शनिवार, २१ डिसेंबर, २०१३


आपन सर्वच जानतो की राजांभोवती असलेले मावळे आणी त्यांचे सल्लागार हे फक्त एका दिव्य ध्येयासाठी राजांबरोबर लढत होते...... इतिहासाचा जर बारकाईने अभ्यास केला. तर आपनास असे आढळुन येईल की शिवाजी राजांच्या प्रत्येक मावळ्याला एक स्वतंत्र ईतिहास आहे......... राजांचा प्रत्येक मावळा हा एखाद्या गडापेक्षा कमी नव्हता....... त्यांची राजांवरील आणी राजांनी त्यांना दिलेल्या त्या दिव्य ध्येयावरील निष्ठा ही एखाद्या गडाच्या अभेद्य तटापेक्षा कमी नव्हती............ त्यांच्या त्या असामान्य निष्ठेने आणि त्या निष्ठेला साजेश्या पराक्रमाने इतिहासाला त्यांची दखल घेने भाग पडले............ 

हिंदुंच्या इतिहासात पवनपुत्र हनुमाना नंतर स्वामिभक्तीचे सर्वात प्रभावी दर्शन भारतवर्षाला घडले आहे ते शिवकाळातच!

राजांच्या अवती भवती दिसणारी हि मंडळी एका दिव्या ध्येयासाठी लढत होती...मुसलमानांचे म्हणा किवा सध्याच्या काळात मुस्लीम तुष्टीकरणासाठी भ्रष्ट राज्यसत्तेचे अत्याचार म्हणा..... ते येणाऱ्या पिढीला भोगावे लागू नयेत म्हणून स्वतःचा असा हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे हे होते ते दिव्या ध्येय. या सर्वानी त्या त्या वेळी काही न काही अत्याचार भोगले होते. आणि आपल्या परीने त्या अन्यायाचा सामना केला होता...पण त्यांच्या या वैयक्तिक लढ्याला शिवाजी राजांनी सामान्य जनमानसाच्या लढ्याचे स्वरूप दिले....आणि याच अखंड लढ्यातूनच साडेतीनशे वर्षाच्या गुलामगीरीनंतर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला.....

जसे मी म्हटले कि राजांच्या भोवती असलेल्या प्रत्येक मावळ्याला एक इतिहास आहे.....तर अश्याच काही मोजक्या मावळ्यांचा इतिहास थोडक्यात आज सांगणार आहे.......जर सर्वच मावळ्यांच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाला........ तर मला वाटतं ....त्यासाठी विश्वकोश सुद्धा कमी पडेल.....असो....

बाजी पासलकर स्वराज्याचे पहिले सेनापती होते हे आपल्याला सर्वाना माहित आहे....हे बाजी मुसे खोर्याचे वतनदार....काहीसे स्वतंत्र बाण्याचे.....लोकांच्या भल्यासाठी झटणारे....भीम पराक्रमी............बाजी पासलकरांचा पराक्रम तर सर्वश्रुत होताच.....शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी कोंकणात घड्श्या कोळी नावाचा एक जबदस्त पराक्रमी पण तितकाच जुलमी राजा मातला होता...घाटावरच्या मराठ्यांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला आणि त्याच्या पूर्ण सैन्याचा बाजींनी बिलालपूर गावी पराभव केला......बाजी पासलकरांचे मावळातले वाढते वजन बघून चंद्रराव मोऱ्याने त्यांना पकडून आणीन अशी आदिलशाही दरबारात शपथ घेतली होती...आणि विश्राम गडावर हल्ला करायचा असफल प्रयत्न केला होता..चंद्रराव मोऱ्याची त्या हल्ल्यात बाजी पासलकरांनी दाणादाण उडवून दिली होती......तीच गत बाजींनी तवच्या खिंडीत आदिलशाही सैन्याची केली..............तर असे हे बाजी स्वराज्याच्या फतेहखानाशी खळदबेलसर या गावी झालेल्या पहिल्या लढाईत धारातीर्थी पडले.....स्वराज्यासाठी झटणारा पहिला खांब या पहिल्या लढाईतच पडला...

स्वराज्याचे दुसरे सेनापती नेताजी पालकर तर आपल्या अजोड पराक्रमाने प्रतिशिवाजी म्हणवले जात होते....ह्या नेताजी पालकरांचा इतिहास असा कि त्यांनी साधारण १६-२० वर्षाच्या दरम्यान जेव्हा त्यांच्या बहिणीची वरात निघाली तेव्हा काही आदिलशाही स्वारांनी त्यांच्या बहिणीला पळवून नेले...त्यावेळी आपले बहिणेचे रक्षण करताना नेताजींनी विजापूरच्या एका बड्या अधिकार्याला ठार केले....पण लढत असताना ते जखमी होऊन बेशुद्ध पडले...आणि दुसर्या एका अधिकार्याने त्यांना ते मेले असे समजून सोडून दिले....नेताजींना नंतर काही वर्ष आदिलशहा पासून वाचण्यासाठी माथेरान च्या शिखरावर राहणाऱ्या त्यांच्याच एका नातेवाईकाकडे - जो आता साधू म्हणून आयुष्य कंठत होता - त्यांच्याकडे ठेवण्यात आले...ह्या साधूने पूर्वाश्रमी योद्धा म्हणून बरीच वर्षे लढाया केल्या होत्या....लोकांची दयनीय अवस्था बघून त्यांना वाईट वाटे......त्यांनीच नेताजींना सर्व हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण दिले....... हा पराक्रमी योद्धा घडवला......आणि समाधी घेण्यापूर्वी नेताजी पालकरांनी शिवाजी राजांना जाऊन मिळावे अशी आज्ञा केली.....नंतरचा इतिहास तर सर्वज्ञात आहेच....

बाळाजी आवजी चिटणीस.... होय मित्रानो....बाळाजी आवजी चिटणीस...ज्याला संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते....त्यांच्या त्या एका दुष्कृत्यामुळे उभ्या आयुष्यातल्या पुण्याईला कलंक लागला....पण म्हणून त्यांनी आपल्या मुलाला स्वराज्याशी बेईमानी करायला शिकवले नाही.....गोव्याच्या पोर्तुगीजांवर जेव्हा संभाजी राजांनी हल्ला केला आणि ऐन युद्ध धुमाळीत राजे नदीच्या पत्रात वाहून जात होते..तेव्हा ह्याच खंडोजी बाळाजीने स्वतःचा जीव धोक्यात घालून राजांना वाचवले...तर ह्या बाळाजी आवजीना तर मुसलमानी रीयासतीचा सगळ्यात वाईट अनुभव आला होता.........त्यांचे पिताजी हे जंजिर्याच्या सिद्धीकडे एक अधिकारी होते.....पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्याविरुद्ध सिद्धी कडे कागाळी केली आणि मग मुसलमानी अत्याचाराच्या परंपरेला जागत सिद्धीने त्यांना पोत्यात बांधून भर समुद्रात फेकून दिले...तेही लहानग्या बाळाजीच्या समोर....नंतर बाळाजीना त्यांच्या आईसकट गुलामाच्या बाजारात विकायला पाठवले...पण राजापुरात एका हिंदू व्यक्तीने त्या मायलेकरांची खरेदी केली....ती व्यक्ती बाळाजीचे मामा होते..त्यांनीच मग बाळाजीचे पुढील शिक्षण केले....आणि बाळाजी तिथल्या एका मोठ्या व्यक्तीकडे मुन्शी किवा दिवाण म्हणून काम करू लागले....पण आपल्यावर आणि आपल्या इतर हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराची बोच त्यांच्या मनात सलत होती.....त्यातच एकदा त्यांनी त्या मोठ्या व्यक्तीकडून शिवाजी राजांना जाणार्या एका पत्राच्या थैलीतून स्वतः तर्फे एक पत्र पाठवले...आणि त्यात राजापुरातील परकीयांचे अत्याचारांचे वर्णन करून राजांना लवकर बोलावून घेतले...त्यांचे सुंदर हस्ताक्षर बघून राजांनी त्यांना आपल्या पदरी ठेऊन घेतले....

मुरारबाजी देशपांडे कोण होते आणि त्यांना राजांनी कुठून उचलले किवा आपल्या पक्षात घेतले...हे तर सर्वाना माहीतच आहे...

तर मित्रानो असे हे मावळे...ज्यांच्या आयुष्याला अनेक पदर आहेत....पण ह्या अनेक पदारानीच मिळून हिंदवी स्वराज्याचा सुंदर आणि तीतकच भक्कम वस्त्र विणलं.... 

मित्रानो आपण सर्वानीच कधी विचार केला असेल का कि शिवाजी राजांनी या अनेक स्वभावाच्या, भिन्न भिन्न परिस्थितीतून मार्ग काढत उभ्या राहिलेल्या मावळ्यांना एका उत्तुंग ध्येयाची जाणीव कशी करून दिली असेल?? त्यांची भिन्न स्वभावांची मने कशी सांभाळली असतील?? खरं तर या प्रश्नांची उत्तरे मिळणे खरच कठीण आहे...कारण राजे करू शकत नव्हते असे या जगांत काही नव्हते....

समर्थांनी म्हटल्याप्रमाणे 

शिवरायांचे कैसे चालणे ! शिवरायांचे कैसे बोलणे !

शिवरायांची सलगी देणे ! कैसी असे !!

खरच शिवराय समजणे खूप मुश्कील आहे.....ज्यांना ते समजतील..त्यांनी अमृत योग साधलाच म्हणून समजा...........

जय भवानी !! जय शिवाजी !!

From - Notes of Prasad Raut.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांना लिहिलेलेपत्र.


!! श्री !!

श्री रघुपती 

श्री मारुती

श्रीसद्गुरुवर्य श्रीसकलतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी

चरणराज शिवाजीराजे यांनी चरणावर मस्तक ठेऊन विज्ञापना जे मजवर कृपा करून सनाथ केले.

आज्ञा केली कि तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना देवब्राम्हणाची सेवा प्रजेची पिडा दूर करून पाळण रक्षण करावे हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. 

तुम्ही जे मनी धराल ते सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा. विपुल द्रव्य करुनू राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशी स्थळे दुर्घट 

करावी. ऐसे जे जे मनी धरिले ते ते स्वामींनी आशीर्वाद प्रतापे मनोरथ पूर्ण केले. याउपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करून सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनी 

आणिला तेव्हा आज्ञा जाहली कि तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय. ऐसे आज्ञापिले यावरून नीकटवास घडूनु वारंवार दर्शन घडावे श्रीची स्थापना 

कोठे तरी होऊन सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी ऐसी प्रार्थना केली तेही आसमंतात गीरीगव्हरी वास करून चाफळी श्रीची स्थापना करून सांप्रदाय शिष्य 

दिगंत विस्तीर्णता घडली त्यास चाफाळी श्रीची पूजा मोहोछाव ब्राह्मणभोजन अतिथी इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीची मुर्तीस्थापणा जाहाली तेथे उछाव 

पूजा घडावी यास राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा जाहाली कि विशेष उपाधीचे कारण काय तथापि तुमचे मनी श्रीची 

सेवा घडावी. हा निश्चय जाहाला त्यास यथा अवकाश जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे व पुढे जसा सांप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तैसे करीत जावे. या 

प्रकारे आज्ञा जाहाली यावरून देशांतरी सांप्रदाय व श्रीची स्थापना जाहाल्या त्यास ग्रामभूमीची पत्रे करून पाठविली. श्रीसंनिध चाफळी एकशेएकवीस गाव व सर्वमान्य 

एकशेएकवीस गावी अकरा बिघेप्रमाणे भूमी व अकरा स्थळी श्रीची स्थापना जाहाली तेथे नैवेद्यपुजेस अकरा बिघेप्रमाणे नेमिले आहे. ती ऐसा संकल्प केला आहे तो सिद्धीस 

नेण्याविषयी विनंती केली तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहाली त्यावरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले. 

यकून दरोबस्त सर्वमान्य गाऊ तेहतीस, व जमीन बिघे गाऊगना चारशे येकुणीस, कुरण येक व गल्ली खंडी एकशे एकवीस श्रीचे पूजा उछाहाबद्दल संकल्पातील सांप्रत 

नेमिले व उछाहाचे दिवसास व इमारतीस नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. येणे करोन अक्षई उच्छाहादी चालवण्याविषयी आज्ञा असावी. 

राज्याभिषेक ५ कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे आश्विन शुद्ध १० दशमी.

बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. 

संदर्भ - चाफळची सनद.
श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन

शिवचरित्राचे अभ्यासक का मारेकरी ?

१) संभाजी ब्रिगेडचा आणि छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या इतिहासाचा काडीमात्रही संबंध येत नाही. मुळात ‘संभाजी’ हा पर्शियन अपभ्रंशित उच्चार आहे. मूळ शब्द ‘शंभू अथवा शंभाजी’ असाच आहे. शिवरायांचे कुळदैवत शंभू महादेव त्याच नामावरून त्यांनी आपल्या जेष्ठ सुपुत्राचे नाव ठेवले होते. शंभाजी राजांच्या नाण्यांवर (श्री. राजा शंभु), मुद्रेवर ‘श्री शंभू शिवराजस्य...’, तसेच पत्रांवरही ‘शंभू’ असाच स्पष्ट उल्लेख आढळतो. पर्शियन लिपीत ‘श’ हे अक्षर नसल्याने त्याचा उल्लेख यवनांकडून ‘सिवा’ (शिवाजी नव्हे), ‘संभा’ (शंभाजी नव्हे) असाच त्रुटीत/अपभ्रंशित केला जाई. जे सर्वाथैव चुकीचे आहे. दुसरा शब्द ब्रिगेड, हा ही एक फिरंगी शब्द आहे. त्यामुळे ज्या दिंदवी स्वराज्या संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा भव्य-दिव्य ‘जेष्ठ शुद्ध त्रयोदशी’ला केलेल्या राजाभिषेकानंतर व्यवहारातील पर्शियन, उर्दू भाषेचे वर्चस्व झुगारून आपली नाणी देवनागरी लिपीत पाडली, प्रचलित पर्शियन, अरेबिक शब्दांना संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधून ‘राजव्यवहार कोष’ सिद्धं करवला त्या धर्माभिमानी (म्हणजे इतर धर्माचा दुस्वास नव्हे) राजाचा आणि या यावनी-फिरंगी नामयुक्त संस्थेचा दूरान्वयानेही संबंध नाही हे ध्यानात घेणे सर्व प्रथम आवश्यक आहे.

२) यांनी आजवर शिवरायांच्या आचारांच्या, विचारांच्या, नीतीच्या विरोधात उपक्रम करून, समाजस्वास्थ्य बिघडवून, जातीनिहाय राजकारणाची कास धरून निव्वळ ब्राम्हणद्वेष म्हणजेच शिवरायांचा ‘खरा इतिहास’ असे वारंवार सांगण्यातच अभिमान बाळगला, नव्हे तर तसेच आचरणही केले. शिवरायांच्या उच्च मूल्यांचा बळी तर ही मंडळी पदोपदी देत आहेत. कधी दादोजी कोंडदेव, कधी मोरोपंत पंतप्रधान, अण्णाजी दत्तो सुरनीस, कधी अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अशांचीच नावे घेत आपले जातीनिहाय राजकारण साधायचे. मात्र ज्या भोसले घराण्याने दादोजींना, मोरोपंतांना, सोनोपंत डबीरांना अत्यंत मानाने वागवले त्याच व्यक्तींवर चिखलफेक करून ही मंडळी ब्राम्हणांचा नव्हे तर खुद्द महाराष्ट्राला प्रथम पूजनीय अशा ‘भोसले’ घराण्याचाच उपमर्द करत आहेत असे म्हटले तर ते चूक ठरू नये. श्री क्षेत्र महाबळेश्वरी मातृभक्त शिवरायांनी जिजाऊसाहेबांची ‘सुवर्णतुला’ केली त्याचवेळी त्या श्रीमंत योग्याने शहाजीराजांपासून निष्ठेने स्वराज्याची सेवा करणाऱ्या सोनोपंत डबीरांचीही सुवर्णतुला केली. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर अनेक उपलब्ध पत्रांत त्यांचा आदरार्थी उल्लेख करणारे आचारशील, विचारशील शिवराय ‘आपण पोरके झालो’ असाही उल्लेख करत आहेत. शिवराय स्वराज्याच्या निष्ठावान सेवकाला या शब्दांनी धन्य करीत असतांना या संघटना त्यांचे पुतळे हटवून खुद्द छत्रपति शिवरायांच्याच अमर आत्म्याला अत्यंत क्लेष देत आहेत यात कोणतीही शंका नाही.

३) कोण्या एका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून अख्ख्या महाराष्ट्राला त्या हीन शब्दांचा/वाक्याचा परिचय करून देऊन ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत. ज्या भांडारकर इंस्टिट्यूटवर बेगुमानपणे हल्ला चढवून त्या वास्तूतील ग्रंथसंपदा याच पराक्रमी वीरांनी(?)पायदळी तुडवली, फाडली, जाळली, नासधूस केली त्यांना सोप्या शब्दांत सांगावेसे वाटते की त्या साऱ्याच पुस्तकांत पानापानांवर, वाक्या-वाक्यांमध्ये शहाजी महाराज, जिजाऊ साहेब, शिवराय, शंभाजी महाराज, राजाराम महाराज आदि महाराष्ट्रालाच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय अशा व्यक्तींचीच नावे, उल्लेख, छायाचित्रे होती. विकाराने विचारांवर मात केली की असे घडते. याचेच गोंडस नाव म्हणजे ‘असंतोष’. ज्या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या विरोधात यांचे सूर काळी सातला पोहोचतात ते नव्वदीतील शिवशाहीर म्हणतात की मी अजूनही शिवचरित्राचा एक छोटासा विद्यार्थीच आहे. त्यांना एकेरी नावाने उल्लेखून आपण उच्च पदाला जाऊ शकत नाही. तसेच आमचे स्पष्ट मत असे आहे की आपल्या कथनानुसार जर बाबासाहेब हे कोळसा आहेत तर इतकी वर्षे महाराष्ट्रातच, देशातच नव्हे तर परदेशातही शिवचरित्राचा सुगंध पसरवणारे, क्षणेक्षणी झिजणारे चंदन कोठे सापडेल ते दाखवावे अन्यथा व्यक्तीद्वेषातून, जातीद्वेषातून त्यांना लाखोली वाहणे थांबवावे.

४) मालवण नजीकच्या कुरटेबेटावर जेव्हा शिवरायांनी सिंधुदुर्गाचा पहिला चिरा पूजला तेव्हा त्यांनी स्थानिक उपाध्ये जानभट व दादंभट अभ्यंकर यांना पौरोहित्य करण्यास पाचारले, तेव्हा प्राणभयाने दोघेही सुरूवातीस येईनात तेव्हा त्यांना राजी करून, दिलासा देऊन मग त्या दुर्गाचे कायमस्वरूपी उपाध्येपण दिले. शिवनिधनोत्तर कालखंडात जेव्हा सिंधुदुर्ग पाडाव झाला तेव्हाही या घराण्याने “अखेरपर्यंत सेवा करीन” ह्या शिवरायांना दिलेल्या शब्दांशी ईमान राखून गड सोडण्यास नकार दिला. अफजल वधावेळी कृष्णाजी भास्कर या ब्राम्हणाने महाराजांवर तलवार धरली म्हणून वारंवार उल्लेख केला जातो पण त्याच अफजलच्या अंगरक्षकांत शंकराजी व पिलाजी मोहिते हे शिवरायांचे नातलग, तसेच त्यांचे चुलत चुलते मंबाजीराजे भोसले, जे त्याच लढाईत मारले गेले, त्यांच्याबद्दल अवाक्षरही निघत नाही. ज्या शंभाजी महाराजांच्या नावाने या भ्रष्ट संघटना सुरू आहेत त्या धर्मवीर छत्रपतिंना पकडून देण्यात त्यांचेच मेव्हणे व खुद्द शिवरायांचे जामात अशा दुहेरी नातेसंबंधात असूनही सदैव स्वराज्याच्या उदात्त हेतूऐवजी स्वतःच्या वतनाचाच आत्मकेंद्रित विचार करणारे गणोजी शिर्के हे प्रशंसेला पात्र ठरतात का? शंभाजी महाराजांसोबत वीरमरण पत्करणारे कवी कलश हे मात्र यांच्या दुर्दैवाने ब्राम्हण होते. थोडे मागे जाऊन पाहता, खुद्द शिवरायांच्या वडिलांवर म्हणजेच शाहाजी राजांवर तलवारीचा घाव घालणारे हे त्यांचेच ‘श्वशुर’ लखुजीराव जाधवराव होते हे इतिहासासही मान्य आहे. खुद्द सावत्रबंधू एकोजीरोजे हे ही अनेकदा शिवरायांविरूद्ध युद्धास ठाकले होते.

५) मुळात शिवचरित्र हा जातीयतेचा चष्मा लावून वाचण्याचा, अभ्यासण्याचा अथवा विवेचन करण्याचा विषय नाही. जे आजवर या देशात कधी घडले नव्हते ते छत्रपति शिवरायांनी अठरा पगड जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून, स्वराज्याच्या महान सूत्रात बांधून हे पार्थ-पराक्रमी कार्य घडवून आणले. यात जसे पिढीजात वतनदार, पाटील, देशमुख, कुलकर्णी होते तसेच सर्वसामान्य घराण्यातील पण आपल्या असामान्य कामगिरीने शिवचरित्रात मानाचे पान लिहिणारेही अनेक झाले. त्यांच्याकडे हा अमका, तो तमका अशा विशिष्ट मनोवृत्तीने न पाहता हिंदवी स्वराज्यस्थापनेकरिता त्यांनी केलेले अजोड, प्रामाणिक प्रयत्न लक्षात घेणे हेच खऱ्या इतिहासअभ्यासकाचे लक्षण आहे. एकाच जातीला टार्गेट करून विनाकारण समाजमन कलुषित करून स्वार्थ साधण्याचे उद्योग आता सोडले पाहिजेत. वर्षानुवर्षे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अव्याहतपणे राजरोस विकली जाणारी छत्रपती शंभाजी महाराजांच्या नावाची संभाजी बिडी सुद्धा हे बंद करू शकत नाहीत त्यांनी व्यर्थ ‘खरा इतिहास’ या नावाखाली लोकांना भडकवू नये इतकीच अपेक्षा.





महाराष्ट्रातील शिवभक्तांची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न कोल्हापूरवासीय विशिष्टं संघटनांकडून होत आहे. राजाभीषेकदिन तारखेप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्नं तसेच त्यानिमित्ताने समाजमन भडकवून शिवभक्तीचे नारे दिले जात आहेत. सरकारला हा विषय नीट न समजल्यामुळे सरकार त्याला पाठिंबा देत आहे.


- शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड
rajabhishek.samiti@gmail.com
हिंदु ,मुस्लीम ई.धर्म असले तरीही प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा धर्म असतो (व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ) दोन देशांत जशी भांडणे असतात तशी ,दोन गावांत ,एका गावांतील दोन आळ्यामध्ये विकोपाची भांडणे असतात ,शेजाऱ्यांमध्ये असतात आणि शेवटी दोन सख्या भावांमध्ये जीवघेणी भांडणे असतात, तरीही एकविसाव्या प्रगत, विज्ञानाची गगनभरारी घेतलेल्या या युगांत विशिष्ठ समाज संपविणे, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या आईबहीनींचा गलीच्च भाषेत उद्धार करणे हे सभ्यतेचे लक्षण म्हणता येईल काय ? अहो या धर्मांची निर्मिती कशी झाली ? सूर्यापासून अलग झालेला एक तुकडा म्हणजे आपली पृथ्वी काही कोटी वर्षांनी ती थंड झाली जीवश्रुष्टीला पोषक वातावरण निर्माण होत असताना इथे जीव निर्माण झाले काही कोटी वर्षांनी मानव तयार झाला ज्याला कसला विधिनिषेध नव्हता तो नरमांस खात होता ,आई ,बहीण या नात्यांची त्याला ओळख नव्हती ,वस्त्रे नव्हती. अशावेळी कुणीतरी ज्ञाते निर्माण झाले. त्यांनी आहारविहार, अचार्विचाराची संहिता निर्माण केली याच आचारसंहितेला धर्म ही संज्ञा मिळाली. तेंव्हा धर्म माणसासाठी होता आता माणूस धर्मासाठी अशी स्थिती होतेय. हे धर्म नव्हेत अधर्म आहेत असेच खेदाने म्हणावे लागतेय. पुतळ्यासाठी, मानवनिर्मित नामांतरासाठी वस्त्या जाळणारे, गळे चिरणारे धर्म? कुणीतरी ऐरेगैरे भडकावू कृतीने कुणाला नष्ट करण्यासाठी संघटना स्थापतात, जहरी भाषणे ठोकतात ही प्रगतीकडची वाट म्हणायची कि अधोगतीकडची आडवाट म्हणायची ? आजच्या उच्च शिक्षित पिढीच्या हे ध्यानांत येवू नये ?

संभाजी ब्रिगेडमध्ये मराठा समाजाचा मोठा सहभाग आहे हा दावा खोटा आहे. त्यांनी कावेबाजपणे मराठ्यांची दिशाभूल करण्याचा खेळ चालवला आहे हे खरे आहे. त्यासाठी त्यांनी नियोजनपूर्वक खेळी केल्या आहेत. मराठ्यांचा मानबिंदू असलेल्या शिवराय ,संभाजीराजे ,जिजामाता यांच्या नावाचा सतत वापर केला. या नावांवर मराठे भावनिक होतात हे जाणून त्यांनी सतत आम्ही शिवरायांचे पाईक असल्याचा भास निर्माण केला. वास्तविक शिवाजी महाराजांनी कसले थोर कार्य केले? अशीच त्यांच्या पुस्तकांतील भाषा आहे.

माझ्या मराठा बांधवांनी हे जाणून घ्यावे. ब्रिगेडी आणि कंपनी फक्त बाबासाहेबांना श्रेष्ठ मानतात. शिवरायांबद्ध्ल त्यांच्या मनांत काडीमात्र आदर नाही. त्यांना हिंदु धर्मावर निष्ठा असणाराला बाजूला करायचेय.
त्यांचा आंतला अजेंडा हाच आहे आणि हे जाणून सर्वांनी यांना दूर ठेवणे, वेळप्रसंगी यांना ठेचणे जरुरीचे आहे. जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना शिवराय कळलेले नाहीत. ब्रिगेडी समूहाला कळून चुकलेय कि आपल्याला सत्तेत शिरकाव मिळणे दुरापास्त आहे म्हणूनच त्यांनी जातीजातींत कटुता वाढविण्याचा खेळ चालविलेला आहे.

- Dilip Palkar

संभाजी महाराज

आज काल एक नवीन फॅड आलय बाजारात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अथवा मराठेशाही मधील काही किस्से सांगताना मुद्दाम ब्राह्मणांचा अपमान केला जातो. हे मी गेले कित्येक महिने पाहत आलोय. आम्ही जातीयवाद करत नाही वगैरे बोलणारे बरेच लोकं आहेत फेसबुकवर पण संधी मिळताच छुपे टोमणे मारणे सोडत नाहीत! "संभाजी महाराज द ग्रेट" वगैरे नावाने पेज चालवायचं अन संभाजी महाराजांनी आयुष्यात केला नाही तो जातीयवाद करायचा- हा ह्यांचा धंदा! 
ब्राह्मणांना ऐतखाऊ, वाईट, द्रोही, कपटी दाखवण्याचे ह्यांचे धंदे कोणत्या ठरला जातात ते पहा:

१. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मारला हे खरं. पण म्हणून तो द्रोही कसा? तो खानाची चाकरी करत होता! त्याने त्याच्या मालकाच्या शत्रूला मारायचा प्रयत्न केला! ह्याचाच अर्थ तो कर्तव्यनिष्ठ होता! सय्यद बंडाने देखील हेच केले! आणि खुद्द अफझल? त्याने तर घात केला, महाराजांना (अपेक्षित) मिठीत घेऊन मारण्याचा प्रयत्न - केवढा मोठा धोका केला त्याने. पण हे आज कालचे सळसळत्या रक्ताचे इतिहासवीर - खानाचे क्रौर्य, त्याचा हिंदू धर्म द्वेष - शहाजी महाराजांस केलेली अटक, संभाजी राजांस कपट करून मारलेले आठवत नाही! त्याच्या बद्दल एक चकार शब्द नाही! 

२. परवाच एक पोस्ट वाचली - संभाजी महाराजांवर. त्यात एक ओळ अशी होती - "शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावर "जगलेले" पेशवे शिकवतात पण संभाजी महाराज नाही शिकवत". 

होय! आमचे संभाजी महाराज आहेतच शूर, पराक्रमी अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित - आणि म्हणून त्यांनी कधीच कुठल्याच जातीचा द्वेष केला नाही! लोकांना हे ठाऊक नाही संभाजी महाराजांना गणोजी शिर्के हाय त्यांच्या मेहुण्याने फितुरीने पकडून दिले - आता त्या शिर्केची जात काय होती? सांगू? तो पण मराठाच होता ना? पण आमच्यावर महराजांचे संस्कार आहेत. आम्ही जातीवरून माणसाची पारख करायला शिकलो नाही! बरं संभाजी महाराजांसोबत अखेर पर्यंत कोण होता? कवी कलश - तो देखील ब्राह्मण! पण तो तर स्वामीनिष्ठ होता! आता हे समीकरण कसे जुळवायचे? 

बरं पेशवे ऐतखाऊ तर मग त्यांनी कशाला राज्य विस्ताराचा घाट घातला? कशाला बाजीराव पेशव्यांनी अखंड हिंदुस्तान घोड्याच्या टापांखाली घातला? का भीमथडीची घोडी यमुनेचे पाणी पिऊ लागली आणि काही काळानंतर सिंधू नदीच पाणी पिउन आली? त्यांचा आदर्श कोण होतं ? अर्थात शिवाजी महाराज! पेश्य्वांचा दरारा १७६१ पर्यंत देशभर इतका प्रचंड होता पण एकदाही त्यांनी कधी फितुरी नाही केली, स्वतःच राज्य नाही स्थापलं किंवा छत्रपतींच्या आज्ञेबाहेर नाही गेले! ह्याला म्हणतात स्वामिनिष्ठा! 

३. महाराज गेले तेव्हा औरंगझेबाला किती दुःख झालं असं सांगणारा एक मेसेज फेसबुकवर सध्या शेअर केला जातोय. हा औरंग्या - स्वतःच्या बापाला मारला ह्याने, भावांची कत्तल करवली, कुराणाची खोटी शपथ खावून आपल्याला शरण आलेल्या लहान भावास दरबारात येण्या अगोदर मारेकरी घालून मारणारा हा नराधम! ह्याला महाराजांच्या मृत्युचं दुःख? आणि ह्याचं कौतुक होतंय सुफी संत म्हणून! आणि हे करतंय कोण? आपलीच लोकं! आणि संभाजी राजांना ब्राह्मणांनी मारल असा खोटा आरोप करत सुटलेत. "शिवाजी अंडरग्राउंड…" ह्या नाटकात सर्रास आरोप आहे हा! आणि हे नाटक सेन्सॉर वाले चालू देतात! आणि ह्या असल्या जातीयवादी शिवभक्तांना प्रोत्साहन द्यायला आहेतच सळसळत रक्त घेऊन उभे असलेले अर्धवट इतिहासकार!

असे बरेच खोटे आरोप आहेत. त्यांना हाणून पडणारे ऐतिहासिक पुरावे देखील आहेत. आणि आता प्रत्येक वेळी ते पुरावे देऊनच असल्या कुत्र्यांची तोंडे बंद केली पहिजेत. हि कुत्री भुंकायला लागली कि एकलव्यासारखे पुराव्याचे बाण सोडून त्यांची तोंडं बाणांनी भरून टाकली पाहिजेत! वेळचं वेळीच हे थांबलं पाहिजे आता! 

एक दीड शहाणा म्हणाला - "हा इतिहास आहे कोणाच्या भावना दुखावतील तर त्याला मी काही करू शकत नाही. "
इतिहासाचा अभ्यास करताना भावना बाजूला ठेवायच्या असतात हे मी तुला आज सांगतोय. जर मी आज इतिहास सांगू लागलो तर काही गोष्टी तुला झेपणार देखील नाहीत मित्रा! त्यामुळे खरा इतिहास वाच! फेसबुकवर ब्रीगडी लांडगे चेकाळले आहेत! त्यांची कोल्हेकुई ऐकू नकोस! 

हा इशारा आहे त्या सर्व जातीयवादी ब्रीगडी आणि त्यांच्या पिलावळीला! 
सावधान!!