आपल्या पैकी बहुतांशजण धार्मिक आहोत. सात्विक आहोत, समर्थ भक्त आहोत. तसे आपण असलो म्हणजे आपली मुलेही तशीच किंबहुना अधि
क चांगली निपजतील अशी आपली एक प्रामाणिक भावना असते! नाही का?
पण जरा थांबा! असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय!
कशावरून???
सध्या महाराष्ट्रात जितेन्द्र आव्हाड नामक एका आमदाराने जो धुमाकुळ चालवलाय तो पाहता कसे वाटते हो आपल्याला? वयाची बुज नाही, ज्ञानाची कदर नाही, कार्याचे मोल नाही की समाजमताचे भान नाही! तेच वाटून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री. नितिनराव चौगुले यांनी भर टीव्हीवर त्यांचा बापही काढला! पण हा पठ्ठा ढिम्म!! याच प्रकरणाच्या जरा खोलात आपण जाऊ...
आमच्या विश्वसनीय सुत्रांकडून आम्हाला जे कळाले ते धक्कादायक होते! (आव्हाडांनाही भिडे गुरुजींबद्दल कळवणारी काही सुत्रे आहेत हे स्वत: तेच TVवर सांगतात! तसेच हे!)
ते असे,की जितेन्द्रचे वडील आदरणीय सतीशराव भास्करराव आव्हाड हे अत्यंत सत्शील, सद्भक्त व सदाचरणी व्यक्ती असून अत्यंत उच्च कोटीचे अध्यात्मिक महापुरुष श्री निसर्गदत्त महाराज यांचे निस्सीम सेवक आहेत! शिष्य आहेत!
केवळ शिष्य नाहीत तर महाराजांचे सर्व वाङ्मय सर्वप्रथम छापून प्रकाशित करून वितरीत करून जगभर त्यांचे विशुद्ध अध्यात्मिक विचारांचा जागर करण्याचे महापुण्याचे काम ते अविरत करीत आहेत! काडसिद्धेश्वर महाराजांच्या गुरु परंपरेतील या संप्रदायात दासबोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे! इतके की रोज दासबोध वाचल्याखेरीज या संप्रदायाचे लोक अन्न ग्रहण करीत नाहीत! कुण्णुर चे गणपतराव महाराज हे ही याच परंपरेतील संत ज्यांनी अनुवादीत केलेला कन्नड दासबोध आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे! याच संप्रदायाचे निंबाळ येथील गुरुदेव रानडे दासबोधावर उत्तम बोलत व त्यांचे जयपुरस्थित शिष्य डॉ. दाते अनुवादित हिंदी दासबोधही आपल्या संकेतस्थळावर आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचाही दासबोधाच्या प्रचारावर अत्यंत भर असे. तात्पर्य, हा संप्रदाय समर्थभक्त व दासबोध अनुसरणारा, जगणारा आहे. आदरणीय सतीशराव आव्हाड यांना त्यांच्या पवित्र, महान व उदात्त कार्याबद्दल या संप्रदायामध्ये व अन्यही समर्थभक्तांमध्ये अत्यंत आदराचे, मानाचे स्थान आहे व ते योग्यच आहे.
अशा रितीने दासबोधावर अधिकार वाणीने भाष्य करू शकणारे वडील असताना, त्यांचेच सुपुत्र जितेन्द्र असे कसे? (मतांसाठी अव्हाडांइतक्या समर्थांना शिव्या आजवर कुणी घातल्या नसतील) असो.
जितेन्द्र म्हणाजे इन्द्रियांवर विजय मिळवलेला, परंतु यांच्या कुठल्याच कृतीत तो इंद्रियजय दिसत नाही, मग ते वचा वचा बोलणे असो, कचा कचा चिक्की तोडणे असो की २००० पुरुष (?) समर्थक समोर असताना, पोलीस कडे असताना भिडे गुरुजींच्या केवळ दोन वाघांना घाबरून स्त्रियांच्या मागे जाऊन लपणे असो! (स्त्रिया समोर असताना भिडे गुरुजींचा़ मर्यादशील धारकरी हात उचलूच शकत नाही हे जाणून)
एका सद्भक्त बापाच्या पोटी असे पोर का जन्माला यावे? इथेच बालसंगोपनाचा मुद्दा पुढे येतो! आपला मुलगा कुठे जातो? काय करतो? कुणाला भेटतो? कुणाच्या हाताखालचे बाहुले बनतो याकडे इथून पुढे सर्व सज्जन बापांचे लक्ष हवे!
सेंट जॉन बाप्तिस्ट हायस्कूल मध्ये जितेन्द्र ला घालताना त्याच्या वडिलांना चुकूनही वाटले नसेल की पुढे हा मुलगा इतका "प्रसिद्ध" होईल!
अस्सो, जे झाले ते तर झाले, निदान आता तरी आपण या प्रकरणावरून धडा घेऊन आपल्या मुलांचे संगोपनाकडे नीट लक्ष देऊयात!
कारण समर्थ जर म्हणतात
सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख॥
तर मग "घालवे वडिलांची कीर्ती" अशा पुत्राला ते काय बरे म्हणतील?
॥ http://दासबोध.भारत/ ॥
क चांगली निपजतील अशी आपली एक प्रामाणिक भावना असते! नाही का?
पण जरा थांबा! असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय!
कशावरून???
सध्या महाराष्ट्रात जितेन्द्र आव्हाड नामक एका आमदाराने जो धुमाकुळ चालवलाय तो पाहता कसे वाटते हो आपल्याला? वयाची बुज नाही, ज्ञानाची कदर नाही, कार्याचे मोल नाही की समाजमताचे भान नाही! तेच वाटून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री. नितिनराव चौगुले यांनी भर टीव्हीवर त्यांचा बापही काढला! पण हा पठ्ठा ढिम्म!! याच प्रकरणाच्या जरा खोलात आपण जाऊ...
आमच्या विश्वसनीय सुत्रांकडून आम्हाला जे कळाले ते धक्कादायक होते! (आव्हाडांनाही भिडे गुरुजींबद्दल कळवणारी काही सुत्रे आहेत हे स्वत: तेच TVवर सांगतात! तसेच हे!)
ते असे,की जितेन्द्रचे वडील आदरणीय सतीशराव भास्करराव आव्हाड हे अत्यंत सत्शील, सद्भक्त व सदाचरणी व्यक्ती असून अत्यंत उच्च कोटीचे अध्यात्मिक महापुरुष श्री निसर्गदत्त महाराज यांचे निस्सीम सेवक आहेत! शिष्य आहेत!
केवळ शिष्य नाहीत तर महाराजांचे सर्व वाङ्मय सर्वप्रथम छापून प्रकाशित करून वितरीत करून जगभर त्यांचे विशुद्ध अध्यात्मिक विचारांचा जागर करण्याचे महापुण्याचे काम ते अविरत करीत आहेत! काडसिद्धेश्वर महाराजांच्या गुरु परंपरेतील या संप्रदायात दासबोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे! इतके की रोज दासबोध वाचल्याखेरीज या संप्रदायाचे लोक अन्न ग्रहण करीत नाहीत! कुण्णुर चे गणपतराव महाराज हे ही याच परंपरेतील संत ज्यांनी अनुवादीत केलेला कन्नड दासबोध आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे! याच संप्रदायाचे निंबाळ येथील गुरुदेव रानडे दासबोधावर उत्तम बोलत व त्यांचे जयपुरस्थित शिष्य डॉ. दाते अनुवादित हिंदी दासबोधही आपल्या संकेतस्थळावर आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचाही दासबोधाच्या प्रचारावर अत्यंत भर असे. तात्पर्य, हा संप्रदाय समर्थभक्त व दासबोध अनुसरणारा, जगणारा आहे. आदरणीय सतीशराव आव्हाड यांना त्यांच्या पवित्र, महान व उदात्त कार्याबद्दल या संप्रदायामध्ये व अन्यही समर्थभक्तांमध्ये अत्यंत आदराचे, मानाचे स्थान आहे व ते योग्यच आहे.
अशा रितीने दासबोधावर अधिकार वाणीने भाष्य करू शकणारे वडील असताना, त्यांचेच सुपुत्र जितेन्द्र असे कसे? (मतांसाठी अव्हाडांइतक्या समर्थांना शिव्या आजवर कुणी घातल्या नसतील) असो.
जितेन्द्र म्हणाजे इन्द्रियांवर विजय मिळवलेला, परंतु यांच्या कुठल्याच कृतीत तो इंद्रियजय दिसत नाही, मग ते वचा वचा बोलणे असो, कचा कचा चिक्की तोडणे असो की २००० पुरुष (?) समर्थक समोर असताना, पोलीस कडे असताना भिडे गुरुजींच्या केवळ दोन वाघांना घाबरून स्त्रियांच्या मागे जाऊन लपणे असो! (स्त्रिया समोर असताना भिडे गुरुजींचा़ मर्यादशील धारकरी हात उचलूच शकत नाही हे जाणून)
एका सद्भक्त बापाच्या पोटी असे पोर का जन्माला यावे? इथेच बालसंगोपनाचा मुद्दा पुढे येतो! आपला मुलगा कुठे जातो? काय करतो? कुणाला भेटतो? कुणाच्या हाताखालचे बाहुले बनतो याकडे इथून पुढे सर्व सज्जन बापांचे लक्ष हवे!
सेंट जॉन बाप्तिस्ट हायस्कूल मध्ये जितेन्द्र ला घालताना त्याच्या वडिलांना चुकूनही वाटले नसेल की पुढे हा मुलगा इतका "प्रसिद्ध" होईल!
अस्सो, जे झाले ते तर झाले, निदान आता तरी आपण या प्रकरणावरून धडा घेऊन आपल्या मुलांचे संगोपनाकडे नीट लक्ष देऊयात!
कारण समर्थ जर म्हणतात
सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख॥
तर मग "घालवे वडिलांची कीर्ती" अशा पुत्राला ते काय बरे म्हणतील?
॥ http://दासबोध.भारत/ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा