रविवार, ९ डिसेंबर, २०१२

कृष्णाजी भास्कर.............दोन्ही बाजूनी पिचलेला एक भट !!





कृष्णाजी भास्कर...शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक दुर्लक्षित पामर.....इतिहासकारांनी त्यास महत्व द्यावे इतका मोठा नव्हताच कधी......त्याने शिवाजी महाराजांवर वार केला...अर्थात त्याबद्दल मतभेद आहेतच..कोणी म्हणत कि तो वार अफझलखानाने केला...आणि त्यास तलवार दिली ती कृष्ण्या भास्करने...तर काहीजण म्हणतात कि त्यानेच वार केला....असो....दोघेही शत्रूच


...महाराजांवर चाल करून येणारा तो शत्रूच.....मग तो स्वकीय असो व परकीय.......

पण त्या कृष्ण्या भास्कराचे निमित्त करून काही जन महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हि गोष्ठ हिंदुनी विसरून जावी अश्या प्रकारे प्रयत्न करत आहेत...त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नुकतेच एका बी-ग्रेडी थेराने केलेले विधान...तो म्हणे....'अफझल खानाने दगा केलाच नाही....दगा केला तो कृष्णा भास्कराने ...कारण अफझल तर शत्रूच....मग तो वार करणारच.....दगा कृष्णाजी भास्कराने केला'.....हे जर मान्य केले तर एक प्रश्न उरतोच....राजकारणात नेहमी शत्रूचा मित्र तो आपला शत्रूच असतो...मग अझल खानासारख्या शत्रूचा वकील तो मित्र कसा होईल??? तोही शत्रूच...त्याने वर केला ते त्याच्या शत्रू बुद्धीला स्मरूनच.....म्हणजे एकंदरीत या लोकांचा ब्राम्हण द्वेष इतका पराकोटीस गेला आहे कि त्यांना आता शत्रू कोण आणि मित्र कोण हे देखील समजेनासे झाले आहे..................

दुसरा एक युक्तिवाद असाही केला जातो....कि 'शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारला नसता...पण त्याने दगा केला म्हणून त्याला मारला'....जसा अफझल काही महाराजाबरोबर बुद्धिबळ खेळायला आला होता...आणि स्वेच्छा भोजन घेऊन परत जाणार होता...........अहो त्याने दगा केला नसता तरी राजांनी त्याला मारलाच असता.....तसं नसतं तर त्याला जावळीच्या दुर्गम प्रदेशात... प्रताप गडावर बोलावून घेण्याचे प्रयोजनच नव्हते.......मुसलमानांशी असलेलं वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढू नये म्हणून आपल्याच पूर्वजांचा पराक्रम नाकारण्यात कसला आलाय मोठेपणा???........

आता अफझल खानच्या स्वारीबद्दल बोलू....अफझल खान हा विजापूरचा मातब्बर सरदार...प्रचंड ताकद आणि भल्याबू-या मार्गाने आपले इप्सित साध्य करण्यात माहीर.......असे म्हणतात कि जेव्हा तो त्याच्या गुरूपुढे गेला तेव्हा त्याचा गुरु म्हणाला होता, " इसका सर कहा है???".....असा हा अफझल म्हणजे दुधाचा धुतलेला नव्हताच.....शहाजी महाराजांवर रात्री बेसावध स्थितीत हल्ला करणारा आणि त्यांना कैद करून भर विजापुरात त्यांची धिंड काढणारा हा अफझलखान.....शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना कनकगीरीच्या वेढ्यात फसवून मारणारा सुद्धा अफझलखान......एका वेढ्यातून औरंगजेबाला जाऊ दिला म्हणून एका बड्या मुस्लीम सरदाराचा दरबारात येताना खून करणारा सुद्धा अफझल खान......असा हा अफझल खान...स्वराज्यावर चालून आला......येताच त्याने वाटेतील मराठा सरदारांना त्याच्या पक्षास येऊन मिळण्यासाठी पत्र आणि धमक्या देण्यास सुरु केले.....काही गद्दार गेले तिकडे....निष्ठावंत मराठे भगव्याखाली एकत्र आले.....

अफझल स्वराज्यात येताच त्याने चहूकडे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली...महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांना त्रास देण्यास सुरुवात केली.....महाराजांची कुलदैवत भवानी आई जात्यात भरडली......हेतू हा कि शिवाजी जो प्रताप गडावर बसला आहे तो चवताळून बाहेर यावा....परंतु महाराज हा त्याचा हेतू जाणून होते....शत्रूस सोयीस्कर भागात लढाईस जावू नयेच तर उलट त्याला आपल्याला सोयीस्कर अश्या मैदानात आणावे आणि त्याचा फडशा उडवावा हा महाराजांचा युद्धामंत्र !!!!

शेवटी महाराजांनी खानाशी बोलणी चालू केली....त्यावेळी त्याचा वकील कृष्णा भास्कर हा भेटीसाठी येत होता.....मराठा इतिहासकार 'मा. श्री. रणजीत देसाई' यांनी त्यांच्या 'लक्षवेध' या ग्रंथात सप्रमाण सांगितले आहे कि एकदा महाराज आणि कृष्णाजी भास्कराची भेट झाली आणि महाराजांनी त्याच्या हातात बेल्फुल देऊन त्यास विचारले कि, " तुम्ही ब्राम्हण आहात...खरे ते सांगा.....अफझलच्या गोटात काय नेमके शिजत आहे???'....कृष्णाजी म्हणाला.." महाराज मी वकील आहे...त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही...कारण माझी बायका पोर तिकडे आदिलशाहीत आहेत.....परंतु...अफझल खानाने विडाच असा उचलला आहे कि 'चढ्या घोड्यानिशी शिवाजीला जिंदा किवा मुर्दा आदिलशाही दरबारात हजर करतो....".....

अश्याप्रकारे आपण पाहू शकता कि अफझल खान हा शिवाजी महाराजांना कैद करायलाच आला होता.....पण त्याच्याच नशिबाचे फासे फिरले होते हे कोणासही ठाऊक नव्हते.....ठरल्याप्रमाणे महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला .....महाराजांनी आपल्या पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला होता......या ठिकाणी आपण एक गोष्ठ विसरतो....आज शिवाजी महाराजांवर वार करणारा एक कृष्णाजी भास्कर म्हणून समस्त ब्राम्हण समाजास वेठीस धरले जात आहे...मग असे असताना शिवाजी महाराजांवर वार करणारे दोघे मुसलमान होते...एक अफझल खान आणि दुसरा सय्यद बंडा....मग त्यांच्या धर्माबद्दल आणि त्यांच्या कपटी काव्याबद्दल का कोणी (हे कोणी..कोण आहेत ते तुम्हा सगळ्यांना चांगलेच माहित आहे) एक चकार शब्द तोंडातून काढत नाहीत???

परंतु या फक्त ऐतिहासिकच नव्हे पिढ्या नि पिढ्यांना मार्गदर्शक ठरणा-या या पराक्रमानंतर सुरु झाले एक नाट्य....रामायणातल्या एका प्रसंगाशी साम्य दाखवणारे....रामायणात माता सीतेला पळवून नेण्याची योजना जेव्हा रावणाने आखली...तेव्हा मदत लागेल म्हणून तो मारीच या राक्षसाकडे गेला......मारीच हा पूर्वाश्रमीचा राक्षस होता...परंतु नंतर तो एक त्रुशी म्हणून ईश्वर साधनेत रममाण होऊ लागला होता.....परंतु रावणाने त्यास माता सीतेला पळवून नेण्याचे कमी मदत करण्यास सांगितली....त्याने ती सुरुवातीस नाकारली.....मग रावणाने त्यास सांगितले कि जर तू मला या कमी साहाय्य केले नाहीस तर आत्ताच तुझी मान उडवतो...मारीचाने विचार केला...ह्याचा हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातून मारू...त्याने निदान मोक्ष तरी मिळेल.....

आता एक क्षण असा विचार करू कि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अंगावर एका ओरखडाही न घेता परत आदिलशाहीत गेला असता तर काय झाले असते???...आदिलशाही म्हणजे काय आहे याचा अनुभव शिवाजी महाराजांच्या घराण्याला चांगलाच होता.....शहाजीराजांविरुद्ध आघाडी उघडणारी सुद्धा आदिलशाहीच होती.........शहाजी महाराजांचे स्वराज्याचे मनसुबे हाणून पाडणा-या मुरार जगदेवाचा खून केला तोहि आदिलशहानेच....

जर अश्यावेळी कृष्णाजी भास्कर परत गेला असता तर ...काय झाले असते??...शेवटी कृष्णाजी भास्कर जरी त्यांच्या सेवेत असला तरी त्यांच्यासाठी तो काफरच....अफझल खानच्या सैन्यातले कोणी वाचले नाही....त्याचा जवळ असणा-यांपैकी तर कोणीहि परत आले....मग हा कसा परत आला??? याचाच अर्थ कृष्णाजी भास्कर बंडखोर शिवाजीला मिळालेला आहे.....मग करा या काफाराचे हाल.....आणि शिक्षा काय झाली असती???? तर कृष्णाजी भास्कराच्या बायकांना भर बाजारात बेअब्रू केले असते...त्याच्या लहान मुलांना ठार केले असते आणि शेवटी सर्वांसहित कृष्णाजी भास्करालाही ठार केले असते......आणि ह्या गोष्ठीची जाणीव कृष्णा भास्कारालाही होतीच....

अश्यावेळी कृष्णाजी भास्कराने एक चाल खेळली असण्याची शक्यता आहे...शेवटी ब्राम्हणी डोके आणि त्यात वकील........त्याला माहित होतेच कि जे शिवाजी राजे अफझल सारख्या बलाढ्य शत्रूला मारू शकतात त्याचाच अर्थ ते मलाही मारू शकतात.....मग आदिलशाहीत जिवंत जाऊन कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा इथेच या देवपुरुषाच्या हातून का मरू नये???...तिथे आदिलशाहीत मेलो तर कुत्रे सुद्धा ओळखणार नाही.....आणि माझे कुटुंब तेही विनाकारण मारले जाईल...त्यापेक्षा मी इथे या पराक्रमी राजाच्या हातून मेलो तर ...... मी लढलो होतो हे सिद्ध होईल आणि त्यायोगे माझे कुटुंब तरी वाचेल......म्हणून कृष्णाजी भास्कराने महाराजांवर चाल केली असण्याची शक्यता आहे........नव्हे मी तर म्हणेन कि त्याने यासाठीच चाल केली....

अर्थात .शेवटी कितीही झाला तरी तो शत्रूच होता.....त्यामुळे त्याने जे केले ते योग्यच होते असे मी तरी म्हणणार नाही....परंतु या गोष्टीचा या बाजूने विचार होणेही गरजेचे आहे... ..
आणि मी इथे नमूद करेन कि हा विचार आणि त्यादृष्ठीने योग्य ते निपक्षःपाती संशोधन मराठ्यांनी करावे...........कारण 'आपला तो बहुजन आणि दुस-याचा बामन' हि सवय आता मराठ्यांमध्ये सुद्धा रुजत चालली आहे.......

जय भवानी !! जय शिवाजी !!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष आभार- मयेकर सर...
ह्या लेखाचा शब्दप्रपंच माझा असला तरी मूळ मुद्दा हा माझे एक मित्र मयेकर यांचा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा