संभाजी ब्रिग्रेड हे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा नावाचा गैरवापर करून समाजात द्वेष पसरवत आहेत. व शिवाजी महाराज ह्यांचा खोटा इतिहास व अप्रचार करत आहेत. त्या साठी Anti Sambhaji Brigade हा ब्लोग व ह्याच नावाने आमचे फेसबुक वर पेज आहे.
जय भवानी जय शिवाजी
जय हिंदुराष्ट्र
रविवार, ९ डिसेंबर, २०१२
गणेशोत्सव व शिवजयंती
इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले
काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण
साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते
बाळगू शकतात का?"
त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास
आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती
आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि
सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे
नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक
शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या
सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक
म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून
द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा
वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये
सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या
पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक
साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या
बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी
गणेशोत्सवाच्या पुनरूज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव
सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित
झाली. अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर
टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू
केले. शिवाजी महाराजांच्या
स्वरूपात त्यांना अशी आदर्श व्यक्ती मिळाली, की जिच्या अनुकरणाने
लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला. शिवाजी
महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते. या कारणांनी त्यांनी
महाराष्ट्रात शिवजयंतीची
सुरुवात केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे
आवाहन केले. त्यानंतर विशेषतः बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव जोराने सुरू
झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा