शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारावरून राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील हितसंबंधींची ओरड सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या थेट वंशजांनीही या विरोधाच्या सुरात सूर मिसळवला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका गौरव विशेषांकात खुद्द छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांनीच बाबासाहेबांच्या शिवकार्याचा गौरव करणारा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी बाबासाहेब शिवचरित्राचे कथन करताना ऐतिहासिक सत्याचा तराजू किंचितही डाव्या-उजव्या बाजूस ढळू देत नाहीत, अशी ग्वाहीदेखील दिली होती. छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या त्या लेखातील काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या बाबासाहेबांच्या गौरवाच्या निमित्ताने…
– आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याच्या उदयकाली सर्वांत मोठे लेणे लाभले ते प्रतिभावंतांचे. महाराष्ट्राने सार्थ अभिमान धरावा असा प्रतिभेचा पराक्रम कलेच्या आणि विद्येच्या क्षेत्रात अनेक सरस्वतीपुत्रांनी गाजविला. लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, रणजित देसाई, जयंतराव नारळीकर आणि बाबासाहेब पुरंदरे हे अशा सरस्वतीपुत्रांपैकी आघाडीचे सारस्वत आहेत. आपापल्या क्षेत्रांत या प्रतिभावंतांनी दिग्विजय गाजविले आहेत. त्यांचे यश वादातीत आहे. शिवशाहीरांचे अभिनंदन करताना आणि त्यांना आशीर्वाद देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
– बाबासाहेबांच्या वक्तृत्वाला विलक्षण धार आहे आणि गोडवा आहे. तासन्तास त्यांच्या मुखातून शब्दांचा प्रचंड ओघ अत्यंत वेगाने खळाळत असतो. हे सारे शब्द अचूक अर्थाचा आणि रसांचा साजशृंगार लेवून खाशा हुजरातीच्या घोडदळासारखे दौडत येत असतात. स्वरांचे चढउतार अचूक साधले जातात. शब्दांनी चित्र साकार होत जाते. नाट्य अचूक पकडले जाते. रसांनी ते रंगत जाते. श्रोते काळवेळाचे भान विसरतात. अंगावर रोमांच आणि हृदयात आनंद फुलत जातो. बाबासाहेबांचे भाषण संपते. श्रोते भानावर येतात आणि त्यांच्या मग लक्षात येते की, अडीच तास होऊ गेले आहेत! हजारो श्रोत्यांचा सागर ओहोटीच्या लाटेसारखा एका वेगळ्याच धुंद मन:स्थितीत घराकडे परततो. पंडित भीमसेन जोशी एकदा म्हणाले होते, ‘बाबासाहेब पुरंदरे तीन सप्तकांत आपलं व्याख्यान ‘गातात’! त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येत असतो.’
– बाबासाहेबांच्या वक्तृत्वाचा एक स्वतंत्र आगळाच ढंग आहे. ऐतिहासिक सत्याचा तराजू किंचितही डाव्या-उजव्या बाजूस ढळू न देता ते इतिहास कथन करतात. बखरी आणि अस्सल कागदपत्रे बाबासाहेबांनी आत्मसात केलेली असल्यामुळे त्यांच्या भाषेला आगळाच गोडवा आलेला आहे. ऐतिहासिक खानदानी घराण्यात आणि मावळच्या दर्याखोर्यात सतत वावरत असल्यामुळे ते स्वत:च अस्सल ‘ऐतिहासिक’ बनले आहेत! ते बोलू लागले की, त्यांच्या वक्तृत्वात कुठेतरी अचूक जागी शाहीर झळाळून जातो. कुठेतरी गोंधळी गिरकी घेऊन जातो, कुठे बहुरूपी आपल्याला हसवून जातो, कुठे कीर्तनकार आपला ढंग दाखवून जातो, कुठे तमाशातील एखादी लावणी झटकन डोळ्यापुढून जाते, कुठे एखादी ‘साठा उत्तराची कहाणी’ श्रोत्यांना सुखावून जाईल. कुठे लळित दिसून जाईल तर कुठे भारूड भासून जाईल आणि हे सर्व चालू असताना त्यांचे विषयांचे सूत्र आणि ऐतिहासिक सत्याची बैठक सुटत नाही, हे त्यांच्या वक्तृत्वातील वैशिष्ट्य.
– बाबासाहेब नेहमी म्हणतात की, ‘मी विद्वान नाही. मी इतिहासकार नाही. मी नट आहे. मी गोंधळी, शाहीर, चित्रकथी, कीर्तनकार, बहुरूपी आणि खेळिया आहे. मी शिवकालीन इतिहासाचा बखरकार आहे. माझ्या शक्तिबुद्धीप्रमाणे जास्तीत जास्त सखोल अभ्यास करून सोप्या भाषेत तो इतिहास लोकांना सांगणारा मी एक लोककलाकार आहे. याहून मी कोणी वेगळा नाही. अन् वेगळा कुणी असलोच तर मी इतिहासाचा प्राथमिक शिक्षक आहे.’ खरोखर प्रत्येक शाळेत बाबासाहेबांसारखा एखादा जरी इतिहास शिक्षक लाभेल, तरी महाराष्ट्राचा भावी इतिहासच बदलून जाईल! इतिहास निर्माण करण्याचे सामर्थ इतिहास शिकवणार्यांतच असते.
– बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात. त्यांचा त्यात अभिमान दिसून येतो. पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजी महाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करीत नाहीत. अफझलखान किंवा औरंगजेब यांची खोटी निंदाही करीत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचे खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्त कंठाने सांगितले जातात तर दुर्गुणांबद्दल स्वकीयांची धगधगत्या शब्दात होरपळ उडवलेली दिसते. अफझलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील मुहंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही. अनेक इतिहासकारांची चुकीची विधाने ते साधार खोडून काढतात. पण त्यात कोणाचाही अपमान, अनादर किंवा कुचेष्टा ते करीत नाहीत. अंगुळभरही ते खालच्या पातळीवर उतरत नाहीत. बाबासाहेबांचा साराच डौल आणि आब अस्सल खानदानी आढळतो. खासगी बोलण्या-वागण्यातही त्यांच्या रोमरोमी भिनलेली खानदानी इभ्रत क्षणोक्षणी जाणवते. अहंकाराचा लहानसा तवंगही त्यांच्या बोलण्या-चालण्यात उमटत नाही.
– सर्वांवरती प्रेम करणारे आणि सर्वांशी खिलाडू वृत्तीने वागणारे बाबासाहेब खरोखरच खेळगडी आहेत. त्यांना कसल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. पडेल ते काम निरपेक्षपणे आणि जीव ओतून करावयास ते तयार असतात. अशा मोलाच्या या कार्यकर्त्याला आपणच जपले पाहिजे.
(साभार : तरुण भारत)
– आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याच्या उदयकाली सर्वांत मोठे लेणे लाभले ते प्रतिभावंतांचे. महाराष्ट्राने सार्थ अभिमान धरावा असा प्रतिभेचा पराक्रम कलेच्या आणि विद्येच्या क्षेत्रात अनेक सरस्वतीपुत्रांनी गाजविला. लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, रणजित देसाई, जयंतराव नारळीकर आणि बाबासाहेब पुरंदरे हे अशा सरस्वतीपुत्रांपैकी आघाडीचे सारस्वत आहेत. आपापल्या क्षेत्रांत या प्रतिभावंतांनी दिग्विजय गाजविले आहेत. त्यांचे यश वादातीत आहे. शिवशाहीरांचे अभिनंदन करताना आणि त्यांना आशीर्वाद देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
– बाबासाहेबांच्या वक्तृत्वाला विलक्षण धार आहे आणि गोडवा आहे. तासन्तास त्यांच्या मुखातून शब्दांचा प्रचंड ओघ अत्यंत वेगाने खळाळत असतो. हे सारे शब्द अचूक अर्थाचा आणि रसांचा साजशृंगार लेवून खाशा हुजरातीच्या घोडदळासारखे दौडत येत असतात. स्वरांचे चढउतार अचूक साधले जातात. शब्दांनी चित्र साकार होत जाते. नाट्य अचूक पकडले जाते. रसांनी ते रंगत जाते. श्रोते काळवेळाचे भान विसरतात. अंगावर रोमांच आणि हृदयात आनंद फुलत जातो. बाबासाहेबांचे भाषण संपते. श्रोते भानावर येतात आणि त्यांच्या मग लक्षात येते की, अडीच तास होऊ गेले आहेत! हजारो श्रोत्यांचा सागर ओहोटीच्या लाटेसारखा एका वेगळ्याच धुंद मन:स्थितीत घराकडे परततो. पंडित भीमसेन जोशी एकदा म्हणाले होते, ‘बाबासाहेब पुरंदरे तीन सप्तकांत आपलं व्याख्यान ‘गातात’! त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येत असतो.’
– बाबासाहेबांच्या वक्तृत्वाचा एक स्वतंत्र आगळाच ढंग आहे. ऐतिहासिक सत्याचा तराजू किंचितही डाव्या-उजव्या बाजूस ढळू न देता ते इतिहास कथन करतात. बखरी आणि अस्सल कागदपत्रे बाबासाहेबांनी आत्मसात केलेली असल्यामुळे त्यांच्या भाषेला आगळाच गोडवा आलेला आहे. ऐतिहासिक खानदानी घराण्यात आणि मावळच्या दर्याखोर्यात सतत वावरत असल्यामुळे ते स्वत:च अस्सल ‘ऐतिहासिक’ बनले आहेत! ते बोलू लागले की, त्यांच्या वक्तृत्वात कुठेतरी अचूक जागी शाहीर झळाळून जातो. कुठेतरी गोंधळी गिरकी घेऊन जातो, कुठे बहुरूपी आपल्याला हसवून जातो, कुठे कीर्तनकार आपला ढंग दाखवून जातो, कुठे तमाशातील एखादी लावणी झटकन डोळ्यापुढून जाते, कुठे एखादी ‘साठा उत्तराची कहाणी’ श्रोत्यांना सुखावून जाईल. कुठे लळित दिसून जाईल तर कुठे भारूड भासून जाईल आणि हे सर्व चालू असताना त्यांचे विषयांचे सूत्र आणि ऐतिहासिक सत्याची बैठक सुटत नाही, हे त्यांच्या वक्तृत्वातील वैशिष्ट्य.
– बाबासाहेब नेहमी म्हणतात की, ‘मी विद्वान नाही. मी इतिहासकार नाही. मी नट आहे. मी गोंधळी, शाहीर, चित्रकथी, कीर्तनकार, बहुरूपी आणि खेळिया आहे. मी शिवकालीन इतिहासाचा बखरकार आहे. माझ्या शक्तिबुद्धीप्रमाणे जास्तीत जास्त सखोल अभ्यास करून सोप्या भाषेत तो इतिहास लोकांना सांगणारा मी एक लोककलाकार आहे. याहून मी कोणी वेगळा नाही. अन् वेगळा कुणी असलोच तर मी इतिहासाचा प्राथमिक शिक्षक आहे.’ खरोखर प्रत्येक शाळेत बाबासाहेबांसारखा एखादा जरी इतिहास शिक्षक लाभेल, तरी महाराष्ट्राचा भावी इतिहासच बदलून जाईल! इतिहास निर्माण करण्याचे सामर्थ इतिहास शिकवणार्यांतच असते.
– बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात. त्यांचा त्यात अभिमान दिसून येतो. पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजी महाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करीत नाहीत. अफझलखान किंवा औरंगजेब यांची खोटी निंदाही करीत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचे खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्त कंठाने सांगितले जातात तर दुर्गुणांबद्दल स्वकीयांची धगधगत्या शब्दात होरपळ उडवलेली दिसते. अफझलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील मुहंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही. अनेक इतिहासकारांची चुकीची विधाने ते साधार खोडून काढतात. पण त्यात कोणाचाही अपमान, अनादर किंवा कुचेष्टा ते करीत नाहीत. अंगुळभरही ते खालच्या पातळीवर उतरत नाहीत. बाबासाहेबांचा साराच डौल आणि आब अस्सल खानदानी आढळतो. खासगी बोलण्या-वागण्यातही त्यांच्या रोमरोमी भिनलेली खानदानी इभ्रत क्षणोक्षणी जाणवते. अहंकाराचा लहानसा तवंगही त्यांच्या बोलण्या-चालण्यात उमटत नाही.
– सर्वांवरती प्रेम करणारे आणि सर्वांशी खिलाडू वृत्तीने वागणारे बाबासाहेब खरोखरच खेळगडी आहेत. त्यांना कसल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. पडेल ते काम निरपेक्षपणे आणि जीव ओतून करावयास ते तयार असतात. अशा मोलाच्या या कार्यकर्त्याला आपणच जपले पाहिजे.
(साभार : तरुण भारत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा