गुरुवार, २३ जुलै, २०१५

शिवाजी कोण होता?

गेले काही दिवस महाराष्ट्र भूषण ह्या सरकारी पुरस्कारावरून वाद सुरु आहे. ह्या वादामागील कारण म्हणजे हा पुरस्कार ह्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना देण्यात येणार आहे म्हणून संभाजी ब्रिगेड व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे मुंब्रा मधील आमदार जितेंद आव्हाड ह्यांनी विनाकारण वाद उकरून काढला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे जातीने ब्राम्हण आहेत, तसेच ब्रिगेड व जितेंद्र आव्हाड ह्यांच म्हणण आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी चुकीचा इतिहास लिहला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित पुरंदरे प्रकाशन “राजा शिवछत्रपती” ह्या पुस्तकात छत्रपति शिवाजी महाराज व आऊसाहेब जिजाबाई ह्यांची बदनामी केली आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे प्रमाणे कि ज्याने शिवाजी महाराज व आऊसाहेब जिजाबाई ह्यांची बदनामी केली त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार व गोविंद पानसरे ह्यांनी “शिवाजी कोण होता?” ह्या पुस्तकातून खरा शिवाजी समोर आणल तर त्याला गोळ्या घातल्या. 

त्याच बरोबर जितेंद्र आव्हाड ह्यांनी गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” ह्या पुस्तकाचे दाखले देतात. म्हणून आज मी हे पुस्तक विकत घेतल. ते पुस्तक फक्त ७२ पानी आहे, व किंमत पण फक्त ५० रुपये.
राजाशिवछत्रपति ह्या पुस्तकात छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या संपूर्ण जीवनावरआहे. तर शिवाजी कोण होता ह्या पुस्तकात शिवाजी महाराज व त्या वेळी परीस्थीतीवर भाष्य केले आहे. राजाशिव छत्रपति मध्ये जे लिहल आहे तेच पण जरा वेगळ्या भाषेत शिवाजी कोण होता ह्या पुस्तकात लिहलं आहे, त्यामुळे वेगळे असे काहीच वाटत नाही. 
जितेंद्र आव्हाड ह्यांनी राजाशिवछत्रपति ह्या पुस्तकावर काही अक्षेप घेतले आहेत. ते सगळे आक्षेप बिनबुडाचे आहे व पोकळ आहेत. त्यांचा एक आरोप आहे कि शिवकाळात कुणबीण ह्या २५ होन ला विकल्या जायच्या. ह्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. तो त्यांच्या पद्धतीने योग्य आहे. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” ह्या पुस्तकात पण ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे, तो असा आहे की (शिवाजी महाराज ह्यांच्या काळी आणि सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला-विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजेरजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी-सुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते, अब्रू लुटणाऱ्याना मान-मरातब अन पदव्या देत होते.) हा उतारा तुम्हास शिवाजी कोण होता ह्या पुस्तकातील पान क्रमांक १३ वरील शिवाजी व स्त्रियांची अब्रू ह्या लेखातील आहे. मग जितेंद्र आव्हाड तुम्ही ज्या पुस्तकाचा इतिहास सांगतात त्या गोविंद पानसरे ह्यांच्या शिवाजी कोण ह्या पुस्तकात लिहल आहे मग जे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी राजशिवछत्रपति ह्या पुस्तकात लिहले आहे ते योग्य लिहले आहे. जसे तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या कडे पुरावे मागितले तसे गोविंद पानसरे ह्यांच्या कडे मागितले का? 
तसेच दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज ह्यांचे गुरु नव्हते व त्याचं अस्तिव नाकारतात त्यांच्या साठी ह्याच शिवाजी कोण होता? ह्या पुस्तकात रयतेची कणव असलेला राजा ह्या लेखात दादोजी कोंडदेव ह्यांचा उल्लेख आला आहे. पान नंबर १० वर लिहल आहे. (शेतीच्या व शेतकऱ्याच्या अशा व्यवस्थेत शिवाजी व दादाजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले.) 
तसेच पान नंबर २२ वरील (मुसलमानाच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती.) असे हे लिहले आहे.
जितेंद्र आव्हाड हे किती दुतोंडी आहेत हे दिसून येत. त्यांनी ज्या पद्धतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजशिवछत्रपति पुस्तकावर अश्लील आक्षेप घेतले आहेत त्यांच्या अश्लील विचारातून आलेले अश्लील आक्षेप. असो जितेंद्र आव्हाड ह्यांनी वरील गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? ह्या पुस्तकातील वरील उतारांचा संदर्भ सहित स्पष्टीकरण करावे. त्या वाक्यांचा योग्य तो पुरावा द्यावा नाही तर महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची स्पष्ट पणे व जाहीर पणे माफी मागावी. 
(टीप:- ब्रिगेड ने उगाच विनाकारण वाद घालू नये उत्तर असतील तर बोला नाही तर तोंड काळ करा. सोबत त्याचे फोटो पण दिले आहेत. स्वत: खात्री करा. नाही तर ५० रुपये च पुस्तक खरेदी करा व वाचा.)






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा