिसते की समर्थ महाराष्ट्रात आल्या आल्या दर वेळेस आधी शिवरायांचे वर्तमान घेत असत! मग अन्य
कामे करीत असत! याच ऋणानुबंधाचा उल्लेखही ते पत्रात करतात व त्याचमुळे या खेपेस माहिती घेणे जमले
नाही अशी प्रांजळ कबुलीही ते या दुस-या भागात
देतात. यावरून दोघांचे संबंध किती प्रेमपूर्ण होते हे
कळते पहा! शिवराय पुढच्या भेटीत नक्की हा विषय काढतील की यंदा इथे येऊनही आमची भेट नाही घेतलीत, या प्रेमळ आग्रहापोटी समर्थ त्यांची समजूत काढताना दिसत आहेत!!!
इतके सर्व कौतुक करून झाल्यावर मात्र समर्थ मूळ विषयाला शेवटी तिस-या भागात हात घालतातच! ते म्हणतात तुम्ही तर जाणताच की उभ्या भारतात अनेक
धर्ममूर्ती म्हणता येतील अशा व्यक्ती असून तुम्ही धर्मसंस्थापक म्हणून अशा सर्व लोकांचे राजे म्हणून विराजमान आहात व धर्मसंस्थापक अशीच तुमची किर्ती आहे!
परंतु ही किर्ती आपण सांभाळलीच पाहिजे! तिला तडा देता कामा नये! अशा पद्धतीने अत्यंत कठोर शब्दात एका चक्रवर्ती सम्राट छत्रपतीला धर्मरक्षणासाठी जणु तंबी दिल्यावर समर्थ पुन्हा मवाळ होतात व जो मोठ्या लोकांमध्ये पाळला जणारा शिष्टाचार आहे त्याला अनुसरून इतके कठोर बोलण्याचे कारण काय तेही विषद करतात, ते कारण म्हणजे त्या काळात भारतभर पसरलेले विकृत राजकारण होय जे हिंदू धर्माच्या मुळावर उठलेले होते, ते पाहून समर्थांचे चित्त उद्विग्न झाले होते हे ही ते मान्य करतात व त्यापोटीच हा कठोर सल्ला, जाणीव आपणास करून दिली असे सांगत त्याबद्दल उदार अंत:करणाने त्यांची क्षमाही मागतात! कारण शिवराय
अगोदरच ते कार्य करीत आहेत अशा मनुष्यास पुन्हा जाणीव करून देणे तसे योग्य नाही हे समर्थ जाणताहेत परंतु विषयाचे गांभिर्यच तसे असल्याने ते करावे लागत आहे याचे शल्यही ते प्रांजळपणॆ कबूल करून टाकतात!!!
उदंड राजकारण तटले । तेणॆ चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥
असे हे पत्र सर्वांनी पाठ करावे, मुखोद्गत करावे असेच आहे!
या पत्राबद्दल काही मुघलजनसहकारी बीग्रेडी असा आक्षेप घेतात की या पत्रात रामदास शिवरायांची माफ़ी मागत आहेत...
त्यांना आता काय उत्तर द्यायचे हे तुम्हीच पत्र पूर्ण वाचून ठरवावे...
॥ www.dasbodh.com ॥