बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

पुण्यातील तालिबानी




बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी जेम्स लेन च्या पुस्तक संधार्बत लिहलेले

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नवहे तर सार्‍या भारताचे आराध्य प्रेरणा स्थान आहे. म्हणूनच भारतीयांच्या अशा प्रेरणास्थानांची हीन आणि निराधार चिकीत्सा करण्याची खोड पाश्‍चात्यांमध्ये दिसून येते. ती परंपराच झाली आहे. ती मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचे विशेषत: आद्य छत्रपति स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराच यांच्या जीवनाचे अत्यंत अभ्यासपूर्वक दर्शन जनतेपुढे यावे अशी अतिशय दुरर्दशी इच्छा भूतपूर्व महाराष्ट्र - मुख्यमंत्री , भारताचे माजी संरक्षणमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी उपपंतप्रधान माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या मनात तळमळीने होती. मुख्यमंत्री असताना त्यंनी याबाबतीत प्रत्यक्ष योजनाही केली. परंतु ती साकार झालीच नाही. हे राष्ट्रीय महत्वाचे कार्य न होताच माननीय यशवंतरावजी चव्हाण स्वर्गवासी झाले. हे जर कार्य पूणे झाले असते तर त्याची जगातील एकूण एक प्रमुख भाषात भाषांतरे होऊन एक फार मोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काम झाले असते. शिवचरित्राचे मोल मानवी जीवनात किती मोठे आहे व महत्वाचे आहे हे विवेचन करून सांगण्याची आवश्यकता नाही. शिवचरित्र साधार व चिकीत्सापूर्वक ज्ञात्यांकडून लिहून घेऊन प्रसिध्द करणे हा खरोखर एक राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प आहे. हा महान प्रकल्प महाराष्ट्र राज्याने अजूनही लवकरात लवकर हाती घ्यावा आणि खंडश: हा प्रचंड प्रकल्प पूर्ण करावा. अशी माझी महाराष्ट्र राज्यास आग्रहाची विनवणी आहे.

जेम्स लेन या अमेरिकन लेखकाचे छत्रपती महारांजाविषयीचे ( मुळातच चुकीच्या शीर्षकाचे ) एक पुस्तक हे ऑक्सफर्ड
युनिर्व्हसिटी प्रेस इंडिया यांनी सप्टेंबर -ऑक्टोबर २००३ या कालखंडात नवी दिल्ली येथे असलेल्या आपल्या कार्यालयाच्या पत्यावर प्रसिध्द केले. युनिर्व्हसिटीप्रेसचे मॅनेजिंग डायरेक्टर या नात्यांनी श्री. मनझर खान यांनी प्रसिध्द केले.

महाराष्ट्रातील ज्या काही इतिहास संशोधकांना ते समजले व उपलब्ध झाले त्यांनी ते वाचून तातडीने लेन यांच्या अत्यंत आक्षेपार्ह व निराधार अशा लेखनाचा निषेध केला. कोल्हापूरचे इतिहास पंडित प्रा.डॉ. जयसिंगराव पवार, प्रा.डॉ.वसंतराव के मोरे, लाकेसभेतील पुण्याचे मा.प्रतिनीधी श्री.प्रदीपराव रावत, श्री. गजाननराव मेहंदळे, श्री.निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिवराव शिवदे आणि मी स्वत: ( ब.मो. पुरंदरे) यांनी या पुस्तकाच्या लेखकाचा निषेध करणारे आणि या पुस्तकाचे वितरण तातडीने थांबविण्याची मागणी करणारे एक पत्र सामुहिकपणे दिनांक १० नोव्हेंबर २००३ रोजीच ऑक्सफर्ड प्रेसचे पुमुख श्री. मनझर खान यांचेकडे पाठविले. ङी. मनझर खान यांचे आंम्हास दिनांक २१ नोव्हेंबर २००३ रोजीचे प्रत्येकाचे नावाचे पण एकाच मजकूराचे उत्तर लगेच मिळाले. त्यात त्यांनी आपल्या पत्रात जेम्स लेन यांच्या आक्षेपार्ह, निराधार आणि भावना दुखावणार्‍या मजकुराबद्दल मनापासून खेद व्यक्त करुन सदरहू पुस्तकाचे अगदी त्वरीत प्रसारण थांबवीत असल्याचे आंम्हास लिहीले आहे.

आंम्ही युनिर्व्हसिटी प्रेस व श्री. मनझर खान यांना लिहीलेल्या
( 10-11-2003 ) आणि त्यांच्या आम्हांस आलेल्या अधिकृत पत्राच्या
( 21-11-2003 ) झेरॉक्स प्रती सोबत जोडीत आहोत.

या अशा तर्‍हेच्या भयानक निराधार म्हणूनच साफ चुकीच्या मजकुरांना वा ग्रंथाना त्वरीत उत्तर देणे अपरिहार्य असले तरी अखेर कायम स्वरूपात इतिहासाचे सत्य स्वरुप जगाला कळावे म्हणून कै. मा.यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेप्रमाणे शिवचरित्राचे, महाप्रकल्प मानून, सविस्तर शास्त्रशुध्द लेखन होणे अत्यंत आवश्यक आहे.

या युरोपियन / पाश्‍चात्य लोकांच्या नितिमत्तेच्या कल्पना अत्यंत ढिसाळ असतात. आई - वडिल, बहिण भाऊ, पती - पत्नी या नात्यांपेक्षाही सगळीच नाती ते नर - मादीच्या स्वरुपात पाहतात. त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. लेडी डायना एवढे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे मग अशी अनंत उदाहरणे ! त्यातूनच भारतामध्ये ही विचारसरणी हळूहळू डोकावत आहे.

याच मापात हे पाश्‍चात्य लेखक भारतातील पौराणीक महान स्त्री - पुरुषांना
आणि ऐतिहासिक कालीन छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या लक्ष्मीबाई, नाना फडणवीस, वीर सावरकर आणि अशा अनेकां विषयी भारतीय मनाला कधीही न पटणारे असे निराधार विचार केवळ कल्पनेतून काढतात आणि लिहीत सुटतात. ते शास्त्रीय इतिहास साधनांचाही विचार करीत नाहीत आणि येथील जनमनांचा विचार मुळीच करीत नाही. पाश्‍चात्य आणि भारतीय संस्कृतीतील नितिमत्तेच्या कल्पनांत जमीन - आस्मानांचे अंतर आहे. पाश्‍चात्य लेखकांनी अशा तर्‍हेच्या केलेल्या असंख्य लेखांच्या संकलनाचा एखादा मोठा खंडप्राय ग्रंथ होऊ शकले.

आता आन भारतीयांनीच या अशा प्रकारच्या पाश्‍चात्य आक्षेपावंर कसा दृष्टीक्षेप टाकावयाचा आणि कृती करावयाची याचा विवेकाने अचूक विचार करावयास हवा.

एकतर निश्‍चित की पाश्‍चात्यांनी भारतीयांचे एक नाजूक वर्म अचूक हेरले होते आणि आहे, अन् ते म्हणजे नैतिक अब्रु आणि चारित्र्य या वर्मावरच घाव घातला की भारतीय मन स्वत:च संभ्रमीत होते. आणि ते स्वत:च्याच अस्मितांवर संशय घेऊन स्वत:च घाव घालावयास उठते. मग कुणी कादंबरी लिहीतो, नाटक लिहीतो वा ग्रंथ लिहीतो. आपल्याच सतिहासाचे निराधार विडंबन करण्यासही तो मागे पुढे पाहत नाही. अन् इथेच अशा विकृत पाश्‍चात्य लेखनाचा विजय होतो. अस्वस्थ होऊन शास्त्रीय अभ्यास करणारा वा रागावणारा आमच्यात कुणी तुरळकच असतो.

आजही जेम्स लेन या लेखकाने असाच निराधार आघात आमच्यावर केला आहे. त्याने हा घाव कमरे खाली घातला आहे. या आघाताला आम्ही आपसातच एकमेकावर घाव घालून लेनला विजयी करायचे का ? आपणच विचार केला पाहिजे. लेनच्या निराधार लेखनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. माझे मत तर असे आहे की, आमच्या केंद्रिय राष्ट्रीय सत्तेने
राष्ट्रीय पातळीवर याचा जाब विचारावा. जेम्स लेन चे पुस्तकातील संबंधित लेखन व त्यानंतर त्यांनी केलेला खुलासा शास्त्रीय इतिहासकारास अजिबात शोभणारा व पटणारा नाही. रस्त्यावरील कोणा अपरिचीत माणसाने गर्दीत गप्पा मारताना हा ‘ज्योक’ केला म्हणे ! लेनने तो ऐकला म्हणे ! अन् तो आपल्या इतिहास ग्रंथात ( ? ) दाखल केला. हा शास्त्रीय इतिहास ग्रंथ ठरतो काय ? हे जबाबदारीचे लेखन काय? पण असले लेखन गेली काही शतके करून, पाश्‍चात्यांनी आमच्यात फूट पाडून आमच्यावरच विजय मिळविले आहेत. असली मिसाईलस् त्यांच्या पाशी तयार आहेत व तयार होत असतात . गर्दीतही असे पोरकट व बेजबाबदार ज्योक करणारे कुणी असतील तर ते ही राष्ट्रीय व सामाजिक गुन्हेगारच आहेत.

लेनच्या पातकी विधानांचा पहिला निषेध दिनांक १० नोव्हेंबर २००३ रोजी आंम्ही केला. पण या किळसवाण्या लिखाणाचा उल्लेख वा प्रचार जनतेत सतत करणे मला योग्य वाटत नाही. हा एक प्रकारे कुसंस्कार ठरेल

वृत्तपत्रांतून लेनचे हे प्रलाप जनतेस समजले तेंव्हा जनता दु:खी झाली आणि संतप्तही झाली. प्रचंड प्रमाणात जनतेने वृत्तपत्रांनी याचा कडक निषेध केला. काही तरूण अतिशय संतापले आणि त्यांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. अतिप्राचीन व दुर्मिळ अशा संस्कृत ग्रंथ संपदेचे खूप नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्‍लोक जिजाबाई साहेब यांना आपल्या हद्यात देवतातुल्य पुजिणार्‍या युवकांना भयंकर संताप आला आणि लेन ज्या संस्थेत येत होते, त्याच संस्थेवर या युवकांचा राग उफाळला ही एक प्रकारे अस्वस्थ मानवी तरुण मनाची स्वाभाविक प्रतिक्रीया नव्हती काय ? पण या युवकांचा राग दुर्मिळ आणि राष्ट्रीय मोलाच्या ज्ञानधनावरच कोसळला. त्यांच्या मनातील संतापाचे तेल वडयावरुन वांग्यावर पडले. आता हे झालेले नुकसान म्हणजे आपलेच नुकसान. महाराष्ट्रातील आणि जगातीलही अगणित ज्ञान प्रेमी लोकांनी व वृत्तपत्रांनी आपले व्याकूळ दु:ख व्यक्त केले. मीही या ज्ञानहानीने व्यथित झालो. की मुले एवढी का संतापली हेही मला जाणवले.

या दु:खातही माझ्या मनात एक विचार फुंकर घालून गेला. आमच्या तरूणांच्या अंत:करणात छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुण्यशाली
‘कादंबिनीव जगजीवनदानहेतू: ’ असलेल्या महान योगीनी बद्दल, म्हणजे मराठी अंत:करणात तेवत असलेल्या अस्मितेबद्दल असलेलीही नितांत प्रेमादरपूर्ण श्रध्दा, भक्ती आणि जागतेपण पाहून माझे मन सुखावले. कारण त्या तरूणांचे मन मला समजले. त्यांच्या अंत:करणात असलेल्या या अस्मिताभक्तिशी मी एकणे एक टक्के सहमत झालो होतोही . मुले चुकतात.
त्यांच्यावर थोडे रागवावेही. पण हीच मुले त्यांच्या भावना लक्षात घेतलं तर, पुढे मौल्यवान अशी देव, देश आणि धर्म यांची नितांत भक्ती करण्यासाठी पुढे येतील. आजही महाराष्ट्रात अशी अनेक लहान मोठी जनसेवेची व
राष्ट्रसेवेची उपयुक्त कार्ये अशीच तरुण मुले करताना मी आणि आपण सर्वचजण महाराष्ट्रात पाहात आहोतच ना ! माझ्यापाशी एक साक्षात उदाहरण मी नित्य अनुभवतो आहे. महाराजा शिव छत्रपती प्रतिष्ठान
ट्रस्टच्या अनेक लोकोपयोगी व लोक जागृतीच्या कार्यात शेकडो तरुण तरणी, ग्रामीण आणि नागरी भागात काम करीत आहेत. शैक्षणिक, आरोग्य विषयक, अपंगांना मदत करणारे आणि शिव अस्मितांचे दर्शन व प्रदर्शन घडविणारे कार्य ही तरुण मुले करीत आहेत. त्यात सामाजिक व आर्थिक सर्व तर्‍हेच्या स्तरांवरील जीवन जगणारी ही मुले आहेत. ती स्वत:ची ही जास्तीत जास्त प्रगती करुन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. जाणता राजा या सामूहिक शिवनाटय प्रयोगांच्या द्बारे याच मुलांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक लोकहितकारी संस्थांना कमीतकमी तीस कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ऐतिहासिक स्थळी जाऊन शक्यतो तेथे चांगली आस्था व व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य ही मुले करीत असतात. एवढे सांगितले तरी युवाशक्तीची आणि युवा अंत:करणाची मनोप्रेरणा आपणास जाणवेल.

व्हायला नको होते. पण झाले. आता उपाय नाही. पण आमच्या तरुणांना शिवाजी महाराजांचा आणि पुण्यश्‍लोक जिजाऊसाहेबांचा अपमान झालेला पाहून एवढी चीड, एवढा संताप येतोय हेही सुचिन्हच आहे. यातच आपला भविष्यकाल तेजोमय आणि उज्वल आहे याची चाहूल येते.

सदभावनेच्या भरात या तरुणांच्या हातून झालेल्या चुकांकडे आपण सर्वांनीच जरा पालकाच्या मायाममतेने पाहिले पाहिजे. या मुलांचे भावी जीवनात नुकसान होऊ नये. अशीच आपली इच्छा व प्रतिक्रीया ममतेने असायला हवी. छत्रपति शिवाजी महाराजांचे सुपुत्र व हिंदवी स्वराज्याचे तरुण युवराज संभाजीराजे यांच्याही हातून इ.स.१६७९ मध्ये काही चुका झाल्या
छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या चुकांवर त्यांना चार विवेकाच्या गोष्टी सांगून जवळ केलेच ना? याचा परिणाम म्हणजेच, पुढच्या इतिहासात याच युवराज संभाजीराजांच्या हातून घडलेला दिव्य इतिहास आपण पाहिलाच ना? असामान्य शौर्य, नेत्रदिपक धाडस, प्रतिभाशाली संस्कृत वाङमयाची निर्मिती, स्वराज्य रक्षणार्थ केलेली ‘थोरली मसलत’ आणि अखेर सद्धर्म, हिंदवी स्वराज्य, सार्वभौम छत्रपतीपदाची तेजस्वी अस्मिता आणि शेवटपर्यंत औरंगजेबापुढे अजिंक्य राहून अखेर धिरोदात्तपणे भयानक मृत्यूला सामोरा जाणारा या युवक छत्रपती त्यातूनच आपल्याला लाभला ना ? आमचा तो आदर्श ठरला ना ? आपल्यालाही असे कर्तबगार तरुण उद्या लाभतील अशी मला खात्री वाटते. विचारवंतांनी आणि महाराष्ट्र राज्याच्या सुशिल शासनाने याचा पालकाच्या मायेने, आत्मियतेने व क्षमाशील अंत:करणाने माझ्या या विचारांचा विचार करावा हीच अपेक्षा. माझे विचार मनापासून आणि श्रीसाक्ष प्रामाणिकपणाने मी आपणापुढे मांडले आहेत.

श्री.जेम्स लेन यांची माझी गाठ भेट, परिचय कधीच झाला नाही. झाला असता तर बरे झाले असते. वाईट झालेते टळले असते. तर ते मला भेटले असते, आणि जर त्यांनी माझी अभ्यासासाठी मदत वा मार्गदर्शन मागितले असते , तर त्याचा वेगळाच व चांगलाच परिणाम झाला असता. शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या चारित्र्यांपुढे हे लेन नक्कीच लीन झाले असते. त्यांनी आपल्या ग्रंथाला, ‘शिवाजी : हिंदू किंग इन् मुस्लीम इंडिया’ हे चुकीचे नाव दिले आहे. त्याऐवजी त्यांनी कदाचित
‘महाराजा शिवछत्रपति : द सुप्रीम हिंदू नरसिंह राजा इन द वर्ल्ड ’ असेही नाव दिले असते ! पण अखेर लेनसाहेब नेहमीच्याच पाश्‍चात्य ‘बायस’ वळणावर गेले

बहुत काय लिहणे आमचे अगत्य असो द्यावे ही विज्ञापना.

-बाबासाहेब पुरंदरे


मराठ्यांच्या बदनामीचे अजून एक कारस्थान उघड!

मराठा सेवा संघ करतोय मराठयांचा हेवा! समर्थ रामदास स्वामींच्या, शिवप्रभूंच्या, मराठ्यांच्या बदनामीची, तेजोभंगाची एकही संधी गमावत नाही मराठा हेवा संघ! मराठ्यांनो सावधान! आजच्या लोकमत मध्ये आलेली खालील बातमी वाचा...

१२ जानेवारीला हा ब्रिगेडी कार्यक्रम झाल्या झाल्या दासबोध.कॉम ने या राष्ट्रद्रोही लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल "मुख्यमंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा कठोर सवाल केला होता!
आज पुन्हा एकदा त्यांच्या तिथे जाण्यातले वैफ़ल्य सिद्ध झाले!
जो खेडेकर या राज्याच्या मुख्यंत्र्यांना सुद्धा हातोहात फ़सवीत आहे तो गरीब मराठा-कुणबी तरुणांचे काय ____ भले करणार आहे?
मराठा तरुणांनो सावधान! अखंड सावधान!
नंतर म्हणू नका की ब्रिगेडचे पाकिस्तान कनेक्शन बाबत आम्हाला कुणीच सांगितले नाही म्हणून!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठकबाजाचा गौरव!
मराठा सेवा संघाची दिशाभूल
लोकमत वृत्तसेवा

प्रद्युम्नचे नाव पुरुषोत्तम खेडेकर यांच्यामार्फत आले होते. सिंगापूर येथे खेळणार्‍या बंगलोर येथील एका क्रिकेटपटूने प्रद्युम्नच्या नावाची खेडेकर यांच्याकडे शिफारस केली होती. त्यामुळे त्याचा सत्कार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाल्याचे त्याने पुण्यातील भेटीत मला सांगितले होते.
- मधुकर मेहकरे,
राज्य महासचिव, मराठा सेवा संघ, नागपूर. प्रद्युम्नचे कारनामे माहीत आहेत, त्याच्याबाबत वृत्तपत्रातूनही वाचले होते, त्याचे हे गैरप्रकार यवतमाळच्या पदाधिकार्‍यांना अलिकडेच कळले. त्याने या सत्कारासाठी पुण्यावरून वरच्या कमिटीत लिंक लावली असावी.
- विवेक ठाकरे,
तालुकाध्यक्ष, मराठा सेवा संघ, आर्णी जि. यवतमाळ

यवतमाळ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड झाल्याचे सांगून खासदार-आमदारांना गंडा घालणार्‍या एका ठकबाजाला चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या ठकबाजाने मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनाही आपल्या जाळ्यात अडकविले. प्रद्युम्न ठाकरे असे या युवकाचे नाव असून तो यवतमाळच्या आर्णी येथील रहिवासी आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी २0१५ रोजी मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रद्युम्नचा सत्कार करण्यात आला. वास्तविक 'लोकमत'ने २६ जून २0१२ रोजी वृत्त प्रकाशित करून प्रद्युम्नच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला होता. त्यावेळीही त्याने आपली आई उत्तर प्रदेशात इलेक्शन कमिश्नर आणि वडील नोएडा दिल्लीत कलेक्टर असल्याचे तसेच आपण १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असल्याचे सांगून त्याने यवतमाळचे तत्कालीन आमदार नीलेश पारवेकर यांना मोहिनी घातली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खोटे सर्टिफिकेट दाखवून तो राजकीय नेत्यांची आर्थिक फसवणूक करतो. त्याने स्वत:चे खोटे प्रोफाईल बनविले असून त्याद्वारे तो मुलींचीही फसवणूक करतो. सध्या तो आर्णी येथे आहे. वर्ल्ड कप खेळायला जातो असे सांगून तो पुण्यातून गायब झाला आहे.
बारावी नापास असलेल्या प्रद्युम्नचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्याद्वारेच तो दिग्गज राजकीय नेत्यांना भुरळ घालून त्यांची फसवणूक करतो. मात्र बदनामी होण्याच्या भीतीने आजतागायत कुण्याच नेत्याने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. प्रद्युम्नकडे आर्णी तालुक्यातील चिखली येथे तीन एकर शेती आहे. त्याची आई गृहिणी तर वडील शेतकरी आहे.
प्रद्युम्नचे शिक्षण आर्णी व यवतमाळात झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या खोटेपणाचा भांडाफोड झाल्यानंतर तो अनेक महिने शांत होता. मात्र कुणीच कारवाई न केल्याने त्याची हिंमत वाढली. आता तो पुन्हा सक्रिय झाला आहे. त्याने मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांना जाळ्यात ओढून थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मातृतीर्थावरील कार्यक्रमात आपला सत्कार घडवून आणला. त्याच्या या कारनाम्यांपासून मुख्यमंत्रीच नव्हे तर मराठा सेवा संघाचे पदाधिकारीही अनभिज्ञ होते, हे विशेष! प्रद्युम्नच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करणारे 'लोकमत'ने २६ जून २0१२ रोजी प्रकाशित केलेले वृत्त पहाणे...

|| www.dasbodh.com ||


सतिप्रथा

रामायण महाभारत काळापासुन ते थेट मध्ययुगापर्यंत सती प्रथा नव्हती. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा, मंदोदरी, अंबीका, अंबालीका, कुंती, उत्तरा पासुन ते राणी दुर्गावती पर्यंत खुप मोठी विधवांची लिस्ट आहे, शिवपत्नी सती कडून आपल्या पतिचा अपमान सहन न झाल्यामुळे आपले वडील दक्ष यांचा यज्ञ नष्ट करण्याच्या उद्देशातून आत्मदहन केले. आपल्या पती साठी प्रती सती चे समर्पण हे समर्पणाची पराकाष्ठा मानली गेली. परंतु ही हा ना एखादी परंपरा होती ना कोणता धार्मीक संस्कार.
जेव्हा हिंदुत्थान वर मुसलमान आक्रमकांनी आतंक पसरवायला सुरवात केली आणि पुरुषांच्या हत्या केल्यानंतर महीलांचे अपहरण करुन त्यांच्यासोबत दुर्व्यवहार, बलात्कार करायला सुरवात केली तेव्हा बहुसंख्य महिलांनी त्यांच्या हाती लागण्याहून आपला जीव देणे बेहत्तर समजले. आणि जेव्हा अल्लाउद्दीन खलजीने पद्मावतीला मिळवण्यासाठी चित्तोड मध्ये नरसंहार केला त्यावेळी आपले शिल वाचवण्यासाठी पद्मावती सोबत सर्व राजपूर विधवांनी सामूहिक जौहार केला तेव्हा सती प्रती सन्मान वाढला गेला आणि त्यानंतर सतीप्रथा परंपरा मध्ये बदलली गेली.
ज्या बौद्धांनी आक्रमकांशी दोन हात करण्या ऐवजी धर्म बदलणे पसंत केले (अफघाणीस्थान, पाकीस्तान, बंगाल, इंडोनेशिया, मलेशिया, तिब्बल इत्यादी क्षेत्र आधी बौद्ध बहुल होते ) अशांना कधी समजु शकत नाही (आणि आजही समजत नाही) की धर्मासाठी शत्रुसोबत दोन हात करुन पतीला विरमरण आल्यावर शत्रुकडून बेईज्जत होण्यापेक्षा स्वत:चे आत्मदहन करणे. त्यानंतर या परंपरेचे स्वरुप प्रथे मध्ये झाले आणि परिवारातील लोकांकडून कर्त्या पुरुषाची कमाई आणि मालमत्ता हडपण्याच्या उद्देशातुन विधवेला बळजबरी ने आगीत ढकलून देणे वगैरे कुप्रथा सुरु झाली.
या प्रथेला धर्म नाही, तर तत्कालीन समाजाची सामाजीक परिस्थिती आणि लालची लोकांची नियत जबाबदार आहे. नंतर राजा राम मोहन राय जी नी प्रयत्नाने या प्रत्येला पुर्णविराम लावला. सांगण्याचा उद्देश हाच की हिंदु धर्मातील कूप्रथांना कोणताही शास्त्रिय आधार नव्हता आणि नाही, त्या उदयास येण्यामागची कारणे ही तत्कालीन परिस्थिती होती आणि ती प्रथा किंवा परंपरा समाजमान्य होण्याची कारणे वेगळी होती. ही कारणे सामाजीक होती धार्मीक नव्हे, ( ज्यांना धार्मिक आणि सामाजीक या दोन गोष्टी मधला फरक कळत नाही अशांनी नसत्या विषयात ढवळाढवळ करु नये, हा आपला प्रांत नव्हे. ) आणि त्या प्रथा आणि परंपरा वेळोवेळी दुर केल्या गेल्या आहेत.

एक दुर्मिळ माहिती...संग्रही असूद्यात!!!

आपल्या पैकी बहुतांशजण धार्मिक आहोत. सात्विक आहोत, समर्थ भक्त आहोत. तसे आपण असलो म्हणजे आपली मुलेही तशीच किंबहुना अधि
क चांगली निपजतील अशी आपली एक प्रामाणिक भावना असते! नाही का?
पण जरा थांबा! असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय!
कशावरून???

सध्या महाराष्ट्रात जितेन्द्र आव्हाड नामक एका आमदाराने जो धुमाकुळ चालवलाय तो पाहता कसे वाटते हो आपल्याला? वयाची बुज नाही, ज्ञानाची कदर नाही, कार्याचे मोल नाही की समाजमताचे भान नाही! तेच वाटून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री. नितिनराव चौगुले यांनी भर टीव्हीवर त्यांचा बापही काढला! पण हा पठ्ठा ढिम्म!! याच प्रकरणाच्या जरा खोलात आपण जाऊ...
आमच्या विश्वसनीय सुत्रांकडून आम्हाला जे कळाले ते धक्कादायक होते! (आव्हाडांनाही भिडे गुरुजींबद्दल कळवणारी काही सुत्रे आहेत हे स्वत: तेच TVवर सांगतात! तसेच हे!)
ते असे,की जितेन्द्रचे वडील आदरणीय सतीशराव भास्करराव आव्हाड हे अत्यंत सत्शील, सद्भक्त व सदाचरणी व्यक्ती असून अत्यंत उच्च कोटीचे अध्यात्मिक महापुरुष श्री निसर्गदत्त महाराज यांचे निस्सीम सेवक आहेत! शिष्य आहेत!
केवळ शिष्य नाहीत तर महाराजांचे सर्व वाङ्मय सर्वप्रथम छापून प्रकाशित करून वितरीत करून जगभर त्यांचे विशुद्ध अध्यात्मिक विचारांचा जागर करण्याचे महापुण्याचे काम ते अविरत करीत आहेत! काडसिद्धेश्वर महाराजांच्या गुरु परंपरेतील या संप्रदायात दासबोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे! इतके की रोज दासबोध वाचल्याखेरीज या संप्रदायाचे लोक अन्न ग्रहण करीत नाहीत! कुण्णुर चे गणपतराव महाराज हे ही याच परंपरेतील संत ज्यांनी अनुवादीत केलेला कन्नड दासबोध आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे! याच संप्रदायाचे निंबाळ येथील गुरुदेव रानडे दासबोधावर उत्तम बोलत व त्यांचे जयपुरस्थित शिष्य डॉ. दाते अनुवादित हिंदी दासबोधही आपल्या संकेतस्थळावर आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचाही दासबोधाच्या प्रचारावर अत्यंत भर असे. तात्पर्य, हा संप्रदाय समर्थभक्त व दासबोध अनुसरणारा, जगणारा आहे. आदरणीय सतीशराव आव्हाड यांना त्यांच्या पवित्र, महान व उदात्त कार्याबद्दल या संप्रदायामध्ये व अन्यही समर्थभक्तांमध्ये अत्यंत आदराचे, मानाचे स्थान आहे व ते योग्यच आहे.
अशा रितीने दासबोधावर अधिकार वाणीने भाष्य करू शकणारे वडील असताना, त्यांचेच सुपुत्र जितेन्द्र असे कसे? (मतांसाठी अव्हाडांइतक्या समर्थांना शिव्या आजवर कुणी घातल्या नसतील) असो.
जितेन्द्र म्हणाजे इन्द्रियांवर विजय मिळवलेला, परंतु यांच्या कुठल्याच कृतीत तो इंद्रियजय दिसत नाही, मग ते वचा वचा बोलणे असो, कचा कचा चिक्की तोडणे असो की २००० पुरुष (?) समर्थक समोर असताना, पोलीस कडे असताना भिडे गुरुजींच्या केवळ दोन वाघांना घाबरून स्त्रियांच्या मागे जाऊन लपणे असो! (स्त्रिया समोर असताना भिडे गुरुजींचा़ मर्यादशील धारकरी हात उचलूच शकत नाही हे जाणून)
एका सद्भक्त बापाच्या पोटी असे पोर का जन्माला यावे? इथेच बालसंगोपनाचा मुद्दा पुढे येतो! आपला मुलगा कुठे जातो? काय करतो? कुणाला भेटतो? कुणाच्या हाताखालचे बाहुले बनतो याकडे इथून पुढे सर्व सज्जन बापांचे लक्ष हवे!
सेंट जॉन बाप्तिस्ट हायस्कूल मध्ये जितेन्द्र ला घालताना त्याच्या वडिलांना चुकूनही वाटले नसेल की पुढे हा मुलगा इतका "प्रसिद्ध" होईल!
अस्सो, जे झाले ते तर झाले, निदान आता तरी आपण या प्रकरणावरून धडा घेऊन आपल्या मुलांचे संगोपनाकडे नीट लक्ष देऊयात!
कारण समर्थ जर म्हणतात
सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख॥

तर मग "घालवे वडिलांची कीर्ती" अशा पुत्राला ते काय बरे म्हणतील?

॥ http://दासबोध.भारत/ ॥

बाबासाहेब खरा इतिहासच सांगतात!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारावरून राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील हितसंबंधींची ओरड सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या थेट वंशजांनीही या विरोधाच्या सुरात सूर मिसळवला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका गौरव विशेषांकात खुद्द छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांनीच बाबासाहेबांच्या शिवकार्याचा गौरव करणारा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी बाबासाहेब शिवचरित्राचे कथन करताना ऐतिहासिक सत्याचा तराजू किंचितही डाव्या-उजव्या बाजूस ढळू देत नाहीत, अशी ग्वाहीदेखील दिली होती. छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या त्या लेखातील काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या बाबासाहेबांच्या गौरवाच्या निमित्ताने…
– आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याच्या उदयकाली सर्वांत मोठे लेणे लाभले ते प्रतिभावंतांचे. महाराष्ट्राने सार्थ अभिमान धरावा असा प्रतिभेचा पराक्रम कलेच्या आणि विद्येच्या क्षेत्रात अनेक सरस्वतीपुत्रांनी गाजविला. लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, रणजित देसाई, जयंतराव नारळीकर आणि बाबासाहेब पुरंदरे हे अशा सरस्वतीपुत्रांपैकी आघाडीचे सारस्वत आहेत. आपापल्या क्षेत्रांत या प्रतिभावंतांनी दिग्विजय गाजविले आहेत. त्यांचे यश वादातीत आहे. शिवशाहीरांचे अभिनंदन करताना आणि त्यांना आशीर्वाद देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
– बाबासाहेबांच्या वक्तृत्वाला विलक्षण धार आहे आणि गोडवा आहे. तासन्तास त्यांच्या मुखातून शब्दांचा प्रचंड ओघ अत्यंत वेगाने खळाळत असतो. हे सारे शब्द अचूक अर्थाचा आणि रसांचा साजशृंगार लेवून खाशा हुजरातीच्या घोडदळासारखे दौडत येत असतात. स्वरांचे चढउतार अचूक साधले जातात. शब्दांनी चित्र साकार होत जाते. नाट्य अचूक पकडले जाते. रसांनी ते रंगत जाते. श्रोते काळवेळाचे भान विसरतात. अंगावर रोमांच आणि हृदयात आनंद फुलत जातो. बाबासाहेबांचे भाषण संपते. श्रोते भानावर येतात आणि त्यांच्या मग लक्षात येते की, अडीच तास होऊ गेले आहेत! हजारो श्रोत्यांचा सागर ओहोटीच्या लाटेसारखा एका वेगळ्याच धुंद मन:स्थितीत घराकडे परततो. पंडित भीमसेन जोशी एकदा म्हणाले होते, ‘बाबासाहेब पुरंदरे तीन सप्तकांत आपलं व्याख्यान ‘गातात’! त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येत असतो.’
– बाबासाहेबांच्या वक्तृत्वाचा एक स्वतंत्र आगळाच ढंग आहे. ऐतिहासिक सत्याचा तराजू किंचितही डाव्या-उजव्या बाजूस ढळू न देता ते इतिहास कथन करतात. बखरी आणि अस्सल कागदपत्रे बाबासाहेबांनी आत्मसात केलेली असल्यामुळे त्यांच्या भाषेला आगळाच गोडवा आलेला आहे. ऐतिहासिक खानदानी घराण्यात आणि मावळच्या दर्‍याखोर्‍यात सतत वावरत असल्यामुळे ते स्वत:च अस्सल ‘ऐतिहासिक’ बनले आहेत! ते बोलू लागले की, त्यांच्या वक्तृत्वात कुठेतरी अचूक जागी शाहीर झळाळून जातो. कुठेतरी गोंधळी गिरकी घेऊन जातो, कुठे बहुरूपी आपल्याला हसवून जातो, कुठे कीर्तनकार आपला ढंग दाखवून जातो, कुठे तमाशातील एखादी लावणी झटकन डोळ्यापुढून जाते, कुठे एखादी ‘साठा उत्तराची कहाणी’ श्रोत्यांना सुखावून जाईल. कुठे लळित दिसून जाईल तर कुठे भारूड भासून जाईल आणि हे सर्व चालू असताना त्यांचे विषयांचे सूत्र आणि ऐतिहासिक सत्याची बैठक सुटत नाही, हे त्यांच्या वक्तृत्वातील वैशिष्ट्य.
– बाबासाहेब नेहमी म्हणतात की, ‘मी विद्वान नाही. मी इतिहासकार नाही. मी नट आहे. मी गोंधळी, शाहीर, चित्रकथी, कीर्तनकार, बहुरूपी आणि खेळिया आहे. मी शिवकालीन इतिहासाचा बखरकार आहे. माझ्या शक्तिबुद्धीप्रमाणे जास्तीत जास्त सखोल अभ्यास करून सोप्या भाषेत तो इतिहास लोकांना सांगणारा मी एक लोककलाकार आहे. याहून मी कोणी वेगळा नाही. अन् वेगळा कुणी असलोच तर मी इतिहासाचा प्राथमिक शिक्षक आहे.’ खरोखर प्रत्येक शाळेत बाबासाहेबांसारखा एखादा जरी इतिहास शिक्षक लाभेल, तरी महाराष्ट्राचा भावी इतिहासच बदलून जाईल! इतिहास निर्माण करण्याचे सामर्थ इतिहास शिकवणार्‍यांतच असते.
– बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात. त्यांचा त्यात अभिमान दिसून येतो. पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजी महाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करीत नाहीत. अफझलखान किंवा औरंगजेब यांची खोटी निंदाही करीत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचे खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्त कंठाने सांगितले जातात तर दुर्गुणांबद्दल स्वकीयांची धगधगत्या शब्दात होरपळ उडवलेली दिसते. अफझलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील मुहंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही. अनेक इतिहासकारांची चुकीची विधाने ते साधार खोडून काढतात. पण त्यात कोणाचाही अपमान, अनादर किंवा कुचेष्टा ते करीत नाहीत. अंगुळभरही ते खालच्या पातळीवर उतरत नाहीत. बाबासाहेबांचा साराच डौल आणि आब अस्सल खानदानी आढळतो. खासगी बोलण्या-वागण्यातही त्यांच्या रोमरोमी भिनलेली खानदानी इभ्रत क्षणोक्षणी जाणवते. अहंकाराचा लहानसा तवंगही त्यांच्या बोलण्या-चालण्यात उमटत नाही.
– सर्वांवरती प्रेम करणारे आणि सर्वांशी खिलाडू वृत्तीने वागणारे बाबासाहेब खरोखरच खेळगडी आहेत. त्यांना कसल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. पडेल ते काम निरपेक्षपणे आणि जीव ओतून करावयास ते तयार असतात. अशा मोलाच्या या कार्यकर्त्याला आपणच जपले पाहिजे.
(साभार : तरुण भारत)

गुरुवार, २३ जुलै, २०१५

शिवाजी कोण होता?

गेले काही दिवस महाराष्ट्र भूषण ह्या सरकारी पुरस्कारावरून वाद सुरु आहे. ह्या वादामागील कारण म्हणजे हा पुरस्कार ह्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना देण्यात येणार आहे म्हणून संभाजी ब्रिगेड व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे मुंब्रा मधील आमदार जितेंद आव्हाड ह्यांनी विनाकारण वाद उकरून काढला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे जातीने ब्राम्हण आहेत, तसेच ब्रिगेड व जितेंद्र आव्हाड ह्यांच म्हणण आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी चुकीचा इतिहास लिहला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित पुरंदरे प्रकाशन “राजा शिवछत्रपती” ह्या पुस्तकात छत्रपति शिवाजी महाराज व आऊसाहेब जिजाबाई ह्यांची बदनामी केली आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे प्रमाणे कि ज्याने शिवाजी महाराज व आऊसाहेब जिजाबाई ह्यांची बदनामी केली त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार व गोविंद पानसरे ह्यांनी “शिवाजी कोण होता?” ह्या पुस्तकातून खरा शिवाजी समोर आणल तर त्याला गोळ्या घातल्या. 

त्याच बरोबर जितेंद्र आव्हाड ह्यांनी गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” ह्या पुस्तकाचे दाखले देतात. म्हणून आज मी हे पुस्तक विकत घेतल. ते पुस्तक फक्त ७२ पानी आहे, व किंमत पण फक्त ५० रुपये.
राजाशिवछत्रपति ह्या पुस्तकात छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या संपूर्ण जीवनावरआहे. तर शिवाजी कोण होता ह्या पुस्तकात शिवाजी महाराज व त्या वेळी परीस्थीतीवर भाष्य केले आहे. राजाशिव छत्रपति मध्ये जे लिहल आहे तेच पण जरा वेगळ्या भाषेत शिवाजी कोण होता ह्या पुस्तकात लिहलं आहे, त्यामुळे वेगळे असे काहीच वाटत नाही. 
जितेंद्र आव्हाड ह्यांनी राजाशिवछत्रपति ह्या पुस्तकावर काही अक्षेप घेतले आहेत. ते सगळे आक्षेप बिनबुडाचे आहे व पोकळ आहेत. त्यांचा एक आरोप आहे कि शिवकाळात कुणबीण ह्या २५ होन ला विकल्या जायच्या. ह्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. तो त्यांच्या पद्धतीने योग्य आहे. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” ह्या पुस्तकात पण ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे, तो असा आहे की (शिवाजी महाराज ह्यांच्या काळी आणि सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला-विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजेरजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी-सुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते, अब्रू लुटणाऱ्याना मान-मरातब अन पदव्या देत होते.) हा उतारा तुम्हास शिवाजी कोण होता ह्या पुस्तकातील पान क्रमांक १३ वरील शिवाजी व स्त्रियांची अब्रू ह्या लेखातील आहे. मग जितेंद्र आव्हाड तुम्ही ज्या पुस्तकाचा इतिहास सांगतात त्या गोविंद पानसरे ह्यांच्या शिवाजी कोण ह्या पुस्तकात लिहल आहे मग जे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी राजशिवछत्रपति ह्या पुस्तकात लिहले आहे ते योग्य लिहले आहे. जसे तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या कडे पुरावे मागितले तसे गोविंद पानसरे ह्यांच्या कडे मागितले का? 
तसेच दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज ह्यांचे गुरु नव्हते व त्याचं अस्तिव नाकारतात त्यांच्या साठी ह्याच शिवाजी कोण होता? ह्या पुस्तकात रयतेची कणव असलेला राजा ह्या लेखात दादोजी कोंडदेव ह्यांचा उल्लेख आला आहे. पान नंबर १० वर लिहल आहे. (शेतीच्या व शेतकऱ्याच्या अशा व्यवस्थेत शिवाजी व दादाजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले.) 
तसेच पान नंबर २२ वरील (मुसलमानाच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती.) असे हे लिहले आहे.
जितेंद्र आव्हाड हे किती दुतोंडी आहेत हे दिसून येत. त्यांनी ज्या पद्धतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजशिवछत्रपति पुस्तकावर अश्लील आक्षेप घेतले आहेत त्यांच्या अश्लील विचारातून आलेले अश्लील आक्षेप. असो जितेंद्र आव्हाड ह्यांनी वरील गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? ह्या पुस्तकातील वरील उतारांचा संदर्भ सहित स्पष्टीकरण करावे. त्या वाक्यांचा योग्य तो पुरावा द्यावा नाही तर महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची स्पष्ट पणे व जाहीर पणे माफी मागावी. 
(टीप:- ब्रिगेड ने उगाच विनाकारण वाद घालू नये उत्तर असतील तर बोला नाही तर तोंड काळ करा. सोबत त्याचे फोटो पण दिले आहेत. स्वत: खात्री करा. नाही तर ५० रुपये च पुस्तक खरेदी करा व वाचा.)