गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

।। शिवरायांची अर्थनिती ।।

शिवकालीन आर्थिक जीवन हे मुख्यत: शेतीविषयक निगडीत होते. त्यामुळे शेतीचे रक्षण व संवर्धन ही धोरणे शिवरायांनी प्रामुख्याने राबवली. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तो काळ सुलतानी जुलूम जबरदस्तीचा होता. अशा वेळी शिवरायांचे स्वराज्य हे लोकांना जुलूम जबरदस्तीचा होता. आशावेळी शिवरायंचे स्वराज्य हे लोकांना वरदानच होते. मुख्य म्हणजे शिवरायांचा स्वराज्याचा मुख्य सृष्टीकोन हा शोषणावर आधारित नव्हता.स्वतःची तुंबडी भरून घेण्यासाठी राजांनी स्वराज्याचा निर्माण केले नव्हते. स्वराज्याला धर्माची जोड होती. पिक लावणीच्या काळात शेतकऱ्यांना विशेष सरंक्षण दिले जाई. शेतकऱ्यांचे नुकसान ते स्वराज्याचे नुकसान हे राजांना पक्के ठाऊक होते. शेतकरी गाव सोडून जाऊ नये याची काळजी घ्यावी लागे. एका चोराला शेतकऱ्याने पकडून बेदम मारले. तेव्हा तो चोर मारला गेला. राजांनी शेतकऱ्याची प्रशंसा केली व चोराचे प्रेत वेशीवर टांगून ठेवण्यात आले. रयतेवाचून स्वराज्य म्हणजे म्हणजे आत्मावाचून शरीर. शेतकरी हा स्वराज्याचा आत्मा होता. सुलतानी बरोबर रयतेला आस्मानीला तोंड द्यावे लागे. असाच एक भयंकर दुष्काळ १६३० साली पडला होता. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या ह्या दुष्काळामध्ये मरण पावली. तुकाराम महाराज ह्यांची प्रथम पत्नी व मुले ह्या दुष्काळाने खाल्ली. त्यावर  तुकाराम महाराज म्हणतात. ।।
"बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।। माणसांनी माणसाला खाल्ले असे दुष्काळाचे भयंकर वर्णन आहे.

शिवरायांनी प्रजेसाठी बंधारे बांधले. कालवे व विहिरी यांची सोय केली. व पाणी नियोजनासाठी जनतेला उत्तेजन दिले. पाण्यावर मालकी सरकारची असे. कोंढावे (पुणे) जवळ येसाजी पाटील यांनी राजांच्या हुकुमानुसार पाणवठ्यातील एक मोठा धोंडा फोडला. त्याला बक्षिस म्हणून रजनी जमीन दिली. शिवकालामाद्ये जमिनीच्या प्रतीवर शेतसारा ठरत असे. शिवाय पिकांच्या पद्धतीवर देखिल ठरत
आकाराला जाई.रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नका असा सैन्याला सक्त आदेश होता. कल्याण - भिवंडी प्रांतात उत्कृष्ट प्रतीचे जहाज बांधणीचे व इमारतीचे लाकूड मिळत असे म्हणून राजांनी कल्याणला आपला जहाज बांधणीचा कारखाना काढला. आंबा, फणस, साग, वड, पिंपळ इत्यादी उपयुक्त झाडे परवानगीशिवाय तोडू नये असे आदेश होता, पऱमुलुखातून साग व इतर कच्चा माल आयात केला जात असे. शिवाय स्वराज्याचा रक्षणासाठी, गनिमी काव्यासाठी जंगलाचा वापर नैसर्गिक तटबंदी म्हणून केला जाई.

राजांनी उदयोगधंदयाला प्रोत्साहन दिले. बारा बुलुतेदारी त्याकाळी विशेष प्रचलित होती. खेडे हा आर्थिक जीवनाचा पाया होता. त्याकाळी खेडी ही स्वावलंबी होती. प्रत्येक खेडे म्हणजे एक कुटुंबरचना होती. ग्रामीण उत्पादन गावातील लोकांसाठी गावातच केले जाई. सोनार, लोहार, तांबट, सुतार, चांभार, कुंभार, कोष्टी, बाणकरी, मांग, तेली, धनगर, कोमटी, शिंपी, न्हावी, परीट, गवंडी,
माळी, कोळी, रंगारी, पखवाजी, पावेकरी, टाळकरी,. विणेकारी, किर्तनकार, गायक, नर्तिका, गारुडी, तांबोळी इत्यादी अठरापगड जातीचे लोक आपापला व्यवसाय गुण्यागोविदाने करत असत. राजे नेहमीच कर्माला जास्त प्राधान्य देत असत. त्यांना एकच जात ठाऊक होती. 'माणुसकी'. गावामध्ये आठवड्याचा बाजार भरत असे. त्या बाजारामध्ये गावातील व शेजारील गावातील विक्रेते आपला माल विकू शकत. राजांनी रायगडावर देखिल अशीच एक बाजारपेठ बांधली होती.

कोकण व घाट यांच्यादरम्यान विशाल सह्याद्रीची रांग आहे. फार प्राचीन काळापासून या दोहोंना जोडणारे घाट अस्तित्वात होते. पायवाटा होत्य. नाणेघाट,थळघाट, बोरघाट, फोंडाघाट, आंबाघाट इत्यादी घाटामधून मालाची ने- आण ही. या घाटामध्ये शिवरायंनी जकातीसाठी चौक्या बसवल्या होत्य. घाटांचे रक्षण व नियंत्रण डोंगरी किल्यामार्फत केले जाई. मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने नियंत्रण डोंगरी किल्यामार्फत केले जाई. मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने बैलगाडी, घोडागाडी व गाडव यांचा उपयोग केला जाऎ. पालखीचा उपयोग श्रीमंत लोख करीत अस्त. राजांनी स्वदेशी कारागिरांना नेहमीच चालना दिलि. घाटमाथ्यावर पोर्तुगीजांनी केलेले मीठ सर्रास विकले जात होते. राजांनी पोर्तुगीज मीठावर जबरदस्त जकात बसवली व कोकणच्या मीठाला देशाची बाजारपेठ मिळवून दिलि. स्वराज्यात शोषणाचे प्रमाण जवळपास बंदच झाले होते. चौल, कल्याण, भिवंडी, दाभोळ, राजापूर, वेंगुर्ले ही उद्योगधंदयाची केंद्रे म्हणून भरभराटीसाठी आलेली होति. येथे अन्नधान्य, मसाल्याचे जिन्नस, कापड, फळे, प्राणी, विक्रीसाठी ठेवलेले अस्त. महाराजांनी गुलामांचा व्यापार बंद करून टाकला. शिवरायांनी मस्कत, एडन येथे व्यापार करण्यासाठी गलबते बांधली होती. महाराजंचे एक गल बत एडनहून मुंबई बंदरात ई. स. १६६९ साली दाखल झाल्याची बातमी सुरतेच्या इंग्रजी दफ्तरात होति. राजांची कच्चा मालाची आयात व पक्का मालाची निर्यात हे धोरण ठेवले होते. राजांनी कच्चा मालाची आयात व पक्का मालाची निर्यात हे धोरण ठेवले होते. घोडदळास उत्तम अरबी घोडे हवे असत. ठाण्याजवळील घोडबंदर हे घोड्यांचा आयात - निर्यातीचे बंदर म्हणून नावाजलेले होते.

राजांनी डच, फ्रेंच यांच्यापासून स्वराज्याला कसा फायदा होईल ते पाहीले. इंग्रज हे फार धूर्त होते. इंग्रजांनी आपले चलन स्वराज्यात चालू दयावे ही विनंती राजांना केली. राजांनी ती धुडकावून लावली. इंग्रजी व्यापाऱ्यांबाबत राजे सावध असत. त्यांना ठाऊक होते होते की यांच्या व्यापारी टोपीखाली राजकारण शिजत आहे. इंग्रज १६५० सालामध्ये राजांच्या स्वराज्य चळवळीला गुंडगिरी, पुंडगिरी म्हणून चिडवत होते. इ.स १६६० ते १६७० मध्ये राजांना मोठा बंडखोर म्हणून संबोधू लागले आणि १६७४ साली राज्याभिषेक झाल्यावर इंग्रजांना साक्षात्कार झाला. 'शिवाजीराजा हा मोठा धोरणी आहे.' असे इंग्रजांना वाटू लागले होते. इंग्रज हे अव्वल दर्जाचे व्यापारी होते. जिथे फायदा तिकडे धाव घेत असत. पण हे सर्व खटाटोप ते कंपनीसाठी करत होते. इंग्लंडच्या तळागाळातील जनतेसाठी नव्हे.
राजांसारखी रयतेची काळजी

घेण्याइतपत ते अजून प्रगल्भ झाले नव्हते. महाराजांनी अस्सल राजकारण त्यांना त्यांना अजून साधले नव्हते.

सुरत व इतर सुलतानी शहरांवर महाराजांनी धाडी घातल्या कारण स्वराज्याचे रोपटे लहान होते. त्यला फळे येण्यास बराच कालावधी होत. शिवाय स्वराज्याचे परकीय सुलतानापासून संरक्षण करायचे होते. रयतेची मने ही स्वराज्याच्य  (लोकशाहीला) अनुकूल घडवायची होती. रयतेमध्ये स्वावलंबन, उदयमाता राबवायची होती. स्वराज्याची शेती व्यवस्था टिकवणे, उद्योगधंद्यांच्या (शिवकालातील) वाढीस प्रोत्साहन देणे ही कामे अग्रक्रमावर होती आणि हे सर्व लोकांची मने साम्बाळून करायचे होते. सुलतानांसारखे बेजबाबदार राहून चालणार नही. अचानक सुलतानाची टोळधाड कधी येईल याचा भरवसा नसायचा.  शेतीव्यवस्था सुलतानी व आस्मानी या दोघामुळे भरडून निघत असे. स्वराज्याची बरीच कामे पैसावाचून अडली होती. अशाकाळी सुलतानी शहरे ही पैशाने ओसंडून वाहत होती. श्रीमंत शहरांमधील बाजारपेठा ह्या रयतेच्या हातात नव्हता. सुलतान लोकांच्या हातात होत्या, बादशाहा व त्याचे हितचिंतक? ह्यांनी रयतेची पिळवणूक करूनच आपली तुंबडी भरली होती.शिवाय हे जुलमी सुलतान स्वराज्याची न्साडी करत. लोकांवर जुलूम करत त्यांच्यावरही अंकुश बसणे आवश्यक होते. स्वराज्याला विपुल धनप्राप्ती व सुलतानावर वचक हा दुहेरी हेतू या धाडीमधून
साध्य होत असे. म्हणून राजांनी ह्या श्रीमंत शहरातील श्रीमंत लोकांकडूनच खंडणी वसूल केली. गरीब रयत, स्त्रिया, मुले यांच्या केसालाही धक्का लावला नव्हता.

कॉस्मा-द-गार्दा  हा शिवाजी राजांचा पोर्तुगिज चरित्रकार म्हणतो की "शिवाजीराजा आपल्या सैनिकांना चांगला पगार आणि तो सुद्धा नियमित देत असे. यात हेतू असा की युद्धात मिळवलेली लुट लपवण्याचा मोह त्यांना होऊ नये."

शिवरायांचा राज्याभिषेक झाला. तदनंतर शिवरायांनी स्वराज्याचे चलन म्हणून 'शिवराई' होन हे सुवर्णनाणे प्रचलात आणले होते. त्यावर 'श्री राजाशिवछत्रपती' असे कोरले होते. शिवरायंचे शेतकऱ्यांबद्दल धोरण असे होते, "नवी रयत येईल त्यास गुरे ढोरे दयावी बीजास दाणापैका तो ऐवज दोहोचोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावा. ये जातीचे रयतेचे दप्तरात जमा करावा लागेल धर्मदाय संस्थाना मात्र करातून सुट होती. त्यांच्या साठी राजाने वर्षासने (इनामे, जमिनी) लाऊन दिली होती. धर्माशिवाय जनता कर्माला प्रवृत्त होत नाही हे राजांच्या सूक्ष्मनिरीक्षण शक्तीला केव्हाच ठाऊक आले होते. शिवकालामध्ये माणसाच्या गरजा कमी होत्या. (फ्म्च्ग अस्तित्वतात नव्हते) त्या गरजा सर्वसाधारपणे पूर्ण होत असत. लोक गरजांच्या रगाड्यात अडकत नसत. रयतेची भरभराट झाली तर राज्यकारभार सुसह्य होईल ह्या विचाराने शिवरायांनी शेती व उद्योगधंदे यांच्या विकासाचा नेहमीच पाठपुरावा केला.

शिवरायांनी स्वराज्याचा महान अर्थ जाणला होता व तो अर्थ आपल्या अर्थनितीमध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला होता. शिवराय हे एक थोर अर्थतज्ञ होते, आई महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती. राजांनी हा वारसा आपल्या आई कढून घेतला होता. जिजाऊसाहेब कैलासवासी झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या शिवबासाठी एक कोटी साठवून ठेवले होते. राजांची अर्थनिती ही त्याग. कष्ट, परिश्रम बचत यावर उभारलेली होती. सुलतानी भंपकपणा, दिखाऊपणा, खर्चपणाचा त्यात लवलेशही नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा