बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

सतिप्रथा

रामायण महाभारत काळापासुन ते थेट मध्ययुगापर्यंत सती प्रथा नव्हती. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा, मंदोदरी, अंबीका, अंबालीका, कुंती, उत्तरा पासुन ते राणी दुर्गावती पर्यंत खुप मोठी विधवांची लिस्ट आहे, शिवपत्नी सती कडून आपल्या पतिचा अपमान सहन न झाल्यामुळे आपले वडील दक्ष यांचा यज्ञ नष्ट करण्याच्या उद्देशातून आत्मदहन केले. आपल्या पती साठी प्रती सती चे समर्पण हे समर्पणाची पराकाष्ठा मानली गेली. परंतु ही हा ना एखादी परंपरा होती ना कोणता धार्मीक संस्कार.
जेव्हा हिंदुत्थान वर मुसलमान आक्रमकांनी आतंक पसरवायला सुरवात केली आणि पुरुषांच्या हत्या केल्यानंतर महीलांचे अपहरण करुन त्यांच्यासोबत दुर्व्यवहार, बलात्कार करायला सुरवात केली तेव्हा बहुसंख्य महिलांनी त्यांच्या हाती लागण्याहून आपला जीव देणे बेहत्तर समजले. आणि जेव्हा अल्लाउद्दीन खलजीने पद्मावतीला मिळवण्यासाठी चित्तोड मध्ये नरसंहार केला त्यावेळी आपले शिल वाचवण्यासाठी पद्मावती सोबत सर्व राजपूर विधवांनी सामूहिक जौहार केला तेव्हा सती प्रती सन्मान वाढला गेला आणि त्यानंतर सतीप्रथा परंपरा मध्ये बदलली गेली.
ज्या बौद्धांनी आक्रमकांशी दोन हात करण्या ऐवजी धर्म बदलणे पसंत केले (अफघाणीस्थान, पाकीस्तान, बंगाल, इंडोनेशिया, मलेशिया, तिब्बल इत्यादी क्षेत्र आधी बौद्ध बहुल होते ) अशांना कधी समजु शकत नाही (आणि आजही समजत नाही) की धर्मासाठी शत्रुसोबत दोन हात करुन पतीला विरमरण आल्यावर शत्रुकडून बेईज्जत होण्यापेक्षा स्वत:चे आत्मदहन करणे. त्यानंतर या परंपरेचे स्वरुप प्रथे मध्ये झाले आणि परिवारातील लोकांकडून कर्त्या पुरुषाची कमाई आणि मालमत्ता हडपण्याच्या उद्देशातुन विधवेला बळजबरी ने आगीत ढकलून देणे वगैरे कुप्रथा सुरु झाली.
या प्रथेला धर्म नाही, तर तत्कालीन समाजाची सामाजीक परिस्थिती आणि लालची लोकांची नियत जबाबदार आहे. नंतर राजा राम मोहन राय जी नी प्रयत्नाने या प्रत्येला पुर्णविराम लावला. सांगण्याचा उद्देश हाच की हिंदु धर्मातील कूप्रथांना कोणताही शास्त्रिय आधार नव्हता आणि नाही, त्या उदयास येण्यामागची कारणे ही तत्कालीन परिस्थिती होती आणि ती प्रथा किंवा परंपरा समाजमान्य होण्याची कारणे वेगळी होती. ही कारणे सामाजीक होती धार्मीक नव्हे, ( ज्यांना धार्मिक आणि सामाजीक या दोन गोष्टी मधला फरक कळत नाही अशांनी नसत्या विषयात ढवळाढवळ करु नये, हा आपला प्रांत नव्हे. ) आणि त्या प्रथा आणि परंपरा वेळोवेळी दुर केल्या गेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा