'इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होत असते' असे म्हटले जाते. इतिहास
घडवणारे हे दोन गट त्यामागे कार्यरत असतात. 'आत्मबुद्धी' आणि 'देहबुद्धी'
ह्या दोन जबरदस्त प्रतिस्पर्धा मध्ये बुद्धीबळाचा हा डाव रंगलेला असतो.
ह्या दोघांच्या युद्धात काळ आपली सोंगटी हळूच पुढे पुढे सरकवत असतो.
बुद्धीबळाचा हा डाव सुरु असताना आपण भारतीय नेमके कोणत्या पक्षात मोडत
आहोत? पक्षांतर? काय? होय ! नाही ! होय नाही ! नाही होय ! निरपेक्ष !
शिवरायांनी मोठ्या महतप्रयासाने निर्माण केले स्वराज्य, वेळोवेळी आमच्या गाफीलपणामुळे कसे काय धोक्यात येत राहते हे आम्हाला अजून तितकेसे निट समजलेले नाही, तर सावधपणा हेच स्वातंत्र्याचे दुसरे नाव आहे हे देखील आम्हाला अद्याप उमजलेले दिसून येत नाही. महाराजांनी आपल्याला बुद्धीचे बळ खेळायला शिकवले होते, पण इ.स. १८१८ साली इंग्रजांची सत्ता आली आणि आम्ही हाती क्रिकेट ची Bat धरली.
'आज्ञापत्रे' ह्या रामचंद्र अमात्य ह्यांनी लिहलेल्या ग्रंथामध्ये शिवरायांची वैचारिक धोरणे स्पष्ट होतात. शिवराय काळाच्याही पुढे जाऊन परीस्थितीचा किती अचूक वेध घेत असत हे पाहून मन थक्क होते. शिवरायंचे विचार एखाद्या दीपस्तंभांप्रमाणे आपल्याला सतत प्रेरणा देत आहेत. मार्गदर्शन करीत आहेत. परंतु अद्यापही आम्ही त्यांचा विचारांचा म्हणावा तसा विश्वव्यापी विचार केला नाही.ते आमच्या आचरणातून तितकेसे उतरताना दिसत नाही.बहुदा इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे आमची संशोधक दुष्टी हिरावून घेतली आहे. दिव्याखाली अंधार, तशी तर आपली गात झाली नाही ना? महाराजांनी आपल्याला भावंडभावना, एकात्मका शिकवली परंतु आम्ही आज त्याचे कितपत पालन करीत आहोत?
अवघ्या १५, १६ व्या वर्षी लहानग्या शिवबाने कोणत्याही जागतीत बँकेचे कर्ज न घेता जे दुर्ग उभारले, धड त्याचे संवधर्न आम्हाला जमू नये हि मोठी शरमेची गोष्ट आहे. शिवराय हे गडपती होते. जवळपास ३५० किल्ले त्यांच्या ताब्यात होते. पण त्यांनी कधी कुठेही आपले साधे नाव लिहून ठेवलेले आपल्याला आढळत नाही. आणि आज उद्घाटनाची साधी रिबीन कापायला देखील एकमेकांत स्पर्धा माजली आहे.
राजे कधी शत्रूला कधीही कमी लेखत नसत. ते त्याच्या सामर्थ्याची पूर्णपणे शहनिशा करीत असत. प्रसंगी शत्रूकडूनही काही चांगले शिकायला मिळते का?यावर राजांचा कटाक्ष असे. इंग्रजांनी संपूर्ण जगावर कसे काय साम्राज्य प्रस्थापित केले त्याचे मूळ शोधले असता आपल्याला त्याचे स्वताच्या इतिहासावरील प्रेम, त्यातून सतत शिकून घेण्याची वृत्ती व आपल्या राष्टीय अस्मितेबद्दलची स्वाभिमानी वृत्ती हे गुण दिसून येतात. (अर्थात गुलामगिरी जोपासण्यासाठीच या वृतीचा दुरुपयोग केला गेला हि गोष्ट वेगळी.) आंग्लदेशातील त्यांची ऎतिहासिक स्थळे त्यांनी अशी काळजीपूर्वक जतन केली आहेत की, ती अगदी कालपरवा उभारल्यासारखी वाटतात.
शिवाजी महाराज म्हणजे पाळ्या राष्ट्राचे दैवत, पण रायगडावरील व इतर गडावरील स्वराज्याचे मोडकळीस आलेले अवशेष पाहन मन विदीर्ण होऊन जाते. मनामध्ये अपराधी भावना आल्यावाचून रहात नाही. हिंदूस्थान वारंवार परकीय आक्रमणाच्या व दहशतवादाच्या छायेखाली का वावरत असतो याचा उलगडा त्या भग्न अवशेषांकडे बघून होतो. आम्हाला शिवाजी राजा कितपत समजला आहे; त्याचाहि हा एक ढळढळीत पुरावा आहे.
आजच्या घडीला अगदी क्षणभर आम्ही शिवरायांच्या सोन्याचा पुतळा उभा करू शकतो. कॉम्पुटरमुळे ते काम अधिकच सोपे झाले आहे. पण प्रत्यक्षात ह्या युगपुरुषाचा स्वराज्य उभारणीमागील हेतू काय होता? त्याची गरज त्यांना का वाटली? त्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले? काय प्रयत्न केले? कोणत्या दिव्यातून पार पडले? त्याचे नियोजन त्यांनी कसे केले? व्यवस्थापन कसे केले? लोकांना सांभाळून कसे घेतले? त्यांनी स्वताच्या विचार केला नाही ? स्वत: पेक्षा स्वराज्य त्यांना मोठे वाटत होते? त्यांनी वतनदारीला विरोध का केला? त्यांना रयतेचा राजा का म्हटले गेले? समर्थांनी त्यांचे कौतुक का केले? या सर्व प्रश्नाचा आम्ही जिज्ञासू वृतीने अभ्यास करू शकू का? त्याची शाश्वती आम्ही देऊ शकू का? ह्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळू शकतील. पण केवळ पुतळे उभे करून ती आम्हाला मिळणार नाही हेही तितकेच सत्य.
कधी कधी वाटते की शिवरायांवरील आपले प्रेम बेडगी तर नव्हे ! कारण पुतळेबाजी आमच्या रक्तात एवढी भिनली आहे कि महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालणे. पाच सेकंद स्तब्धता पाळणे व दोन सेकंद अश्रू गळणे. ह्याच्यापलीकडे जाण्यचा आम्ही सहसा प्रयत्न करीत नाही. महापुरुषांना एकदाचे का दैवत्व बहाल केले कि मग आम्ही आमची दैनदिन कामे करायला मोकळे होतो. "माझ्या हातात काय आहे, देव बघून घेईल त्याचे त्याचे."अशा दैववादी भूमिकेच्या आपण आहारी तर गेलेलो नाही न? अशी चिंता मनाला भेडसावत राहते शिवरायांना आपली ही भोळसट भक्ती मान्य झाली नसती.
शिवरायांना आपण एक चमत्कारिक पुरुष म्हणून न पाहता ते माणूस म्हणून कसे होते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे अष्टपैलू , कौशल्य आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणण्याच्या प्रयत्न आम्ही केला पाहिजे. त्यांनी आपल्या भीमपराक्रम जेथे जेथे गाजवला त्या ठिकाणी भेट देऊन त्या पराक्रमाची पाश्वभूमी समजाऊन घ्यायला हवी. आपासात बंधुभाव जोपासून आपले राष्ट्र प्रगती पथावर कसे राहील ह्याचा विचार सातत्याने व्हायला हवा. थोडक्यात डोळसपणाने शिवरायांना समजून घेणे व आचरणे हाच मार्ग आहे आपल्याला व राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकतो.
शिवाजी महाराजानी आपले जीवन सदगुणांची भक्ती करण्यात व्यतीत केले. संतांचा उपदेश जीवनात आचरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही शिवरायंची लेकरे आहोत. त्यांचा वसा आम्ही उचलला पाहिजे. त्यांचे विचार हृदयाशी कवटाळून ठेवले पाहिजेत. याद्ये आपले व आपल्या राष्ट्राचे हित आहे. परतंत्र्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊ न देणे यातच आपले खरे शहाणपण आहे. "भारतीय आपल्या इतिहासावरून काहीच बोध घेताना दिसत नाहीत." हे चित्र आपण बदलले पाहिजे. भारताचे, विश्वाचे भले करण्याचे सामर्थ्य केवळ शिवरायांच्या विचारात आहे., हे आपण जाणून घेतले पाहिजे.
आजच्या घडीला भारतीय व जागतिक वातारण अनेक समस्यांनी घेरलेले दिसत आहे.आपण डोळसपणे शिवरायांचा अभ्यास करू तर शिवचरित्रामध्ये आपल्या असंख्य समस्यांची उत्तरे मिळू शकतील काळाचाही महिमा असतो. "जे काम तुम्हाला जमत नाही, ते दुसऱ्यांना करू द्या" असे तो म्हणत असतो. काळ परिवर्तन घडवून आणतो. पुढे कदाचित काळाची सूत्रे बदलतीलही, जगभरात वैचारिक मंथन सुरु होईल. नव्या पिढीतील जागतिक विचारवंत जगाच्या भल्यासाठी शिव-चरित्राचा विचार करू लागतील. तेव्हा आम्ही नक्की कुठे असू? आम्ही धडाडीने त्यांचे नेतृत्व करीत असू कि, जा रे त्याच्या मागल्या म्हणत त्यांच्या पाठोपाठ जात राहू?
शिवराय म्हणजे आकाशात तेजाने तळपणारा सूर्य आहेत, आणि त्यांचे चरित्र म्हणजे सदगुणांचा दिव्यप्रकाश आहे. सूर्यनारायणाची किरणे ज्याप्रमाणे अनंत आहेत. आपल्या सहस्त्रबाहुनी ती विश्वाला अंध:कारापासून दूर ठेवतात त्याचप्रमाणे शिवरायांचे आचरण जगाला नेहमीच प्रेरणा देत आलेले आहे आणि यापुढेही देत राहील. सूर्यप्रकाश आपल्याला बघायला शिकवतो, शिवचरीत्र आपल्याला पहायला शिकवते. सूर्यप्रकाश वस्तूचे केवळ बाह्यरंग दाखवतो, शिवचरित्र आम्हाला त्याच्या अंतरंगात नेउन सोडते. असे म्हणतात की, कधी कधी सूर्याला ग्रहण लागते. खरोखरच ! असे काही असते का? 'नाही' ! तो एक भास असतो. ग्रहण सूर्याला नव्हे आपल्या दृष्टीला लागलेली असते. बहूदा चमत्कारांच्या वलयापलीकडे आपली नजर जात असावी. पण त्यामुळेच सूर्य आपल्याला दिसत नसतो, मग त्याच्याकडे रोखून पहाणे तर त्याहून अशक्य.
शिवरायांनी आपल्याला सदगुणाचा खजिना उघडा करून दिलेला आहे. तो तरी आम्ही व्यवस्तीत लुटावयास शिकले पाहिजे. खजिना लुटता लुटता तो दुसऱ्यांना वाटायला जमले पाहिजे. तरच आम्ही स्वताला शिवरायंचे खरे अनुयायी म्हणवून घेऊ शकू. शिवरायांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू होते. धुरंधर राजनितिज्ञ, कुशल, युद्धनितिज्ञ, श्रेष्ठ समाजनितिज्ञ, सुश्म अर्थशास्त्रज्ञ, आद्य क्रांतिकारक, दृष्टेपणा, वैज्ञनिक दृष्टीकोन, अध्यात्मिक दृष्टीकोन स्थापत्यविशारद, कायदेतज्ञ, कणखर नेतुत्व जिज्ञासू व चिकित्सक, रयतेचा राजा, संशोधक, धर्मसंस्थापक, उत्तम भक्त, कलावंत थोर मुत्सद्दी आणि एक माणूस. शिवरायंची हि व अशी असंख्य रूपे आम्हाला कळवळून साद घालत आहेत. महाराज्यांच्या ह्या विविध रूपांचे मार्गदर्शन घेता घेता त्यांच्यातील एकरूपता आपल्या नजरेस आल्याशिवाय राहणार नाही.
हेच ध्यानी मनी बाळगून शिवरायांच्या तेजस्वी प्रतिमेला आपण नित्यनेमाने पुष्पहार अर्पण करूया, पण त्यापेशाही अधिक मनोभावे व जाणीवपूर्वक पूजा आपण त्यांच्या विचारांची करूया. हीच महाराजांना आपण वाहलेली खरी श्रद्धांजली ठरेल. स्वातंत्र्याचा मार्ग ती आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवत राहील.
।। शिवरायास आठवावे । जीवन तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी उरावे । कीर्तिरूपे ।।
शिवरायांनी मोठ्या महतप्रयासाने निर्माण केले स्वराज्य, वेळोवेळी आमच्या गाफीलपणामुळे कसे काय धोक्यात येत राहते हे आम्हाला अजून तितकेसे निट समजलेले नाही, तर सावधपणा हेच स्वातंत्र्याचे दुसरे नाव आहे हे देखील आम्हाला अद्याप उमजलेले दिसून येत नाही. महाराजांनी आपल्याला बुद्धीचे बळ खेळायला शिकवले होते, पण इ.स. १८१८ साली इंग्रजांची सत्ता आली आणि आम्ही हाती क्रिकेट ची Bat धरली.
'आज्ञापत्रे' ह्या रामचंद्र अमात्य ह्यांनी लिहलेल्या ग्रंथामध्ये शिवरायांची वैचारिक धोरणे स्पष्ट होतात. शिवराय काळाच्याही पुढे जाऊन परीस्थितीचा किती अचूक वेध घेत असत हे पाहून मन थक्क होते. शिवरायंचे विचार एखाद्या दीपस्तंभांप्रमाणे आपल्याला सतत प्रेरणा देत आहेत. मार्गदर्शन करीत आहेत. परंतु अद्यापही आम्ही त्यांचा विचारांचा म्हणावा तसा विश्वव्यापी विचार केला नाही.ते आमच्या आचरणातून तितकेसे उतरताना दिसत नाही.बहुदा इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे आमची संशोधक दुष्टी हिरावून घेतली आहे. दिव्याखाली अंधार, तशी तर आपली गात झाली नाही ना? महाराजांनी आपल्याला भावंडभावना, एकात्मका शिकवली परंतु आम्ही आज त्याचे कितपत पालन करीत आहोत?
अवघ्या १५, १६ व्या वर्षी लहानग्या शिवबाने कोणत्याही जागतीत बँकेचे कर्ज न घेता जे दुर्ग उभारले, धड त्याचे संवधर्न आम्हाला जमू नये हि मोठी शरमेची गोष्ट आहे. शिवराय हे गडपती होते. जवळपास ३५० किल्ले त्यांच्या ताब्यात होते. पण त्यांनी कधी कुठेही आपले साधे नाव लिहून ठेवलेले आपल्याला आढळत नाही. आणि आज उद्घाटनाची साधी रिबीन कापायला देखील एकमेकांत स्पर्धा माजली आहे.
राजे कधी शत्रूला कधीही कमी लेखत नसत. ते त्याच्या सामर्थ्याची पूर्णपणे शहनिशा करीत असत. प्रसंगी शत्रूकडूनही काही चांगले शिकायला मिळते का?यावर राजांचा कटाक्ष असे. इंग्रजांनी संपूर्ण जगावर कसे काय साम्राज्य प्रस्थापित केले त्याचे मूळ शोधले असता आपल्याला त्याचे स्वताच्या इतिहासावरील प्रेम, त्यातून सतत शिकून घेण्याची वृत्ती व आपल्या राष्टीय अस्मितेबद्दलची स्वाभिमानी वृत्ती हे गुण दिसून येतात. (अर्थात गुलामगिरी जोपासण्यासाठीच या वृतीचा दुरुपयोग केला गेला हि गोष्ट वेगळी.) आंग्लदेशातील त्यांची ऎतिहासिक स्थळे त्यांनी अशी काळजीपूर्वक जतन केली आहेत की, ती अगदी कालपरवा उभारल्यासारखी वाटतात.
शिवाजी महाराज म्हणजे पाळ्या राष्ट्राचे दैवत, पण रायगडावरील व इतर गडावरील स्वराज्याचे मोडकळीस आलेले अवशेष पाहन मन विदीर्ण होऊन जाते. मनामध्ये अपराधी भावना आल्यावाचून रहात नाही. हिंदूस्थान वारंवार परकीय आक्रमणाच्या व दहशतवादाच्या छायेखाली का वावरत असतो याचा उलगडा त्या भग्न अवशेषांकडे बघून होतो. आम्हाला शिवाजी राजा कितपत समजला आहे; त्याचाहि हा एक ढळढळीत पुरावा आहे.
आजच्या घडीला अगदी क्षणभर आम्ही शिवरायांच्या सोन्याचा पुतळा उभा करू शकतो. कॉम्पुटरमुळे ते काम अधिकच सोपे झाले आहे. पण प्रत्यक्षात ह्या युगपुरुषाचा स्वराज्य उभारणीमागील हेतू काय होता? त्याची गरज त्यांना का वाटली? त्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले? काय प्रयत्न केले? कोणत्या दिव्यातून पार पडले? त्याचे नियोजन त्यांनी कसे केले? व्यवस्थापन कसे केले? लोकांना सांभाळून कसे घेतले? त्यांनी स्वताच्या विचार केला नाही ? स्वत: पेक्षा स्वराज्य त्यांना मोठे वाटत होते? त्यांनी वतनदारीला विरोध का केला? त्यांना रयतेचा राजा का म्हटले गेले? समर्थांनी त्यांचे कौतुक का केले? या सर्व प्रश्नाचा आम्ही जिज्ञासू वृतीने अभ्यास करू शकू का? त्याची शाश्वती आम्ही देऊ शकू का? ह्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळू शकतील. पण केवळ पुतळे उभे करून ती आम्हाला मिळणार नाही हेही तितकेच सत्य.
कधी कधी वाटते की शिवरायांवरील आपले प्रेम बेडगी तर नव्हे ! कारण पुतळेबाजी आमच्या रक्तात एवढी भिनली आहे कि महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालणे. पाच सेकंद स्तब्धता पाळणे व दोन सेकंद अश्रू गळणे. ह्याच्यापलीकडे जाण्यचा आम्ही सहसा प्रयत्न करीत नाही. महापुरुषांना एकदाचे का दैवत्व बहाल केले कि मग आम्ही आमची दैनदिन कामे करायला मोकळे होतो. "माझ्या हातात काय आहे, देव बघून घेईल त्याचे त्याचे."अशा दैववादी भूमिकेच्या आपण आहारी तर गेलेलो नाही न? अशी चिंता मनाला भेडसावत राहते शिवरायांना आपली ही भोळसट भक्ती मान्य झाली नसती.
शिवरायांना आपण एक चमत्कारिक पुरुष म्हणून न पाहता ते माणूस म्हणून कसे होते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे अष्टपैलू , कौशल्य आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणण्याच्या प्रयत्न आम्ही केला पाहिजे. त्यांनी आपल्या भीमपराक्रम जेथे जेथे गाजवला त्या ठिकाणी भेट देऊन त्या पराक्रमाची पाश्वभूमी समजाऊन घ्यायला हवी. आपासात बंधुभाव जोपासून आपले राष्ट्र प्रगती पथावर कसे राहील ह्याचा विचार सातत्याने व्हायला हवा. थोडक्यात डोळसपणाने शिवरायांना समजून घेणे व आचरणे हाच मार्ग आहे आपल्याला व राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकतो.
शिवाजी महाराजानी आपले जीवन सदगुणांची भक्ती करण्यात व्यतीत केले. संतांचा उपदेश जीवनात आचरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही शिवरायंची लेकरे आहोत. त्यांचा वसा आम्ही उचलला पाहिजे. त्यांचे विचार हृदयाशी कवटाळून ठेवले पाहिजेत. याद्ये आपले व आपल्या राष्ट्राचे हित आहे. परतंत्र्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊ न देणे यातच आपले खरे शहाणपण आहे. "भारतीय आपल्या इतिहासावरून काहीच बोध घेताना दिसत नाहीत." हे चित्र आपण बदलले पाहिजे. भारताचे, विश्वाचे भले करण्याचे सामर्थ्य केवळ शिवरायांच्या विचारात आहे., हे आपण जाणून घेतले पाहिजे.
आजच्या घडीला भारतीय व जागतिक वातारण अनेक समस्यांनी घेरलेले दिसत आहे.आपण डोळसपणे शिवरायांचा अभ्यास करू तर शिवचरित्रामध्ये आपल्या असंख्य समस्यांची उत्तरे मिळू शकतील काळाचाही महिमा असतो. "जे काम तुम्हाला जमत नाही, ते दुसऱ्यांना करू द्या" असे तो म्हणत असतो. काळ परिवर्तन घडवून आणतो. पुढे कदाचित काळाची सूत्रे बदलतीलही, जगभरात वैचारिक मंथन सुरु होईल. नव्या पिढीतील जागतिक विचारवंत जगाच्या भल्यासाठी शिव-चरित्राचा विचार करू लागतील. तेव्हा आम्ही नक्की कुठे असू? आम्ही धडाडीने त्यांचे नेतृत्व करीत असू कि, जा रे त्याच्या मागल्या म्हणत त्यांच्या पाठोपाठ जात राहू?
शिवराय म्हणजे आकाशात तेजाने तळपणारा सूर्य आहेत, आणि त्यांचे चरित्र म्हणजे सदगुणांचा दिव्यप्रकाश आहे. सूर्यनारायणाची किरणे ज्याप्रमाणे अनंत आहेत. आपल्या सहस्त्रबाहुनी ती विश्वाला अंध:कारापासून दूर ठेवतात त्याचप्रमाणे शिवरायांचे आचरण जगाला नेहमीच प्रेरणा देत आलेले आहे आणि यापुढेही देत राहील. सूर्यप्रकाश आपल्याला बघायला शिकवतो, शिवचरीत्र आपल्याला पहायला शिकवते. सूर्यप्रकाश वस्तूचे केवळ बाह्यरंग दाखवतो, शिवचरित्र आम्हाला त्याच्या अंतरंगात नेउन सोडते. असे म्हणतात की, कधी कधी सूर्याला ग्रहण लागते. खरोखरच ! असे काही असते का? 'नाही' ! तो एक भास असतो. ग्रहण सूर्याला नव्हे आपल्या दृष्टीला लागलेली असते. बहूदा चमत्कारांच्या वलयापलीकडे आपली नजर जात असावी. पण त्यामुळेच सूर्य आपल्याला दिसत नसतो, मग त्याच्याकडे रोखून पहाणे तर त्याहून अशक्य.
शिवरायांनी आपल्याला सदगुणाचा खजिना उघडा करून दिलेला आहे. तो तरी आम्ही व्यवस्तीत लुटावयास शिकले पाहिजे. खजिना लुटता लुटता तो दुसऱ्यांना वाटायला जमले पाहिजे. तरच आम्ही स्वताला शिवरायंचे खरे अनुयायी म्हणवून घेऊ शकू. शिवरायांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू होते. धुरंधर राजनितिज्ञ, कुशल, युद्धनितिज्ञ, श्रेष्ठ समाजनितिज्ञ, सुश्म अर्थशास्त्रज्ञ, आद्य क्रांतिकारक, दृष्टेपणा, वैज्ञनिक दृष्टीकोन, अध्यात्मिक दृष्टीकोन स्थापत्यविशारद, कायदेतज्ञ, कणखर नेतुत्व जिज्ञासू व चिकित्सक, रयतेचा राजा, संशोधक, धर्मसंस्थापक, उत्तम भक्त, कलावंत थोर मुत्सद्दी आणि एक माणूस. शिवरायंची हि व अशी असंख्य रूपे आम्हाला कळवळून साद घालत आहेत. महाराज्यांच्या ह्या विविध रूपांचे मार्गदर्शन घेता घेता त्यांच्यातील एकरूपता आपल्या नजरेस आल्याशिवाय राहणार नाही.
हेच ध्यानी मनी बाळगून शिवरायांच्या तेजस्वी प्रतिमेला आपण नित्यनेमाने पुष्पहार अर्पण करूया, पण त्यापेशाही अधिक मनोभावे व जाणीवपूर्वक पूजा आपण त्यांच्या विचारांची करूया. हीच महाराजांना आपण वाहलेली खरी श्रद्धांजली ठरेल. स्वातंत्र्याचा मार्ग ती आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवत राहील.
।। शिवरायास आठवावे । जीवन तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी उरावे । कीर्तिरूपे ।।