गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

।। सिंहावलोकन : शिवराय आणि आपण ।।

'इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होत असते' असे म्हटले जाते. इतिहास घडवणारे हे दोन गट त्यामागे कार्यरत असतात. 'आत्मबुद्धी' आणि 'देहबुद्धी' ह्या दोन जबरदस्त प्रतिस्पर्धा मध्ये बुद्धीबळाचा हा डाव रंगलेला असतो. ह्या दोघांच्या युद्धात काळ आपली सोंगटी हळूच पुढे पुढे सरकवत असतो. बुद्धीबळाचा हा डाव सुरु असताना आपण भारतीय नेमके कोणत्या पक्षात मोडत आहोत? पक्षांतर? काय? होय ! नाही ! होय नाही ! नाही होय ! निरपेक्ष !

शिवरायांनी मोठ्या महतप्रयासाने निर्माण केले स्वराज्य, वेळोवेळी आमच्या गाफीलपणामुळे कसे काय धोक्यात येत राहते हे आम्हाला अजून तितकेसे निट समजलेले नाही, तर सावधपणा हेच स्वातंत्र्याचे दुसरे नाव आहे हे देखील आम्हाला अद्याप उमजलेले दिसून येत नाही. महाराजांनी आपल्याला बुद्धीचे बळ खेळायला शिकवले होते, पण इ.स. १८१८ साली इंग्रजांची सत्ता आली आणि आम्ही हाती क्रिकेट ची Bat धरली.

'आज्ञापत्रे' ह्या रामचंद्र अमात्य ह्यांनी लिहलेल्या ग्रंथामध्ये शिवरायांची वैचारिक धोरणे स्पष्ट होतात. शिवराय काळाच्याही पुढे जाऊन परीस्थितीचा किती अचूक वेध घेत असत हे पाहून मन थक्क होते. शिवरायंचे विचार एखाद्या दीपस्तंभांप्रमाणे आपल्याला सतत प्रेरणा देत आहेत. मार्गदर्शन करीत आहेत. परंतु अद्यापही आम्ही त्यांचा विचारांचा म्हणावा तसा विश्वव्यापी विचार केला नाही.ते आमच्या आचरणातून तितकेसे उतरताना दिसत नाही.बहुदा इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे आमची संशोधक दुष्टी हिरावून घेतली आहे. दिव्याखाली अंधार, तशी तर आपली गात झाली नाही ना? महाराजांनी आपल्याला भावंडभावना, एकात्मका शिकवली परंतु आम्ही आज त्याचे कितपत पालन करीत आहोत?

अवघ्या १५, १६ व्या वर्षी लहानग्या शिवबाने कोणत्याही जागतीत बँकेचे कर्ज न घेता जे दुर्ग उभारले, धड त्याचे संवधर्न आम्हाला जमू नये हि मोठी शरमेची गोष्ट आहे. शिवराय हे गडपती होते. जवळपास ३५० किल्ले त्यांच्या ताब्यात होते. पण त्यांनी कधी कुठेही आपले साधे नाव लिहून ठेवलेले आपल्याला आढळत नाही. आणि आज उद्घाटनाची साधी रिबीन कापायला देखील एकमेकांत स्पर्धा माजली आहे.

राजे कधी शत्रूला कधीही कमी लेखत नसत. ते त्याच्या सामर्थ्याची पूर्णपणे शहनिशा करीत असत. प्रसंगी शत्रूकडूनही काही चांगले शिकायला मिळते का?यावर राजांचा कटाक्ष असे. इंग्रजांनी संपूर्ण जगावर कसे काय साम्राज्य प्रस्थापित केले त्याचे मूळ शोधले असता आपल्याला त्याचे स्वताच्या इतिहासावरील प्रेम, त्यातून सतत शिकून घेण्याची वृत्ती व आपल्या राष्टीय अस्मितेबद्दलची स्वाभिमानी वृत्ती हे गुण दिसून येतात. (अर्थात गुलामगिरी जोपासण्यासाठीच या वृतीचा दुरुपयोग केला गेला हि गोष्ट वेगळी.) आंग्लदेशातील त्यांची ऎतिहासिक स्थळे त्यांनी अशी काळजीपूर्वक जतन केली आहेत की, ती अगदी कालपरवा उभारल्यासारखी वाटतात.

शिवाजी महाराज म्हणजे पाळ्या राष्ट्राचे दैवत, पण रायगडावरील व इतर गडावरील स्वराज्याचे मोडकळीस आलेले अवशेष पाहन मन विदीर्ण होऊन जाते. मनामध्ये अपराधी भावना आल्यावाचून रहात नाही. हिंदूस्थान वारंवार परकीय आक्रमणाच्या व दहशतवादाच्या छायेखाली का वावरत असतो याचा उलगडा त्या भग्न अवशेषांकडे बघून होतो. आम्हाला शिवाजी राजा कितपत समजला आहे; त्याचाहि हा एक ढळढळीत पुरावा आहे.

आजच्या घडीला अगदी क्षणभर आम्ही शिवरायांच्या सोन्याचा पुतळा उभा करू शकतो. कॉम्पुटरमुळे ते काम अधिकच सोपे झाले आहे. पण प्रत्यक्षात ह्या युगपुरुषाचा स्वराज्य उभारणीमागील हेतू काय होता? त्याची गरज त्यांना का वाटली? त्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले? काय प्रयत्न केले? कोणत्या दिव्यातून पार पडले? त्याचे नियोजन त्यांनी कसे केले? व्यवस्थापन कसे केले? लोकांना सांभाळून कसे घेतले? त्यांनी स्वताच्या विचार केला नाही ? स्वत: पेक्षा स्वराज्य त्यांना मोठे वाटत होते? त्यांनी वतनदारीला विरोध का केला? त्यांना रयतेचा राजा का म्हटले गेले? समर्थांनी त्यांचे कौतुक का केले? या सर्व प्रश्नाचा आम्ही जिज्ञासू वृतीने अभ्यास करू शकू का? त्याची शाश्वती आम्ही देऊ शकू का? ह्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळू शकतील. पण केवळ पुतळे उभे करून ती आम्हाला मिळणार नाही हेही तितकेच सत्य.

कधी कधी वाटते की शिवरायांवरील आपले प्रेम बेडगी तर नव्हे ! कारण पुतळेबाजी आमच्या रक्तात एवढी भिनली आहे कि महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालणे. पाच सेकंद स्तब्धता पाळणे व दोन सेकंद अश्रू गळणे. ह्याच्यापलीकडे जाण्यचा आम्ही सहसा प्रयत्न करीत नाही. महापुरुषांना एकदाचे का दैवत्व बहाल केले कि मग आम्ही आमची दैनदिन कामे करायला मोकळे होतो. "माझ्या हातात काय आहे, देव बघून घेईल त्याचे त्याचे."अशा दैववादी भूमिकेच्या आपण आहारी तर गेलेलो नाही न? अशी चिंता मनाला भेडसावत राहते शिवरायांना आपली ही भोळसट भक्ती मान्य झाली नसती.

शिवरायांना आपण एक चमत्कारिक पुरुष म्हणून न पाहता ते माणूस म्हणून कसे होते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे अष्टपैलू , कौशल्य आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणण्याच्या प्रयत्न आम्ही केला पाहिजे. त्यांनी आपल्या भीमपराक्रम जेथे जेथे गाजवला त्या ठिकाणी भेट देऊन त्या पराक्रमाची पाश्वभूमी समजाऊन घ्यायला हवी. आपासात बंधुभाव जोपासून आपले राष्ट्र प्रगती पथावर कसे राहील ह्याचा विचार सातत्याने व्हायला हवा. थोडक्यात डोळसपणाने शिवरायांना समजून घेणे व आचरणे हाच मार्ग आहे आपल्याला व राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकतो.

शिवाजी महाराजानी आपले जीवन सदगुणांची भक्ती करण्यात व्यतीत केले. संतांचा उपदेश जीवनात आचरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही शिवरायंची लेकरे आहोत. त्यांचा वसा आम्ही उचलला पाहिजे. त्यांचे विचार हृदयाशी कवटाळून ठेवले पाहिजेत. याद्ये आपले व आपल्या राष्ट्राचे हित आहे. परतंत्र्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊ न देणे यातच आपले खरे शहाणपण आहे. "भारतीय आपल्या इतिहासावरून काहीच बोध घेताना दिसत नाहीत." हे चित्र आपण बदलले पाहिजे. भारताचे, विश्वाचे भले करण्याचे सामर्थ्य केवळ शिवरायांच्या विचारात आहे., हे आपण जाणून घेतले पाहिजे.

आजच्या घडीला भारतीय व जागतिक वातारण अनेक समस्यांनी घेरलेले दिसत आहे.आपण डोळसपणे शिवरायांचा अभ्यास करू तर शिवचरित्रामध्ये आपल्या असंख्य समस्यांची उत्तरे मिळू शकतील काळाचाही महिमा असतो. "जे काम तुम्हाला जमत नाही, ते दुसऱ्यांना करू द्या" असे तो म्हणत असतो. काळ परिवर्तन घडवून आणतो. पुढे कदाचित काळाची सूत्रे बदलतीलही, जगभरात वैचारिक मंथन सुरु होईल. नव्या पिढीतील जागतिक विचारवंत जगाच्या भल्यासाठी शिव-चरित्राचा विचार करू लागतील. तेव्हा आम्ही नक्की कुठे असू? आम्ही धडाडीने त्यांचे नेतृत्व करीत असू कि, जा रे त्याच्या मागल्या म्हणत त्यांच्या पाठोपाठ जात राहू?

शिवराय म्हणजे आकाशात तेजाने तळपणारा सूर्य आहेत, आणि त्यांचे चरित्र म्हणजे सदगुणांचा दिव्यप्रकाश आहे. सूर्यनारायणाची किरणे ज्याप्रमाणे अनंत आहेत. आपल्या सहस्त्रबाहुनी ती विश्वाला अंध:कारापासून दूर ठेवतात त्याचप्रमाणे शिवरायांचे आचरण जगाला नेहमीच प्रेरणा देत आलेले आहे आणि यापुढेही देत राहील. सूर्यप्रकाश आपल्याला बघायला शिकवतो, शिवचरीत्र आपल्याला पहायला शिकवते. सूर्यप्रकाश वस्तूचे केवळ बाह्यरंग दाखवतो, शिवचरित्र आम्हाला त्याच्या अंतरंगात नेउन सोडते. असे म्हणतात की, कधी कधी सूर्याला ग्रहण लागते. खरोखरच ! असे काही असते का? 'नाही' ! तो एक भास असतो. ग्रहण सूर्याला नव्हे आपल्या दृष्टीला लागलेली असते. बहूदा चमत्कारांच्या वलयापलीकडे आपली नजर जात असावी. पण त्यामुळेच सूर्य आपल्याला दिसत नसतो, मग त्याच्याकडे रोखून पहाणे तर त्याहून अशक्य.

शिवरायांनी आपल्याला सदगुणाचा खजिना उघडा करून दिलेला आहे. तो तरी आम्ही व्यवस्तीत लुटावयास शिकले पाहिजे. खजिना लुटता लुटता तो दुसऱ्यांना वाटायला जमले पाहिजे. तरच आम्ही स्वताला शिवरायंचे खरे अनुयायी म्हणवून घेऊ शकू. शिवरायांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू होते. धुरंधर राजनितिज्ञ, कुशल, युद्धनितिज्ञ, श्रेष्ठ समाजनितिज्ञ, सुश्म अर्थशास्त्रज्ञ, आद्य क्रांतिकारक, दृष्टेपणा, वैज्ञनिक दृष्टीकोन, अध्यात्मिक दृष्टीकोन स्थापत्यविशारद, कायदेतज्ञ, कणखर नेतुत्व जिज्ञासू व चिकित्सक, रयतेचा राजा, संशोधक, धर्मसंस्थापक, उत्तम भक्त, कलावंत थोर मुत्सद्दी आणि एक माणूस. शिवरायंची हि व अशी असंख्य रूपे आम्हाला कळवळून साद घालत आहेत. महाराज्यांच्या ह्या विविध रूपांचे मार्गदर्शन घेता घेता त्यांच्यातील एकरूपता आपल्या नजरेस आल्याशिवाय राहणार नाही.

हेच ध्यानी मनी बाळगून शिवरायांच्या तेजस्वी प्रतिमेला आपण नित्यनेमाने पुष्पहार अर्पण करूया, पण त्यापेशाही अधिक मनोभावे व जाणीवपूर्वक पूजा आपण त्यांच्या विचारांची करूया. हीच महाराजांना आपण वाहलेली खरी श्रद्धांजली ठरेल. स्वातंत्र्याचा मार्ग ती आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवत राहील.

।। शिवरायास आठवावे । जीवन तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी उरावे । कीर्तिरूपे ।।

।। इंग्रजी शिक्षणपद्धती ।।

फार प्राचीन काळापासून जगभरात भारताबद्दल फार मोठे कुतूहल होते. भारत हा सुवर्णभूमी म्हणून म्हणून प्रसिद्ध होता. संपूर्ण जगाचे धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक नेतृत्व भारताकडे होते. जगाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा उत्पादक देश म्हणून भारताचा लौकिक होता. वास्को-दा-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रीकाखंडाला वळसा घालून १५व्या शतकाच्या उत्तरार्धात (इ.स. १४९८) भारताला पोहोचला. युरोपीय देशांनी आपले नाविक सामर्थ्य फार वाढवलले होते. त्या बाळाच्या जोरावर त्यांनी जगातील इतर प्रांतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने प्रवेश केला.

ईस्ट इंडिया कंपनी हि इ. स. १६०० साली स्थापन केली गेली व भारताशी व पौर्वार्त्य देशांशी व्यापार करणे हेच तिचे प्रमुख धोरण ठरले. इंग्लंड हा देश चिंचुक्या-एवढा एका बेटावर वसलेला होता. परंतु त्याच्या डोक्यात मात्र संपूर्ण विश्व काबीज करण्याची महत्वकांक्षा होती. सुवर्णभूमी भारतासमोर हा देश अगदीच नगण्यावस्थेत होता. इंग्रजांनी भारतात सुरत, राजापूर, कारवार येथे व्यापाराची केंद्रे उघडली.
इंग्लंड हा देश अन्नधान्ये व इतर वस्तू याबातीत स्वयंपूर्ण नव्हता म्हणून त्या गोष्टींची गरज भागवण्याकरीता त्यांना इतर देशांवर अवलंबून राहावे लागे. साहजिक नौकानयनामध्ये इंग्लंड पारंगत होता. थोमस मन ह्या समकालीन अर्थतज्ञाने ईस्ट इंडीया कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे.

" आपला देश हा समुद्राने का वेढला आहे? आमच्या लोकांच्या गरजा आमच्या खलाशांनी दुसऱ्या  देशात जाऊन कमीत कमी परिश्रम करून पुरवाव्यात म्हणूनच आम्हाला समुद्राचे वरदान लाभले आहे. अरबस्थानातील मसाल्याचे जिन्नस आम्ही तेथील हाह्क उन्हाची झळ न अनुभवता घरबसल्या घेऊ शकतो. आम्हाला रेशमी कपडे मिळतात पण त्यासाठी श्रम पडले नाही. द्राक्षांचे मळे आम्ही कधी फुलवले नाहीत पण मदिरेचा आस्वाद आम्ही घेतो. आम्ही खाणी खणल्या नाहीत पण त्यातून निघालेली संपती आपणास विनासायास मिळते. आम्ही दूरवर संचार करतो. आपली जहाजे पेरतो व जगातील प्रतेक देशाकडून उत्तमोत्तम वस्तू मिळवतो."
कंपनीने पत्रात लिहल्याप्रमाणे आपला हिंदूस्थानातील कारभार हळूहळू वाढवत नेला व हिंदूस्थानातील राजकारणात प्रत्यक्ष भाग घ्यावयास सुरवात केली. हे इंग्लंडमधील एडमंड बर्क नावाच्या तात्कालीन विचारवंताला खटकले. त्याने कंपनीचा धोरणावर टिका केली. बर्कच्या मते "कंपनी सरकार हे एक अत्यंत भ्रष्ट, जुलमी, आणि विनाशकारक सरकार आहे आणि कदाचित जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे सरकार कधीच  अस्तित्वात आले नसेल. कंपनीने ह्या विधानाकडे दुर्लक्ष करून आपले पूर्वीचे धोरण कायम ठेवले.
शिवाजी राजासमोर कंपनीची डाळ शिजेना. त्यांनी आपले लक्ष हिंदूस्थानातील इतर भागावर केंद्रित केले. कंपनीला मराठ्यांकडून सर्वाधिक विरोध झाला. परंतु हिंदूस्थानातील अंतर्गत यादवीमुळे व मराठ्यांना आपापसंतील दुहीमुळे इ. स. १८१८ साली कंपनीने हिंदूस्थानावर पूर्णपणे कब्जा मिळवला.
आता कंपनीला आपली सत्ता कायम राखण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या योजाव्या लागल्या. बंगाल, मद्रास व इतर प्रांतातून इंग्रजांना जास्त विरोध झाला नाही. सगळे आपणहून शरण आले. पण मराठ्यांचे तसे नव्हते. मराठ्यांनी स्वातंत्र्याची हवा चाखली होती. ते इंग्रजांना जुमानत नसत. इंग्रजांना हे पक्के ठाऊक होते की "भारतातील इतर प्रांतांना केवळ भूगोल आहे पण मराठ्यांना इतिहासदेखील आहे." मातीच्या ढेकळाचे रुपांतर अवाढव्य आहे पण मराठ्यांना किल्लामध्ये करण्याची किमया फक्त मराठ्यांना अवगत होती. मराठ्यांचे इंग्रज धार्जिणे बौध्दिक परिवर्तनाचे कार्य इंग्रजांनी घेतले होते.
इ. स. १८९७ च्या सुमारास पुण्यात आलेला जी. डब्लू. स्टीव्हन्स म्हणतो, "आपण (इंग्रजांनी) हिंदूस्थान जिंकला तो मराठे आणि शिखांपासून इतर हिंदुपासून व मुसलमानापासून नाही. शंभर वर्षापूर्वी आपण किती मोठे होतो आणि आज आपल्याला ह्या दशेत (पारतंत्र्य) कोणी आणले यांचा त्यांना (मराठ्यांना) अद्याप विसर पडला नाही. इतर सत्तेपेक्षा मराठ्यांचे नुकसान जास्त झाले हे त्यांना जाणवते. इतर सत्ता आपल्याला (इंग्रजांना) बिनविरोध शरण आल्या; मराठ्यांना मात्र आपल्याला रणांगणात जिंकावे लागले. इतरांना इंग्रज म्हणजे जुने धनी जाऊन नवीन धनी आले येवडाच फरक झाल्यासारखे वाटते; पण मराठ्यांना आपण धनी होतो, पण आत्ता गुलाम आहोत. ह्याची सतत खंत वाटत होती. "वरील मथल्यावरून इंग्रजांनी मराठ्यांचे पाणी कुठवर ओळखले होते हे दिसून येते. आपल्याला विरोध करण्याची हिंमत फक्त मराठ्यांत आहे हे धूर्त इंग्रजांना पक्के ठाऊक होते.

इंग्रजांनी मराठ्यांचे तथाकथित बौद्धिक परिवर्तन सुरु केले. आपली राजसत्ता तुकून राहावी अशी फायद्याची मतप्रणाली त्यांनी हिंदूस्थानी जनतेत आपल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीद्वारे रुजवली. मराठ्यांना सरकार दरबारी सत्तेची उच्च स्थाने कदापि मिळू नये ह्यावर इंग्रजीसत्तेचा कटाक्ष असे. लॉर्ड मेकोले नावाच्या गृहस्थाने भारतातील इंग्रजी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे असा मेकोलेचा आग्रह होता. "इंग्रजी शिक्षण दिल्याने पाश्यात्य विभूषित असा भारतीयांचा एक वर्ग इंग्रजी संस्कृतीचे सातत्याने गोडवे गात राहिल. जन्माने भारतीय परंतु विचार आचार व मनाने इंग्रजी अशी माणसे ह्या ठिकाणी तयार केली पाहिजेत. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय लोक युरोपियन शासन, संस्थाची मागणी करू लागतील तर तो दिवस इंग्रजांचा इतिहासातील अत्यंत अभिमानाचा दिवस असेल." असे मेकोलेने म्हटले होते. शिवाय पाच्यात्य शिक्षणामुळे विलायती वस्तूंची आवड निर्माण होईल व त्यामुळे आपल्या (इंग्लंडच्या) वस्तूंना योग्य गिऱ्हाईक मिळेल अशीही एक व्यापारी विचारधारा होती.
युरोपात फ्रेंच, ईटली, जर्मनी, रशिया या राष्ट्रात राजकीय क्रांत्या झाल्या पण इंग्लंडमध्ये अशी राजकीय क्रांती झाली नाही. ह्याचे कारण म्हणजे औधोगिक क्रांती. इंग्रज पक्के व्यापारी होते. इंग्लंडने जगभरात आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. त्या वसाहतीमधून इंग्लंडला मुबलक प्रमाणात कच्चा माल मिळू लागला होता शिवाय पक्का माल विकण्यास तयार बाजारपेठाही मिळाल्या. त्यातूनच इंग्लंडमधील स्थानिक जनतेला रोजगार मिळू लागला व इंग्लंडची राज्यक्रांती टाळली गेली. त्याजागी भांडवलशाहीचे बीज रोवले गेले. स्थानिक प्रजेचे कामगार वर्गामध्ये रुपांतर झाले.  त्यांचे शोषण पुढे तसेच चालू राहिले.

पुढे 'नेपोलियन बोनापार्ट' सारख्या जबरदस्त विरोधकाला इंग्रजांनी इ. स. १८१५ साली नेस्तनाबूत केले. त्यामुळे इंग्रजांना भारतातील आपल्या कारवाया अधिक वेगाने करण्याची संधी प्राप्त झाली. आर्थिक विस्तारवादी हे भारतामधील इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाचे प्रमुख अंग होते. दुय्यम स्थान धर्मप्रसाराला दिले होते. इंग्रजांनी भारताला कच्चा मालाच्या निर्यातदार व पक्का मालाचा आयातदार बनवून ठेवले. भारतातील शिक्षणपद्धतीमध्ये जाणूनबुजून राष्ट्रवादी विचारांचा अभाव ठेवला गेला व भारतातील शिक्षण पद्धती कारकूनी व सरंजामशाहीला प्रोत्साहन देणारी अशी बनवून ठेवली.

इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे आम्हा भारतीयांचा भूगोल तोंडपाठ झाला. पण त्या भूगोलाचा आत्मा 'इतिहास' मात्र भुईसपाट झाला. इतिहासातून, गत अनुभवातून शिकवण्याचे कसब आम्हाला शिकवले गेले नाही. जेणेकरून आम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करीत राहाव्या. इंग्रजांनी इंगजधार्जिण्या इतिहास आम्हाला शिकवला. मध्ययुगीन सुलतानांनी मराठ्यांना वतनावरून झगडाला शिकवले आणि इंग्रजांनी जातीवरून भांडायला शिकवले. आपल्या हुकुमशाही व्यवस्थेवरून लोकांचे चित विचलित करण्याकरिता इंग्रजांना भारतीयानमध्ये भांडणे लाऊन देण्याच्या कार्यक्रम अधिक उपयुक्त वाटला. इंग्रजांनी जातीयवादाला, अंधश्रद्धाना खतपाणी घातले. त्यासाठी इंग्रजांनी एक नवीन 'आयडिया' शोधून काढली. आर्य आणि आर्यतर असे खोटे संशोधन भारतीयांच्या कपाळी मारले. आर्य खैबरखिंडीतून भारतात आले व त्यांनी येथील मूळ लोकांवर अत्याचार केले म्हणे ! जणू काही इंग्रज लोक हे स्थलांतर होत असताना एका टेकडीवर बसून बघत होते. एखाद्या हॉलीवूड चित्रपटात शोभावे असे बिन-बुडाचे हास्यास्पद सिद्धांत इंग्रजांनी इंग्रजपढीत? (इंगजपिडीत) भारतीय इतिहासकारांचा गली घोटवले. ह्या आंग्ल- विद्याविभुषित ! तथाकथित इतिहासकारांनी आपली बुद्धी गहाणच ठेवली होती. इंगजी भाषा म्हणजे ह्यांना परमात्म्याचा प्रसाद वाटत असे. मग हे इंग्रजपिडीत तथाकथित इतिहासकार जणू देवाच्या साक्षात्कार झाला अशा थाटात ते इतर भारतीयांना सांगू लागले. त्याचा परिणाम असा झाला की 'ब्रिटिशांचे राज्य हा दैवी प्रकोप नसून एक मोठी दैवी देणगी आहे.' असे मानणाऱ्या विचारवंताच्या ! एक गट नंतरच्या काळात भारतीय राजकारणाच्या अस्तित्वात आला. त्यातूनच पुढे मवाळवाद जन्माला आला. क्रूरकर्मे सुलतान लोक ह्यांच्या लेखी शांतीचे दूत बनले आणि भारताच्या स्वातंत्रासाठी फासावर जाणारे वीर क्रांतिकारक हे वाट चुकलेले देशभक्त ठरले. इंग्रजी शिक्षणपद्धतीने भारतीयांचे मने नासवली.

काय झाले तुझा असा देवदास का?झाला.जगात जेथे जेथे इंग्रजी साम्राज्य होते तेथे इंग्रजांनी तेथील जनतेची दिशाभूल करण्याच्या कार्यक्रम राबवला. एतदेशीय समाजात भांडणे लाऊन त्याचा फायदा ब्रिटीश-राजवटीला करून घेणे हि इंग्रजी 'devide and rule' नीती भारताला फार घातक ठरली. समानतेऐवजी विषमताच इंग्रजी शिक्षणाने पोसली गेली. त्याचा फटका राष्ट्राच्या एकात्मतेला, एकीकरणाला बसला व देश फाळणीच्या उंबरठ्यावर उभा राहिला.

१९४७ साल उजाडले. इंग्रज भारतातून निघून गेले. परंतु इंग्रजांची विषारी शिक्षण व्यवस्था, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था तशीच राहिली. आज साठ वर्षांनी आपल्याला त्याचा प्रत्यय पुरेपूर येत आहे. परकीय शिक्षणपद्धतीची किड  आज आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. जातीभेद पूर्वीपेक्षा जास्त उफाळून वर येत आहेत. कारण एकच "विंचू निघून गेला पण आपली विषारी नांगी आपल्या व्यवस्थांचा माध्यमाने येथेच ठेऊन गेला."

सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे भारतीयांचा असा एक गोड गैरसमज निर्माण झाला आहे की आमचे पूर्वीचे लोक, अडाणी, अशिक्षित, मागासलेले होते. भारत खूप दरिद्री होता. पण आपल्या डोक्यात चुकुनही असा प्रश्न निर्माण होत नाही कि, भारत खोरोखर जर इतका दरिद्री होता, तर ह्या दरिद्री भारतात इंग्रज लोक व्यापार करण्यास उस्तुक का होते? गरीब भारतातून इंग्रजांना असा काय नफा मिळत होता? जर नव्हता ! तर काय इंग्रज लोकांनी भारताला श्रीमंत करण्याचा विडा उचलला होता काय? आणि भारताची भरभराट करण्याचे उदात्त कार्य करण्यासाठीच, हे टोपीकर सभ्य ! गृहस्थ आपली मुलेबाळे सोडून साता- समुद्रापार आले होते काय? तरीही आपण असे समजू की, इंग्रजांनीच भारताची भरभराट केली. तर मग इ. स. १९४७ साली आपण अशा ह्या सभ्य ! लोकांना 'चले जाव' 'quit indiya' असे का म्हटले? भारताला मदत करणाऱ्या ! अशा ह्या पुण्यवान  ! इंग्रजांना या देशातून 'चले जाव' म्हणणारे आपले सगळे देशभक्त मूर्खच म्हटले पाहिजेत !

इंग्लंड हा देश स्वत:तरी खूप समृद्ध होता काय? अन्नधान्ये व कच्चा माल ह्यासाठी तो इतरांवर अवलंबून होता. कारखानदारीचे सगळे बाह्य दुष्परिणाम इंग्लंडच्या स्थानिक प्रजेला भोगावे लागत होते. दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्रजांचे कंबरडे मोडले होते. आग्नेय आशिया व भारताची पूर्वोत्तर राज्ये आझाद हिंद सेनेने ताब्यात घेतली होती. मुंबईतील नौ- सेनिकही बंड करून उठले होते, तेव्हा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान यांनी संसदेमध्ये स्पष्ट सांगितले की, " भारताला आपण पूर्वीप्रमाणे गुलाम बनवून ठेऊ शकत नाही. तेव्हा त्याला स्वतंत्र करणे क्रम:प्राप्तच आहे.'

याची कुणकुण लागताच इंग्रजपिडीत वर्ग पुढे सरसावला व म्हणू लागला की 'भारताला स्वतंत्र मिळाले; इंग्रजांनी भारताला स्वातंत्र दिले.' इंग्रजांनी भारताला स्वातंत्र दिले ? खरे काय होते ? वास्तविक इंग्रजांनी भारताला स्वातंत्र दिले हे चूक असून "भारतीयांची इंग्रजांकडून ते लढून मिळवले" हे सत्य होय. स्वातंत्र काय कुठे रस्त्यावर पडले होते काय? ते मिळवायला ! इंग्रजपिडीत पोपटानी भारतीयांमध्ये स्वदेव, स्वदेश, स्वधर्म, यांच्या बद्दल आकस निर्माण करण्याव्यतिरिक्त दुसरे काही केले नाही. इंग्रजांनी अब्जावधी रुपयांची संपती भारतातून लुटून नेली, याबद्दल हे इंग्रजपिडीत एक अवाक्षरही चुकून काढत नाहीत. म्हणून आपणा सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे की हे विषारी शिक्षणपद्धतीचे बांडगूळ उखडून त्याजागी स्वदेव, स्वदेश आणि स्वधर्म शिकवणारी नवी शिक्षणपद्धती आचरणात आणली गेली पाहिजे, तरच हिंदूस्थानचे स्वातंत्र अबाधित राहू शकते.

जय भवानी जय शिवाजी
जय हिंदुराष्ट्र.

।। स्वातंत्र्याची प्रतिष्ठापणा ।।

छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदूपातशाहीचा पाया घातला. रयतेचे स्वराज्य निर्माण केले. अखंड भारत वर्षामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. शिवरायांनी कशाच्या बळावरती हे स्वराज्य, स्वतंत्र साध्य केले? तलवारीच्या ? नाही ! ती तलवार पकडणाऱ्या बाहूंच्या बळावर अशक्यप्राय ते शक्य करून दाखवले. पण ते बल त्या बाहूंमध्ये आले कुठून? हृदयामधून . प्रेमाशिवाय माणसे एक होणार नाहीत आणि माणसे एकत्र आल्याशिवाय समाज निर्माण होणार नाही. जर समाजच नसेल तर धर्माचे कार्य काय राहते? शिवरायांनी हे बरोबर ओळखले होते. प्रेम व जिव्हाळा हे राजांच्या धर्मसंस्थापनेमधील प्रमुख सूत्र होते. " ज्ञानेश्वर माऊलीने पाया रचला, तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला आणि या भागवत धर्माच्या मंदिरात स्वातंत्रदेवतेची प्रतिष्ठापना केली ती युगपुरुष शिवाजी महाराजानी." स्वराज्य निर्मिती प्रेमाच्या अधिष्ठानावर झाली होती. द्वेषाच्या नव्हे. याउलट सुलतानी सत्ता व फिरंगी सत्ता ही द्वेषावर आधारित होती. भायावार आधारित होती.

शिस्त नसेल तर ते स्वराज्य कसले. सुलतानी आमदनी मध्ये रयत बेशिस्त गुलामी विचारसरणीने वाढलेली होती, परावलंबी झाली होती. ते स्वयंप्रेरीत असे शासन नव्हते. जुलूम, जबरदस्ती, भय यांचा अमल होता, राजांनी सर्वप्रथम राज्याला शिस्तीचे धडे दिले. कायदे कडक केले. माता भगिनी यांच्या शील रक्षणासाठी स्वराज्याची उभारणी झाली होती. सैनिकांनी कठोर शिस्तपालन करावे लागे. प्रेजेला उपद्रव होता कामा नये. निष्काळजीपणा चालणार नाही. रयतेचा भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. उंदीर वात पळवून नेईल इतके बारीक नियोजन राजानी राबवले.होते. युद्धावर जाताना बाई, बटीक ठेवण्यास सक्त मनाई होती. जो कुणी उल्लघन करेल त्याची गर्दन मारली जात असे. हि शिस्त डोळे वटारून आलेली नसे तर प्रबोधन, सामंजस्य, शिक्षणाच्या सहाय्याने शिस्तीचे महत्व पटवून दिले जात असे. स्वराज्याची प्रजा शहाणीच हवी. गडाचे दर्वजी ठराविक वेळी बंद केले जात. केवळ राजांच्या परवानगीनेच ते उघडले जात. हिरकणीची कथा आपणास ठाऊक आहेच.

स्वराज्याला परकीयांचा जसा धोका होता तसाच स्वकीय म्हणवणाऱ्या काही लोभी लोकांचाही होता. शिवरायांनी खंडोजी खोपडयाचा एक हात आणि एक पाय कलम करण्याची शिक्षा दिली. त्यामागील हेतू हाच होता कि स्वराज्य द्रोहांवर वचक बसावा. खंडोजीला शिक्षा देणे क्रमप्राप्तच होते, नाहीतर जनतेचा असा समज झाला असता की स्वराज्यात गुन्हे करून केवळ माफी मागितली तरी चालते. अशाने रयत बेशिस्त होण्याच्या धोका होता. सुलतानांनी मराठ्यात भांडणे लावण्याकरिता वतनाची शक्कल लढवली होती. वतन हा मादक पदार्थ. ज्याप्रमाणे दारू प्यायलेला मनुष्य सर्वात आधी आपल्या पत्नी, मुलाबाळांची धूळधाण उडवतो त्याचप्रमाणे हे वतनाची दारू ढोसलेले स्वकीय! स्वराज्याच्या नाशावर टपलेले त्याच्याभोवती घुटमळत असत. केल्व्ल नावापुरते ही वतनदारी पद्धत स्वराज्यातून काढून टाकली.

।। राजस्थानचे सुंदर महाल आणि महाराष्ट्राचे ओबडधोबड दुर्ग -तुलनात्मक स्पष्टीकरण ।।

शिवरायांनी धर्मसंस्थापनेचे महान कार्य तडीस नेले. हिंदूस्थानाला आदर्श युद्धनितीची देण दिली. महाराजांनी सत्य व अहिंसा यांची पुर्न:प्रतिष्टापना केली. दुर्देवाने राजपुताना ह्या गोष्टी साध्य करता आल्या नाहीत. मिर्झाराजेंनी शिवरायांसोबत हात मिळवणी केली असती तर? पण ६० वर्षाच्या मिर्झा राजेना जे जमले नाही ते त्यांच्या हाताखाली सैन्यात असणारयाछत्रसाल ह्या वीस वर्षाच्या युवकाला कळले छत्रसालाने छत्रपतींचा वसा उचलला. महाराजा छत्रसाल म्हणजे बुंदेलखंडाचे व हिंदूस्थानाचे भूषण म्हणून त्यांचे नाव आपण आजही आदराने घेतो. मिर्झा राजांच्या वाट्याला हे भाग्य आले नाही. मिर्झाराजे खरोखरच पराक्रमी, शूर, धाडसी, मुत्सदी होते पण त्यांच्या गुणाचा हिंदूस्थानला उपयोग होऊ शकला नाही. ह्याचे वाईट वाटते. राजपुताना महालाची तीच अवस्था आहे.

राजस्थानातील राजपुतांचे महाल, हवेल्या अतिशय कमनीय सुंदर, नक्षीदार आहेत. जराही ओरखडे न उमटलेले व अजूनही जसेच्या तसे हे महाल पाहण्यासारखे लक्ष वेधून घेतात. उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र व मनमोहक वास्तु वास्तुशास्त्रांची ती एक उतम पेशकश आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक अवश्य करायला हवे. त्यांचे सोंदर्य डोळ्यांमद्ये साठवून ठेवावेसे वाटते. राजस्थानातील हे सुंदर ऐतिहासिक महाल पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणेमध्येही आपापल्या वास्तुश्त्राचे अदभूत नमुने पाहायला मिळतात. साहजिकच महाराष्ट्रातील नागरिकांना असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे की आपल्याकडे त्यांच्यासारखे प्रचंड महाल हवेल्या का? बांधल्या गेल्या नाहीत? मराठ्यांना ती कला अवगत नव्हती काय? आपल्याकडे ही हवेली श्रीमंती का बघायला मिळत नाही? याचे कारण म्हणजे निव्वळ बाह्य सोंदर्य न्याहाळण्याच्या ओघात काही अंतर्गत गुड रहस्याकडे आपले लक्ष म्हणावे तितके जात नाही.

जेव्हा कधी मराठांच्या काळ्या - कभिन्न, ओबडधोबड किल्ल्यांशी राजपूतांच्या महालांशी तुलना केली जाते तेव्हा काही गोष्टी ह्या स्पष्टपणे मांडाव्याच लागतात. ज्याप्रमाणे शरीरावर सोन्याचे दागिने, हिरे- माणकांची आभुषणे घातलेला एखादा दुर्बल मनुष्य गुंडांच्या तावडीत सापडल्यावर त्याची काय गत होईल? त्याला आपली श्रीमंती म्हणजे शाप वाटू लागेल त्याचप्रमाणे अंगी जर शोर्य नसेल तर त्या टोलेजंगी वाडे, सोन्या - रुप्याला, सौंदर्याला 'सुरतेला' काय महत्व आहे. इनायतखानाच्या सुरतेसारखीच त्यांची अवस्था होईल. पराक्रमशिवाय सौंदर्य हा शाप ठरवतो असे म्हणतात.

शिवाजी महाराज हे इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन करीत असत. सोमनाथाचे मंदिर गजनीच्या सुलतानचे तब्बल सहा वेळा लुटले होते. म्हणजे हिंदूची धर्मभावना किती गाफील असावी याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. सहा वेळा ते सोमनाथचे मंदिर हिऱ्या माणकांनी गढवण्यात गुंग होऊन गेले पण त्याचा संरक्षणास त्यांना वेळ मिळाला नाही. आपला सगळा पराक्रम हिऱ्या माणकांच्या आच्छादनाखाली त्यांनी झाकून ठेवला होता. परमेश्वर त्यांना समजला नव्हता. इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत राहिली. पुढे यादव साम्राज्य आले. रामदेवरायानेही तीच चूक पुन्हा केली. पराक्रम लोप पावला आणि कपाळी गुलामगिरी आली. हेमाडपंताने सुबक देवळे उभारली होती. त्याच्या धडाधड मशिदी होऊ लागल्या. कबरींचे पीक आले.

महाराज ह्या सर्वांचे सिंहावलोकन करीत होते. महाराज संपत्तीचे मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र उत्तमरित्या जाणत होते. महाराजानी ओळखले "प्रराकाम हा पुरुषांचा आणि लज्जा हा स्त्रियांचा दागिना आहे." स्वराज्याला त्याचीच गरज आहे दुसरी कशाची नाही. महाराजांनी स्वराज्याचे धन हे दुर्गबांधणीसाठी, आपले सैन्यदल सुसज्ज करण्यासाठी, प्रजेचे, सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे पालन, देवा-धर्माचे रक्षण यामध्ये गुंतवले होते. राजांनी पोकळ डामडौल, दिखाऊगिरी पोसली नाही. जीवाभावाची माणसे हे महाराजांचे प्रमुख भांडवल होते.राजांनी हे जिवंत भांडवल स्वराज्याच्या प्राणरक्षणासाठी वापरले. एकीकडे राजपूत लोक मुघलांची गुलामगिरी करण्यात, आपले महाल सांभाळण्यात गुंतले होते. तर इकडे महाराज स्वातंत्रदेवताची उपासना करत होते. रयतेचे सुख पहात होते. मोठमोठी देवळे व महाल बांधून सुद्धा जी स्वतंत्रदेवता राजपुताना प्रसन्न झाली नाही ती शिवरायांना झाली.

राजपुतांनी आपले महाल जसेच्या तसे टिकवले. पण त्यासाठी त्यांना गुलामीची खंडणी मुघलांना द्यावी लागली. याउलट मराठ्यांनी दिखाऊ सौंदर्याला कधीच किंमत दिली नाही. संरक्षण व स्वाभिमान हे त्यांचे मुख्य सूत्र होते. मराठ्यांना आपल्या सुंदर वाड्यापेक्षा स्वराज्यातील माता-भगिनीचे शील-रक्षण अधिक प्रिय होते, त्यासाठी ते आक्रमकांशी झुंजले.

लढाईत सौर्य गाजवून आलेल्या सैनिकांचे सौंदर्य कशात आहे?
आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र टिकवण्यासाठी त्याने शरीरवर अनेक घाव झेललेले असतात. त्या सर्वांच्या खुणा म्हणजे स्वातंत्र देवतेने त्यांना केलेले कुंकुम- तिलक होय.त्या जखमा म्हणजे स्वातंत्र देवतेचे सौभाग्य होय. सौभाग्याची तुलना हिरे, मोती, व पाचू इत्यादीने केली जात नाही. स्वातंत्रदेवता बाह्य सौंदर्यावर फिदा होत नाही. पुरुषार्थाला ती जीवेभावे ओवाळते. महाराष्ट्राचे लढवय्ये दुर्ग अजूनही त्या शौर्याच्या खुणा, स्वातंत्रलढयाचा इतिहास अंगावर बाळगून आहेत. ह्या दुर्गांकडे पहिले की मन अभिमानाने भरून येते. स्वातंत्रदेवतेने दिवसरात्र एक करून घडवलेली ती शिल्पे आहेत. आपल्या रक्त व अश्रूंचा आभिषेक तिने त्या शिल्पांवर केला आहे. स्वराज्याची सुगंधी फुले त्यावर उधळलेली आहेत. आणि त्या अप्रतिम शिल्पाला तिने मनोभावे वंदन केले आहे.

महाराष्टाचे दुर्ग म्हणजे काळे पाषाण आणि दगडगोटे नाहीत. हे दुर्ग स्वराज्याच्या शिल्पाराने (शिवरायाने) घडवलेली स्वराजाची महान शिल्पे आहेत. हिंदूस्थानचे पुन:रुज्जीवन महाराष्ट्रच्या या ओबडधोबड दुर्गानीच केले आहेत. जर महाराष्ट्र परकीयाविरुद्ध लढला नसता, तर राजस्थानातील महालाच काय! परंतु हिंदुस्थान राष्ट्रही आपल्याला बघायला मिळाले नसते. महाराष्ट्राच्या दुर्गानी राष्ट्राचे संरक्षण व नव-निर्मितीमध्ये फार मोलाची भूमिका बजावली. ते भाग्य राजस्थानातील सुंदर महालाच्या नशिबी आले नाही.

म्हणूनच आज महाराष्टाचे दुर्ग म्हणजे भारतमातेच्या मुकुटातील गौरवमणी होत. त्यांची तुलना राजपुतांच्या महालांशी होऊ शकत नाही. रत्नजडीत म्यानामाद्ये पडून राहिलेल्या सोनेरी तलवारीसारखेच राजपुतांचे महाल आहेत. त्यांनी स्वातंत्र्याची हवा कधी अनुभवलीच नाही. राजपुतांचे महाल म्हणजे मूर्तिमंत शापित सौंदर्य आहे.

इ. स. १८१८ साली इंग्रजांनी भारतावर ताबा मिळवल्यावर सर्वात आधी कोणते काम केले असेल तर महाराष्ट्राच्या दुर्गाची नासधूस; कारण त्यांना ठाऊक होते की हे केवळ दगड - मातीचे ढिगारे नाहीत. ही मराठ्याची स्फूर्तीस्थाने आहेत. याउलट राजपुतांचे महाल अगदी तसेच शाबूत राहिले कारण इंग्रजांना हेही ठाऊक होते की हिंदूस्थानच्या जनतेला गाढ निद्रेत नेण्यासाठी हे महाल उपयोगी पडतील. अजूनही महाराष्ट्रचे दुर्ग जनतेची हि गाढ निद्रा संपण्याची वाट पहात मोठ्या आशेने उभे आहेत.

।। शिवरायांची अर्थनिती ।।

शिवकालीन आर्थिक जीवन हे मुख्यत: शेतीविषयक निगडीत होते. त्यामुळे शेतीचे रक्षण व संवर्धन ही धोरणे शिवरायांनी प्रामुख्याने राबवली. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तो काळ सुलतानी जुलूम जबरदस्तीचा होता. अशा वेळी शिवरायांचे स्वराज्य हे लोकांना जुलूम जबरदस्तीचा होता. आशावेळी शिवरायंचे स्वराज्य हे लोकांना वरदानच होते. मुख्य म्हणजे शिवरायांचा स्वराज्याचा मुख्य सृष्टीकोन हा शोषणावर आधारित नव्हता.स्वतःची तुंबडी भरून घेण्यासाठी राजांनी स्वराज्याचा निर्माण केले नव्हते. स्वराज्याला धर्माची जोड होती. पिक लावणीच्या काळात शेतकऱ्यांना विशेष सरंक्षण दिले जाई. शेतकऱ्यांचे नुकसान ते स्वराज्याचे नुकसान हे राजांना पक्के ठाऊक होते. शेतकरी गाव सोडून जाऊ नये याची काळजी घ्यावी लागे. एका चोराला शेतकऱ्याने पकडून बेदम मारले. तेव्हा तो चोर मारला गेला. राजांनी शेतकऱ्याची प्रशंसा केली व चोराचे प्रेत वेशीवर टांगून ठेवण्यात आले. रयतेवाचून स्वराज्य म्हणजे म्हणजे आत्मावाचून शरीर. शेतकरी हा स्वराज्याचा आत्मा होता. सुलतानी बरोबर रयतेला आस्मानीला तोंड द्यावे लागे. असाच एक भयंकर दुष्काळ १६३० साली पडला होता. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या ह्या दुष्काळामध्ये मरण पावली. तुकाराम महाराज ह्यांची प्रथम पत्नी व मुले ह्या दुष्काळाने खाल्ली. त्यावर  तुकाराम महाराज म्हणतात. ।।
"बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।। माणसांनी माणसाला खाल्ले असे दुष्काळाचे भयंकर वर्णन आहे.

शिवरायांनी प्रजेसाठी बंधारे बांधले. कालवे व विहिरी यांची सोय केली. व पाणी नियोजनासाठी जनतेला उत्तेजन दिले. पाण्यावर मालकी सरकारची असे. कोंढावे (पुणे) जवळ येसाजी पाटील यांनी राजांच्या हुकुमानुसार पाणवठ्यातील एक मोठा धोंडा फोडला. त्याला बक्षिस म्हणून रजनी जमीन दिली. शिवकालामाद्ये जमिनीच्या प्रतीवर शेतसारा ठरत असे. शिवाय पिकांच्या पद्धतीवर देखिल ठरत
आकाराला जाई.रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नका असा सैन्याला सक्त आदेश होता. कल्याण - भिवंडी प्रांतात उत्कृष्ट प्रतीचे जहाज बांधणीचे व इमारतीचे लाकूड मिळत असे म्हणून राजांनी कल्याणला आपला जहाज बांधणीचा कारखाना काढला. आंबा, फणस, साग, वड, पिंपळ इत्यादी उपयुक्त झाडे परवानगीशिवाय तोडू नये असे आदेश होता, पऱमुलुखातून साग व इतर कच्चा माल आयात केला जात असे. शिवाय स्वराज्याचा रक्षणासाठी, गनिमी काव्यासाठी जंगलाचा वापर नैसर्गिक तटबंदी म्हणून केला जाई.

राजांनी उदयोगधंदयाला प्रोत्साहन दिले. बारा बुलुतेदारी त्याकाळी विशेष प्रचलित होती. खेडे हा आर्थिक जीवनाचा पाया होता. त्याकाळी खेडी ही स्वावलंबी होती. प्रत्येक खेडे म्हणजे एक कुटुंबरचना होती. ग्रामीण उत्पादन गावातील लोकांसाठी गावातच केले जाई. सोनार, लोहार, तांबट, सुतार, चांभार, कुंभार, कोष्टी, बाणकरी, मांग, तेली, धनगर, कोमटी, शिंपी, न्हावी, परीट, गवंडी,
माळी, कोळी, रंगारी, पखवाजी, पावेकरी, टाळकरी,. विणेकारी, किर्तनकार, गायक, नर्तिका, गारुडी, तांबोळी इत्यादी अठरापगड जातीचे लोक आपापला व्यवसाय गुण्यागोविदाने करत असत. राजे नेहमीच कर्माला जास्त प्राधान्य देत असत. त्यांना एकच जात ठाऊक होती. 'माणुसकी'. गावामध्ये आठवड्याचा बाजार भरत असे. त्या बाजारामध्ये गावातील व शेजारील गावातील विक्रेते आपला माल विकू शकत. राजांनी रायगडावर देखिल अशीच एक बाजारपेठ बांधली होती.

कोकण व घाट यांच्यादरम्यान विशाल सह्याद्रीची रांग आहे. फार प्राचीन काळापासून या दोहोंना जोडणारे घाट अस्तित्वात होते. पायवाटा होत्य. नाणेघाट,थळघाट, बोरघाट, फोंडाघाट, आंबाघाट इत्यादी घाटामधून मालाची ने- आण ही. या घाटामध्ये शिवरायंनी जकातीसाठी चौक्या बसवल्या होत्य. घाटांचे रक्षण व नियंत्रण डोंगरी किल्यामार्फत केले जाई. मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने नियंत्रण डोंगरी किल्यामार्फत केले जाई. मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने बैलगाडी, घोडागाडी व गाडव यांचा उपयोग केला जाऎ. पालखीचा उपयोग श्रीमंत लोख करीत अस्त. राजांनी स्वदेशी कारागिरांना नेहमीच चालना दिलि. घाटमाथ्यावर पोर्तुगीजांनी केलेले मीठ सर्रास विकले जात होते. राजांनी पोर्तुगीज मीठावर जबरदस्त जकात बसवली व कोकणच्या मीठाला देशाची बाजारपेठ मिळवून दिलि. स्वराज्यात शोषणाचे प्रमाण जवळपास बंदच झाले होते. चौल, कल्याण, भिवंडी, दाभोळ, राजापूर, वेंगुर्ले ही उद्योगधंदयाची केंद्रे म्हणून भरभराटीसाठी आलेली होति. येथे अन्नधान्य, मसाल्याचे जिन्नस, कापड, फळे, प्राणी, विक्रीसाठी ठेवलेले अस्त. महाराजांनी गुलामांचा व्यापार बंद करून टाकला. शिवरायांनी मस्कत, एडन येथे व्यापार करण्यासाठी गलबते बांधली होती. महाराजंचे एक गल बत एडनहून मुंबई बंदरात ई. स. १६६९ साली दाखल झाल्याची बातमी सुरतेच्या इंग्रजी दफ्तरात होति. राजांची कच्चा मालाची आयात व पक्का मालाची निर्यात हे धोरण ठेवले होते. राजांनी कच्चा मालाची आयात व पक्का मालाची निर्यात हे धोरण ठेवले होते. घोडदळास उत्तम अरबी घोडे हवे असत. ठाण्याजवळील घोडबंदर हे घोड्यांचा आयात - निर्यातीचे बंदर म्हणून नावाजलेले होते.

राजांनी डच, फ्रेंच यांच्यापासून स्वराज्याला कसा फायदा होईल ते पाहीले. इंग्रज हे फार धूर्त होते. इंग्रजांनी आपले चलन स्वराज्यात चालू दयावे ही विनंती राजांना केली. राजांनी ती धुडकावून लावली. इंग्रजी व्यापाऱ्यांबाबत राजे सावध असत. त्यांना ठाऊक होते होते की यांच्या व्यापारी टोपीखाली राजकारण शिजत आहे. इंग्रज १६५० सालामध्ये राजांच्या स्वराज्य चळवळीला गुंडगिरी, पुंडगिरी म्हणून चिडवत होते. इ.स १६६० ते १६७० मध्ये राजांना मोठा बंडखोर म्हणून संबोधू लागले आणि १६७४ साली राज्याभिषेक झाल्यावर इंग्रजांना साक्षात्कार झाला. 'शिवाजीराजा हा मोठा धोरणी आहे.' असे इंग्रजांना वाटू लागले होते. इंग्रज हे अव्वल दर्जाचे व्यापारी होते. जिथे फायदा तिकडे धाव घेत असत. पण हे सर्व खटाटोप ते कंपनीसाठी करत होते. इंग्लंडच्या तळागाळातील जनतेसाठी नव्हे.
राजांसारखी रयतेची काळजी

घेण्याइतपत ते अजून प्रगल्भ झाले नव्हते. महाराजांनी अस्सल राजकारण त्यांना त्यांना अजून साधले नव्हते.

सुरत व इतर सुलतानी शहरांवर महाराजांनी धाडी घातल्या कारण स्वराज्याचे रोपटे लहान होते. त्यला फळे येण्यास बराच कालावधी होत. शिवाय स्वराज्याचे परकीय सुलतानापासून संरक्षण करायचे होते. रयतेची मने ही स्वराज्याच्य  (लोकशाहीला) अनुकूल घडवायची होती. रयतेमध्ये स्वावलंबन, उदयमाता राबवायची होती. स्वराज्याची शेती व्यवस्था टिकवणे, उद्योगधंद्यांच्या (शिवकालातील) वाढीस प्रोत्साहन देणे ही कामे अग्रक्रमावर होती आणि हे सर्व लोकांची मने साम्बाळून करायचे होते. सुलतानांसारखे बेजबाबदार राहून चालणार नही. अचानक सुलतानाची टोळधाड कधी येईल याचा भरवसा नसायचा.  शेतीव्यवस्था सुलतानी व आस्मानी या दोघामुळे भरडून निघत असे. स्वराज्याची बरीच कामे पैसावाचून अडली होती. अशाकाळी सुलतानी शहरे ही पैशाने ओसंडून वाहत होती. श्रीमंत शहरांमधील बाजारपेठा ह्या रयतेच्या हातात नव्हता. सुलतान लोकांच्या हातात होत्या, बादशाहा व त्याचे हितचिंतक? ह्यांनी रयतेची पिळवणूक करूनच आपली तुंबडी भरली होती.शिवाय हे जुलमी सुलतान स्वराज्याची न्साडी करत. लोकांवर जुलूम करत त्यांच्यावरही अंकुश बसणे आवश्यक होते. स्वराज्याला विपुल धनप्राप्ती व सुलतानावर वचक हा दुहेरी हेतू या धाडीमधून
साध्य होत असे. म्हणून राजांनी ह्या श्रीमंत शहरातील श्रीमंत लोकांकडूनच खंडणी वसूल केली. गरीब रयत, स्त्रिया, मुले यांच्या केसालाही धक्का लावला नव्हता.

कॉस्मा-द-गार्दा  हा शिवाजी राजांचा पोर्तुगिज चरित्रकार म्हणतो की "शिवाजीराजा आपल्या सैनिकांना चांगला पगार आणि तो सुद्धा नियमित देत असे. यात हेतू असा की युद्धात मिळवलेली लुट लपवण्याचा मोह त्यांना होऊ नये."

शिवरायांचा राज्याभिषेक झाला. तदनंतर शिवरायांनी स्वराज्याचे चलन म्हणून 'शिवराई' होन हे सुवर्णनाणे प्रचलात आणले होते. त्यावर 'श्री राजाशिवछत्रपती' असे कोरले होते. शिवरायंचे शेतकऱ्यांबद्दल धोरण असे होते, "नवी रयत येईल त्यास गुरे ढोरे दयावी बीजास दाणापैका तो ऐवज दोहोचोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावा. ये जातीचे रयतेचे दप्तरात जमा करावा लागेल धर्मदाय संस्थाना मात्र करातून सुट होती. त्यांच्या साठी राजाने वर्षासने (इनामे, जमिनी) लाऊन दिली होती. धर्माशिवाय जनता कर्माला प्रवृत्त होत नाही हे राजांच्या सूक्ष्मनिरीक्षण शक्तीला केव्हाच ठाऊक आले होते. शिवकालामध्ये माणसाच्या गरजा कमी होत्या. (फ्म्च्ग अस्तित्वतात नव्हते) त्या गरजा सर्वसाधारपणे पूर्ण होत असत. लोक गरजांच्या रगाड्यात अडकत नसत. रयतेची भरभराट झाली तर राज्यकारभार सुसह्य होईल ह्या विचाराने शिवरायांनी शेती व उद्योगधंदे यांच्या विकासाचा नेहमीच पाठपुरावा केला.

शिवरायांनी स्वराज्याचा महान अर्थ जाणला होता व तो अर्थ आपल्या अर्थनितीमध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला होता. शिवराय हे एक थोर अर्थतज्ञ होते, आई महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती. राजांनी हा वारसा आपल्या आई कढून घेतला होता. जिजाऊसाहेब कैलासवासी झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या शिवबासाठी एक कोटी साठवून ठेवले होते. राजांची अर्थनिती ही त्याग. कष्ट, परिश्रम बचत यावर उभारलेली होती. सुलतानी भंपकपणा, दिखाऊपणा, खर्चपणाचा त्यात लवलेशही नव्हता.

।। शिवरायंचे व्यवस्थापन ।।

व्यवस्थापनशास्त्राचे अवास्तव रान आज सर्वत्र माजलेले दिसते. आणि खरे रान कमी होत चालले आहे. अद्यापि एखादया कंपनी पलीकडे जाऊन सामान्य रयतेला, राष्ट्राला, जगाला सुखी करण्यात त्याला यश आलेले नाही. महाराजांनी जे स्वराज्य उभे केले ते उत्कृष्ठ नियोजन शास्त्राचा अभ्यास. चाणक्याचा राजांनी अभ्यास केला की नाही ते इतिहासाला ठाऊक नाही परंतु समर्थांच्या दासबोधाचा त्यांनी निश्चितच परमर्श घेतला असणार. खरे व्यवस्थापन हे मनाचे असते म्हणून व्यवस्थापनशास्त्र हे मनाचे शास्त्र म्हटल्यास वावगे ठरू नये. लोकांचे, जनतेचे कल्याण करणे हा त्यांचा व्यवस्थापनाच पाया होता. औरंगजेबाप्रमाणे ते स्वार्थपणा, रानटीपणा, दुसऱ्याच्या शोषणावर आधारलेले नव्हते. 'वापरा आणि फेका' हे कचरा निर्माण करणारे व्यवस्थापन त्यांनी राबवले नव्हते. अफाट लोकसंग्रह, त्यांच्याशी संपर्क साधणे, रयतेचे जनमत चाचपणे, त्यांचे लोकशिक्षण व त्यांच्या मुलभूत गरजा पहाणे ह्या सर्वांना राजे प्राधान्य देत असत.


स्वराज्याचे आर्थिक नियोजन, न्यायव्यस्था, संरक्षणसिद्धता, परराष्ट्रखाते, धर्मकारण, समाजकारण, आणि राजकारण यांचा अचूक समन्वय राजांनी साधला होतां.

महाराजांची इतिहासात डोकाऊन पाहण्याची शक्ती विलक्षण होती. इतिहास म्हणजे अनुभव. राजांची स्वत:च्या व दुसर्यांच्या अनुभवातून शिकण्याची क्षमता दांडगी होती. कोणत्या वेळी नेमके काय करावे अन काय करू नये याचा महाराज अगदी अचूक निर्णय घेत असत. इतिहासाचे अवलोकन करूनच राजांनी नवा इतिहास घडवला होता. इतिहासाचा अभ्यास करून महाराजांनी आपल्या स्वराज्याचा भूगोल वाढवला होत. (आज आपला वाढतोय का कमी होतोय ?)

महाराज संकटाकडे संधी म्हणून पाहत होते. जमले तर राजकारण नाही तर शिक्षण हे त्यांचे प्रमुख सूत्र होते. राजे सतत विचारशील व क्रियाशील अस्त. आपले स्वराज्य कसे वाढवावे, रयतेला सुखी कसे करावे. दुर्जनांचा निप्पात कसा करावा. आपल्या राष्ट्राची उन्नती कशी होईल ह्याचे ते सदैव चिंतन करत असत. राजे पुरंदर तहासाठी मिर्झाराजेंच्या छावणीत गेले होते. तेव्हा तेथे मनुची नावाचा युरोपीयन गृहस्थ होता. राजांची ह्या मनुची बरोबर बातचीत केली. अर्थातच हा अमूक वाडा /महाल बांधायला किती वर्ष लागली? त्या महालात किती हिरे जडवले? त्याचे दगड कुठून आणले? अशी वरपांगी चर्चा तर केली नसणारच. राजांनी मनुचीकडून युरोपचे धर्मकारण, समाजकारण, समाजकारण व राजकारण ह्यांची माहिती मिळवली होती. या माहितीचा वापर महाराजांनी आपल्या पुढील राजकारण/ समाजकारणात केला. महाराज मुळातच कुशाग्र बुद्धिमतेचे, संकटकाळी ती अधिकच सूक्ष्म होत असे. महाराज क्षणाक्षणाला शिकत होते. ज्ञान वेचत होते. महाराजंची वृत्ती जिज्ञासू व अभ्यासू होती. आपल्या कर्मचारी वर्गामध्ये व रायतेमध्ये हे गुण रुजवण्याच्या ते प्रयत्न करत असत.


सुतेवर हल्ला करण्याआधी राजांनी सुरतेची वित्तंबातमी बहीर्जी  नाईक कडून मिळवली होती. येण्या - जाणाच्या मार्ग, त्यांचा वेळा, मोहिमेची गुप्तता, अखंड सावधनता व चपळपणा ज्या सर्वांचा राजांनी इथे सुरेख संगम केला होता. राजे आपल्या आठ हजार फौजेसह शत्रूच्या मुलुखात तब्बल ३०० किलोमीटर आत घुसले होते. गंमत म्हणजे ते सुरतेला जात असताना कोंढाण्याच्या बाजूने सहा किमी अंतरावरून जात होते. त्याचवेळी मुघलांचा जसवंतसिंह नावाचा सरदार कोंडाण्याला वेढा देऊन बसला होता. परंतु त्यालाही ही गोष्ट कळली नव्हती. महाराज असे चलाख होते. राजांची नजर गरुडासारखी होती. महाराज छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या बारकाईने पहात असत. हेच महाराजंचे सूक्ष्म व्यवस्थापन होते.