व्यवस्थापनशास्त्राचे अवास्तव रान आज सर्वत्र माजलेले दिसते. आणि खरे
रान कमी होत चालले आहे. अद्यापि एखादया कंपनी पलीकडे जाऊन सामान्य रयतेला,
राष्ट्राला, जगाला सुखी करण्यात त्याला यश आलेले नाही. महाराजांनी जे
स्वराज्य उभे केले ते उत्कृष्ठ नियोजन शास्त्राचा अभ्यास. चाणक्याचा
राजांनी अभ्यास केला की नाही ते इतिहासाला ठाऊक नाही परंतु समर्थांच्या
दासबोधाचा त्यांनी निश्चितच परमर्श घेतला असणार. खरे
व्यवस्थापन हे मनाचे असते म्हणून व्यवस्थापनशास्त्र हे मनाचे शास्त्र
म्हटल्यास वावगे ठरू नये. लोकांचे, जनतेचे कल्याण करणे हा त्यांचा
व्यवस्थापनाच पाया होता. औरंगजेबाप्रमाणे ते स्वार्थपणा, रानटीपणा,
दुसऱ्याच्या शोषणावर आधारलेले नव्हते. 'वापरा आणि फेका' हे कचरा निर्माण
करणारे व्यवस्थापन त्यांनी राबवले नव्हते. अफाट लोकसंग्रह, त्यांच्याशी
संपर्क साधणे, रयतेचे जनमत चाचपणे, त्यांचे लोकशिक्षण व त्यांच्या मुलभूत
गरजा पहाणे ह्या सर्वांना राजे प्राधान्य देत असत.
स्वराज्याचे आर्थिक नियोजन, न्यायव्यस्था, संरक्षणसिद्धता, परराष्ट्रखाते, धर्मकारण, समाजकारण, आणि राजकारण यांचा अचूक समन्वय राजांनी साधला होतां.
महाराजांची इतिहासात डोकाऊन पाहण्याची शक्ती विलक्षण होती. इतिहास म्हणजे अनुभव. राजांची स्वत:च्या व दुसर्यांच्या अनुभवातून शिकण्याची क्षमता दांडगी होती. कोणत्या वेळी नेमके काय करावे अन काय करू नये याचा महाराज अगदी अचूक निर्णय घेत असत. इतिहासाचे अवलोकन करूनच राजांनी नवा इतिहास घडवला होता. इतिहासाचा अभ्यास करून महाराजांनी आपल्या स्वराज्याचा भूगोल वाढवला होत. (आज आपला वाढतोय का कमी होतोय ?)
महाराज संकटाकडे संधी म्हणून पाहत होते. जमले तर राजकारण नाही तर शिक्षण हे त्यांचे प्रमुख सूत्र होते. राजे सतत विचारशील व क्रियाशील अस्त. आपले स्वराज्य कसे वाढवावे, रयतेला सुखी कसे करावे. दुर्जनांचा निप्पात कसा करावा. आपल्या राष्ट्राची उन्नती कशी होईल ह्याचे ते सदैव चिंतन करत असत. राजे पुरंदर तहासाठी मिर्झाराजेंच्या छावणीत गेले होते. तेव्हा तेथे मनुची नावाचा युरोपीयन गृहस्थ होता. राजांची ह्या मनुची बरोबर बातचीत केली. अर्थातच हा अमूक वाडा /महाल बांधायला किती वर्ष लागली? त्या महालात किती हिरे जडवले? त्याचे दगड कुठून आणले? अशी वरपांगी चर्चा तर केली नसणारच. राजांनी मनुचीकडून युरोपचे धर्मकारण, समाजकारण, समाजकारण व राजकारण ह्यांची माहिती मिळवली होती. या माहितीचा वापर महाराजांनी आपल्या पुढील राजकारण/ समाजकारणात केला. महाराज मुळातच कुशाग्र बुद्धिमतेचे, संकटकाळी ती अधिकच सूक्ष्म होत असे. महाराज क्षणाक्षणाला शिकत होते. ज्ञान वेचत होते. महाराजंची वृत्ती जिज्ञासू व अभ्यासू होती. आपल्या कर्मचारी वर्गामध्ये व रायतेमध्ये हे गुण रुजवण्याच्या ते प्रयत्न करत असत.
सुतेवर हल्ला करण्याआधी राजांनी सुरतेची वित्तंबातमी बहीर्जी नाईक कडून मिळवली होती. येण्या - जाणाच्या मार्ग, त्यांचा वेळा, मोहिमेची गुप्तता, अखंड सावधनता व चपळपणा ज्या सर्वांचा राजांनी इथे सुरेख संगम केला होता. राजे आपल्या आठ हजार फौजेसह शत्रूच्या मुलुखात तब्बल ३०० किलोमीटर आत घुसले होते. गंमत म्हणजे ते सुरतेला जात असताना कोंढाण्याच्या बाजूने सहा किमी अंतरावरून जात होते. त्याचवेळी मुघलांचा जसवंतसिंह नावाचा सरदार कोंडाण्याला वेढा देऊन बसला होता. परंतु त्यालाही ही गोष्ट कळली नव्हती. महाराज असे चलाख होते. राजांची नजर गरुडासारखी होती. महाराज छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या बारकाईने पहात असत. हेच महाराजंचे सूक्ष्म व्यवस्थापन होते.
स्वराज्याचे आर्थिक नियोजन, न्यायव्यस्था, संरक्षणसिद्धता, परराष्ट्रखाते, धर्मकारण, समाजकारण, आणि राजकारण यांचा अचूक समन्वय राजांनी साधला होतां.
महाराजांची इतिहासात डोकाऊन पाहण्याची शक्ती विलक्षण होती. इतिहास म्हणजे अनुभव. राजांची स्वत:च्या व दुसर्यांच्या अनुभवातून शिकण्याची क्षमता दांडगी होती. कोणत्या वेळी नेमके काय करावे अन काय करू नये याचा महाराज अगदी अचूक निर्णय घेत असत. इतिहासाचे अवलोकन करूनच राजांनी नवा इतिहास घडवला होता. इतिहासाचा अभ्यास करून महाराजांनी आपल्या स्वराज्याचा भूगोल वाढवला होत. (आज आपला वाढतोय का कमी होतोय ?)
महाराज संकटाकडे संधी म्हणून पाहत होते. जमले तर राजकारण नाही तर शिक्षण हे त्यांचे प्रमुख सूत्र होते. राजे सतत विचारशील व क्रियाशील अस्त. आपले स्वराज्य कसे वाढवावे, रयतेला सुखी कसे करावे. दुर्जनांचा निप्पात कसा करावा. आपल्या राष्ट्राची उन्नती कशी होईल ह्याचे ते सदैव चिंतन करत असत. राजे पुरंदर तहासाठी मिर्झाराजेंच्या छावणीत गेले होते. तेव्हा तेथे मनुची नावाचा युरोपीयन गृहस्थ होता. राजांची ह्या मनुची बरोबर बातचीत केली. अर्थातच हा अमूक वाडा /महाल बांधायला किती वर्ष लागली? त्या महालात किती हिरे जडवले? त्याचे दगड कुठून आणले? अशी वरपांगी चर्चा तर केली नसणारच. राजांनी मनुचीकडून युरोपचे धर्मकारण, समाजकारण, समाजकारण व राजकारण ह्यांची माहिती मिळवली होती. या माहितीचा वापर महाराजांनी आपल्या पुढील राजकारण/ समाजकारणात केला. महाराज मुळातच कुशाग्र बुद्धिमतेचे, संकटकाळी ती अधिकच सूक्ष्म होत असे. महाराज क्षणाक्षणाला शिकत होते. ज्ञान वेचत होते. महाराजंची वृत्ती जिज्ञासू व अभ्यासू होती. आपल्या कर्मचारी वर्गामध्ये व रायतेमध्ये हे गुण रुजवण्याच्या ते प्रयत्न करत असत.
सुतेवर हल्ला करण्याआधी राजांनी सुरतेची वित्तंबातमी बहीर्जी नाईक कडून मिळवली होती. येण्या - जाणाच्या मार्ग, त्यांचा वेळा, मोहिमेची गुप्तता, अखंड सावधनता व चपळपणा ज्या सर्वांचा राजांनी इथे सुरेख संगम केला होता. राजे आपल्या आठ हजार फौजेसह शत्रूच्या मुलुखात तब्बल ३०० किलोमीटर आत घुसले होते. गंमत म्हणजे ते सुरतेला जात असताना कोंढाण्याच्या बाजूने सहा किमी अंतरावरून जात होते. त्याचवेळी मुघलांचा जसवंतसिंह नावाचा सरदार कोंडाण्याला वेढा देऊन बसला होता. परंतु त्यालाही ही गोष्ट कळली नव्हती. महाराज असे चलाख होते. राजांची नजर गरुडासारखी होती. महाराज छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या बारकाईने पहात असत. हेच महाराजंचे सूक्ष्म व्यवस्थापन होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा