शनिवार, २८ जून, २०१४

समर्थांचे शिवरायांना पत्र


समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठविलेले हे पत्र अतिशय प्रसिद्ध आहे... यशवंतराव चव्हाण म्हणत की या पत्रासारखे शिवरायांचे समर्पक वर्णन करणे आजवर
कुणाला जमलेले नाही!!!

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
अशी या पत्राची सुरुवात होते...

या पत्रातून शिवराय व समर्थ यांच्या मधील संबंधांचे अनेक पैलू उघड होत जातात. या पत्रातील ओळ अन ओळ, शब्द अन शब्द महत्वाचा व लाख मोलाचा आहे...
श्री समर्थांनी यात शिवरायांना उद्देशून वापरलेला प्रत्येक शब्द अतिशय जपून, पारखून, परीक्षून, स्वत: अनुभव घेऊन मगच वापरलेला आहे!!!
या पत्रातूनच दोघांमधील संबंध अत्यंत जवळचे व तरीही अत्यंत आदराचे कसे होते तेही स्पष्ट होते!!!
याच पत्रात समर्थांनी शिवरायांना दिलेली "श्रीमंतयोगी",
"जाणता राजा","शिवकल्याणराजा" यासारखी विशेषणे आज अजरामर झालेली आहेत!!!

पत्राचे प्रामुख्याने ३ भाग पडतात, पहिला भाग बराच मोठा असून यात शिवरायांचे कौतुक, वर्णन, त्यांच्या कार्याचा गौरव आलेला आहे!!!
संपूर्ण भारतभर मठांचा पसारा व भ्रमण असणारे समर्थ पत्राच्या शेवटून तिस-या ओवीत म्हणतात की तुमच्याच राज्यात सध्या फ़िरत फ़िरत आलो होतो परंतु आपण जवळपासच आलेले आहात, हे तुम्ही सध्या कुठे आहात त्याची मी चौकशी न कळल्याने माहिती नाही झाले...

यावरून हे दिसते की समर्थ महाराष्ट्रात आल्या आल्या दर वेळेस आधी शिवरायांचे वर्तमान घेत असत! मग अन्य
कामे करीत असत! याच ऋणानुबंधाचा उल्लेखही ते पत्रात करतात व त्याचमुळे या खेपेस माहिती घेणे जमले
नाही अशी प्रांजळ कबुलीही ते या दुस-या भागात
देतात. यावरून दोघांचे संबंध किती प्रेमपूर्ण होते हे
कळते पहा! शिवराय पुढच्या भेटीत नक्की हा विषय काढतील की यंदा इथे येऊनही आमची भेट नाही घेतलीत, या प्रेमळ आग्रहापोटी समर्थ त्यांची समजूत काढताना दिसत आहेत!!!

इतके सर्व कौतुक करून झाल्यावर मात्र समर्थ मूळ विषयाला शेवटी तिस-या भागात हात घालतातच! ते म्हणतात तुम्ही तर जाणताच की उभ्या भारतात अनेक
धर्ममूर्ती म्हणता येतील अशा व्यक्ती असून तुम्ही धर्मसंस्थापक म्हणून अशा सर्व लोकांचे राजे म्हणून विराजमान आहात व धर्मसंस्थापक अशीच तुमची किर्ती आहे!
परंतु ही किर्ती आपण सांभाळलीच पाहिजे! तिला तडा देता कामा नये! अशा पद्धतीने अत्यंत कठोर शब्दात एका चक्रवर्ती सम्राट छत्रपतीला धर्मरक्षणासाठी जणु तंबी दिल्यावर समर्थ पुन्हा मवाळ होतात व जो मोठ्या लोकांमध्ये पाळला जणारा शिष्टाचार आहे त्याला अनुसरून इतके कठोर बोलण्याचे कारण काय तेही विषद करतात, ते कारण म्हणजे त्या काळात भारतभर पसरलेले विकृत राजकारण होय जे हिंदू धर्माच्या मुळावर उठलेले होते, ते पाहून समर्थांचे चित्त उद्विग्न झाले होते हे ही ते मान्य करतात व त्यापोटीच हा कठोर सल्ला, जाणीव आपणास करून दिली असे सांगत त्याबद्दल उदार अंत:करणाने त्यांची क्षमाही मागतात! कारण शिवराय
अगोदरच ते कार्य करीत आहेत अशा मनुष्यास पुन्हा जाणीव करून देणे तसे योग्य नाही हे समर्थ जाणताहेत परंतु विषयाचे गांभिर्यच तसे असल्याने ते करावे लागत आहे याचे शल्यही ते प्रांजळपणॆ कबूल करून टाकतात!!!

उदंड राजकारण तटले । तेणॆ चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥

असे हे पत्र सर्वांनी पाठ करावे, मुखोद्गत करावे असेच आहे!
या पत्राबद्दल काही मुघलजनसहकारी बीग्रेडी असा आक्षेप घेतात की या पत्रात रामदास शिवरायांची माफ़ी मागत आहेत...
त्यांना आता काय उत्तर द्यायचे हे तुम्हीच पत्र पूर्ण वाचून ठरवावे...

www.dasbodh.com

वि.दा. सावरकर... हिन्दुस्थानाच्या मातीमधे जन्मलेला लोहपुरुष..



ते म्हणाले, हिन्दुस्थानास मातृभू नि पितृभू मानणारे सर्वच जण हिन्दू आहेत(१),
नि आम्ही त्यांना इतर धर्मीयांचा तिरस्कार करणारा आंधळा धार्मिक समजलो.

ते म्हणाले, हिन्दूसस्थानात जातीच काय, पण धर्मांचेही संमिश्रण झाले आहे, त्यामुळे मीणसामाणसामधे भेद पाळणे चुकीचेच आहे(२).
राम मंदीर (पतितपावन मंदिर, रत्नागिरी)उभारुन तथाकथित अस्पृश्याला त्यांनी समाजविरोधात मंदीराचा भट बनवले. नि आम्ही त्यांना ब्राह्मणांचा नेता बनवले!

ते म्हणाले, भारतीय तरूणां-"तरुणीं"नो, NCC मधे जा, सैनिकी प्रशिक्षण घ्या, संशोधन क्षेत्रात आघाडी मारा (३),
आम्ही त्यांना, जुन्या विचारांचा नेता म्हणून अडगळीत टाकले!

ते म्हणाले, भारतीय भाषा परकीय हेतुपुरस्सर केल्या जाणार्या सांस्कृतिक आक्रमणापासून जपून ठेवा. मला मराठी येते, मराठीचे काम मी करतो. हिन्दीला पर्शियन नि अरबीपासून जपून ठेवा.(४)
आम्ही त्यांची कडवा मराठी नेता म्हणून वसलात लावली!

ते म्हणाले, गायीला उपयुक्त पशू माना. देश-धर्म संरक्षणासाठी वेळ पडली तर पळी-पंचपत्री वितळवून हत्यारे बनवा.(५)
आम्ही त्यांच्याच नावाने गोशाळांचा प्रचार करतो!

आक्रंदून ते म्हणाले, हे मातृभूमी...
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण..
आम्ही त्यांना स्वतंत्र भारतात, जमेल तितक्यावेळा "देशविघातक" कृत्यांच्या "संशयापायी" तुरूंगात ठेवले!

गोळीची पर्वा न करता त्यांनी जहाजातून उडी मारली नि आंतरराष्ट्रीत न्यायालयात भारताची स्थिती नेउन ठेवली,
नि आम्ही या कृत्याला "छलांगभर पोहणे" म्हणून हिणवले!

तात्याराव, कित्येक दशकांपुर्वी जगलात, आजही तुम्ही आमच्या पचनी पडत नाही! तात्याराव, नियतीला शह देत आयुष्य जगलात तुम्ही, पण नियतीने खुपच मोठी खेळी केली. आमच्या सारख्या भोंदू नि स्वार्थी नि मंद माणसांमधे तुम्हाला पाठवलं! आंधळ्यांनी हत्तीला चपापायचं तसं तुमचं आयुष्य आम्ही चपापतो नि मला सावरकर कळले म्हणून ओरडत सुटतो. अप्पलपोटी राजकारणापायी नि आंधळ्या धर्माभिमानापायी कधी विरोधक म्हणून तर कधी अनुयायी म्हणून आम्हीच तुम्हाला तोंडघशी पाडतो. तात्याराव सरस्वतीनं तुमचा आदर केला- प्रचंड विद्वत्ता दिली, ब्रह्मदेव नि सटवाई तुमच्या साहसाला नमून तुमची आयुष्यरेखा झक मारत वाढचत राहीले, गणेशानं हाती घेतलेल्या कामात यश दिलं... पण आम्ही मर्त्य भूमीवरील माकडाची उत्क्रांत रुपे, तुमच्या सारख्या रत्नाची किंमत आधी हुंगून, मग निरखून पाहून नि मग दगडावर आपटून पाहत करत बसलो!!

सावरकरांची बुद्धीनिष्ठा, विद्वत्ता, प्रगाढ अभ्यास, निस्वार्थीपणा, त्याग, शौर्य, धीर, द्रष्टेपणा हे सारं सारं समजते तर नवनिर्माण दूर नाही. आणि आमचे हे सर्व तुम्हाला हरवण्याचे चाळे पाहूनही जेव्हा तुम्ही म्हणता,

अनादी मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्माला ।।

तेव्हा वाटते तुम्ही समजो वा न समजो, पण इतके नक्की की भारतमातेला सार्थ अभिमान वाटावे असा तिचा एक सुपुत्र तुम्ही आहातच!!

संदर्भ:
१. हिन्दुत्व
२. हिन्दुत्व
३. मृत्युंजय दिनानिमीत्तचे पुण्यातील भाषण
४. भाषासुधारणेवरील निबंध
५. विज्ञानिष्ठनिबंध

-रोहित होळकर

मदारी मेहतर – सत्य की मिथ्या???

मदारी मेहतर असे नाव घेऊनही त्यास सत्य की मिथ्या? असे संबोधले आहे, वाचकांना थोड़े अजब वाटेल खरे पण याच अनामिक – मदारी मेहतर या व्यक्तिमत्वाचे इतिहासातील स्थान किती खरे आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
अश्या नावाच्या व्यक्तीचा शिवाजी महाराजांशी आग्रा भेटीच्या वेळी खरच काही संबध आला का? सद्य स्थितीत रायगडावर असणारे ठिकाण ज्याला मशीद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे सांगितले जाते त्यात किती सत्य आहे?
वाद विवादासाठी आपण खरे मानले तर मदारी मेहतर
ही व्यक्ति स्वराज्यात कधी आली? त्याचा संबध शिवाजी महाराजांशी परत कधी आला (खरच आला का?) या सर्वांचा मागोवा आपण आता घेऊयात.

दि. ५ मार्च १६६६ रोजी पुरंदरच्या ठरल्या तहानुसार शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबास भेटावयास गेले. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा आढावा आपण सविस्तर प्रकरणामधे घेतलेलाच आहे. शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे असणाऱ्या काही साथीदारांची नावे आपल्याला मिळतात पण प्रकर्षाने मराठी, राजस्थानी, मुघल सहित्यामध्ये मदारी मेहतर हे नाव आढळत नाही. याचा खल करताना याची सुरवात नक्की कधी झाली हे पहावे लागेल.
ऐतिहासिक अस्सल संदर्भांची छाननी केली असता मदारी असे नाव असणारा एक व्यक्ति होता ही माहितीच मुळात मिळत नाही. या संबधीचा पहीला उल्लेख आपणास मिळतो तो भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासीक वर्ष १९१७ यात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखामधे एक पत्र आणि एक हकीक़त दिली आहे. सदर हकीकत सातारा येथील राजोपाध्ये घराण्यातील कागदपत्रात मिळाली आहे. पण ही हकीकत
कुणी आणि कधी लिहिली आहे याबद्दल माहिती मिळत नाही.
सदर हकिकतीचा अभ्यास केल्यानंतर काय माहिती मिळते ती पाहुया.
१) शिवाजी महाराजांवर मिर्ज़ा जयसिंग राजे व दिलेरखान चालून आले.
२) त्याच्या (मिर्ज़ा जयसिंग) सांगण्यावरून महाराज दिल्लीस गेले.
३) पातशाहची भेट घेऊन त्याने महाराजांना अटकेत ठेवले.
४) महाराजांनी हीरोजीला विचारले – ‘ये समई संकट पडले तर माजे जीवाचे सारथी कोन कोन आहेत ?’
हे उल्लेख वाचल्यानंतर शंकेला पहिली जागा इथेच निर्मांण होते कारण ५ मार्च १६६६ रोजी शिवाजी महाराज राजगडावरून निघाले आणि आग्र्यास ११ मे १६६६ रोजी पोहचले. भेटीच्या प्रसंगानंतर महाराजांना कैद झाली. ३ महिन्याच्या कालानंतर १७ ऑगस्ट १६६६
रोजी महाराज आग्र्याहून निसटले. या सर्व ३ महिन्याच्या कालावधीमध्ये कैदेत असताना महाराजांनी आपल्या सोबत असणारे सर्व सरदार (ठराविक सोडून) पुन्हा स्वराज्यात पाठवले, हे इतर पुराव्यानिशी आपल्याला समजते. जर असे पाऊल शिवाजी महाराजांनी उचलले असेल तर त्यांनी हीरोजी फर्जंद यास विचारलेला प्रश्न – माझे सारथ्य कोण करील? हा प्रश्नच गैरलागु होत नाही का ?
महाराजांच्या वरील मुद्द्यास उत्तर देताना हीरोजी म्हणतो ‘साहेब जे समयी आदन्या करेल ते समयीं हीरोजी फर्जंद व मेदारी मेहतर फरास हजर होउं’
यानंतर हकिकतीत येणारा जो उल्लेख आहे तिथे
दूसरी शंका उपस्थित होते. तो उल्लेख काय आहे ते
आपण पाहुया.
“…हीरोजी महाराजांच्या जागी निजला होता. बाहेरील
दरोग्याने आत विचारले (मदारिस) महाराज काय करितात यावर त्याला मदारिने उत्तर दिले राजियाचे जीवास समाधान वाटत नाही. थोड्या वेळाने दरोगा मंडळी आत आली, त्यांनी हीरोजीच्या तोंडावर असलेला पदर काढला तो महाराज नव्हे हीरोजी निघाला. मग त्यास आणि मदारिस पकडून औरंगजेबासमोर नेले. मग औरंगजेबाने हीरोजीस विचारले महाराज़ कुठे आहेत? हीरोजीने ते आपल्या देशी गेल्याचे सांगितले. यावर औरंगजेबाने हीरोजीची गर्दन मारण्याचा हुकुम
केला (शिक्षा फ़क्त हीरोजीस मदारिस काहीच नाही?) यावर हीरोजी औरंगजेबास म्हणाला सुखरूप शिरच्छेद करावा हा जीव महाराजांवर ओवाळून टाकला आहे. याहून हास्यास्पद उल्लेख तर पुढें आहे – औरंगजेब हीरोजीस म्हणाला ‘तु इमानी चाकर आहेस मी मेहरबान झालो आहे माग तूला काय मागायचे?’
यावर हीरोजी औरंगजेबास म्हणतो – ‘मदारिस आणि मला सोडून द्यावे’, आणि औरंगजेबाने दोघांना सोडून दिले (कोण विश्वास ठेवेल ह्यावर?) सर्वात महत्वाचे म्हणजे हीरोजी पकडले गेले ही नवीनच माहीती अभ्यासकांना मिळते ह्या दिव्य साधनातून!!!
इतिहास साक्षीदार आहे शिवाजी महाराजांनी ज़ी फजिती औरंगजेबाची केली त्याची सल त्याच्या मनात कायमची राहिली. महाराज निसटले ही बातमी समजताच फौलादख़ान याने शोध मोहीम सुरु केलीँ. यात पकडले गेलेले रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, कविंद्र परमानंद यांचे उल्लेख
आपल्यालाला अस्सल साधनांमधे मिळतात, पण हीरोजी पकडले गेले असा उल्लेख कुठेच मिळत नाही. त्यामुळे हि हकीकत किती विश्वासहार्य आहे हे वाचकानींच ठरवावे.
याच हकीकतिची विश्वासहर्ता अजुन डळमळीत होते
ती पुढील उल्लेखावरून -
“…दोघेजण (हीरोजी आणि मदारी) काही दिवसांनी रायगडास आले. (रायगड ?? महाराज राजगडास परत आले याची नोंद जेधे शकावली मध्ये आहे) यानंतर या हकीकतीमध्ये हीरोजीला रायगडाची किल्लेदारी दिल्याचा उल्लेख आहे (हे कसे काय शक्य आहे?? स्वत: शिवाजी महाराजांचे वास्तव्य रायगडास १६७२ पासून होते तर
हीरोजीला किल्लेदारी देण्याचा प्रश्नच येतो कुठे??) नंतर मदारीस पण पोषाख वस्त्रे आणि हक्क वंश परंपरा करून दिला (म्हणजे काय दिले? वतन दिले? जमीन दिली?) पण कुठे? याची काही माहिती मिळत नाही. याउपर
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांसोबत
मदारीचा मुलगा सादुल्ला होता असे म्हटले आहे (मग
मदारीचा मृत्यु कसा झाला? कुठे झाला? तो आग्र्यावरून त्याच्या कुटुंबासोबत महाराष्ट्रात आला होता का? त्याचा मुलगा सादुल्ला खरोखर होता तर आज पर्यँत संभाजी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रामधे या सादुल्लाचा साधा नाममात्र उल्लेख देखील नाही. याला काय म्हणावे?)
वरील सर्व उल्लेखामधील माहितीचा घटनाक्रम पाहता कित्येक मुद्दे हे विश्वासनीय नाहीत. कुठलाच संदर्भ जुळत नाही, यावरून ही हकीकत कशी विश्वासनीय मानावी हा एक मोठा गहन प्रश्न आहे.

कल्याणदास आणि परकालदास यांचा पत्रसारसंग्रह हा अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. (Shivaji Visit To Aurangjib At Agra) असे या पुस्तकाचे नाव आहे. या अस्सल संदर्भात देखील मदारी मेहतर असे नाव मिळत नाही. या संबधीचा अभ्यास करत असताना काही शिवचरित्रामध्ये (कादंबरी नव्हे) कल्याणदास आणि परकालदास यांच्या पत्रांचा संदर्भ आहे असे निदर्शनास आले. संबधित पत्र तपासले असता त्यामधे देखील मदारी मेहतर हे नाव मिळाले नाही. संबधित पत्राचा संदर्भ – Shivaji Visit To Aurangjib At Agra – Letter no – 33 असा दिलेला आहे.
वरील सर्व मुद्दे हे उपलब्ध पुराव्यांवर झालें.
आता वर्षानुवषॅ चालत आलेली दंतकथा पाहुयात- यामधे अग्रक्रमांक लागतो तो म्हणजे सद्यस्थितीमध्ये रायगड किल्ल्यावर महाद्वाराजवळ एक ठिकाण दाखवले जाते त्यास मशिद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे म्हटले जाते त्याचा. मुळत:च हे ठिकाण कधी निर्माण झालें
याबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही सांगितलेले नाही.
शिवाजी महाराजांना धर्म निरपेक्ष (Secular) दाखवताना काही मंडळी सूचकपणे मदारी मेहतरच्या स्मरणार्थ मशिद मोर्चा बांधला असे सांगतात. हा मुद्दा जरी तात्विक दृष्टया मान्य केला तर मग वरती म्हटल्या प्रमाणे मदारीचा मृत्यू कधी झाला? आणि महाराजांनी त्याच्या स्मरणार्थ बांधला असेल तर मग मदारीचा मृत्यु हा १६८० च्या अगोदर ( महाराजांच्या निधनाआधी) झाला का? याचे उत्तर कोण देणार?
स्वराज्याचे बांधकाम व्यवस्थापक हीरोजी इंदुलकर
यांना शिवाजी महाराजांनी हे बांधकाम करण्याचे आदेश
दिले होते का? राज्याभिषेकवेळी असणारे रायगडाचे वर्णन उपलब्ध आहे त्यात पण असे काही ठिकाण होते असा उल्लेख मिळत नाही.
शिवचरित्राच्या सर्वात जवळचा असणारा संदर्भ म्हणजे ‘सभासद बखर‘ यामधे आलेला उल्लेख पाहुया -
‘आपला साज सर्व उतरून हीरोजी फरजंद यास घालून
आपले पलंगावरी निजवले, हात मात्र उघडा बाहेर दिसू
दीला आणि शेला पांघरला व एक पोरगा रगङावयास
ठेवला.’ - इथे उल्लेख एक पोरगा असा केला आहे.
कृष्णाजी अनंत सभासद हे स्वतः राजीभिषेकावेळी हजर होते. जर असे मशीद/मदारी मेहतर मोर्चा नामक कपोलकल्पित ठिकाण तेथे असेल, तर त्यांनी त्याचा उल्लेख नक्की केला नसता?
मदारी मेहतर या नावाचा कुठलाही अस्सल पुरावा हा मराठी साधनांत तर सोडाच पण मुघल – राजस्थानी साधनांमधे देखील मिळत नाही.याची दूसरी बाजु जर आपण पाहिली तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ ते १७३३ या काळा पर्यंत रायगडावर यावनी राज्य होते.
या काळामधे अशी काही ठिकाण रायगडावर अस्तित्वात आली का यांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरेल.
सारांश मदारी मेहतर असे नाव असणारा एक इसम होता हे दाखवणारे एकही समकालीन साधन उपलब्ध नाही . एकंदरच मदारी मेहतर हे प्रकरण इतिहासात दंतकथा कश्या निर्माण केल्या जातात ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे!!!
|| लेखन सीमा ||

विशाल खुळे – marathahistory.com |
Email : padmadurg@gmail.com

www.dasbodh.com

टीप- प्रस्तुत लेखात तत्कालिन ऐतिहासिक साधनांचा उल्लेख आणि संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे तथाकथित "खर्या इतिहासकारांनी" तोंड उघडण्याआधी गृहपाठ करावा... अपमान झाल्यास संचालक जबाबदार नाहीत.

बुधवार, १२ मार्च, २०१४

समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिले

शिवराय गेले...आणि संभाजीराजे स्वराज्याचे छत्रपती झाले...

समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिले, ते सर्वांना माहित आहे...

शिवरायांचे आठवावे रूप।
शिवरायांचा आठवावा प्रताप...

या पत्रातील शेवटच्या ओळी अपार महत्वाच्या आहेत!

"याहुनी करावे विशेष ।
तरीच म्हणवावे पुरुष ।
याऊपरी आता विशेष ।
काय लिहावे॥"

अर्थात, शिवरायांहून विशेष पराक्रम गाजवून दाखवाल तरच तुम्ही खरे!
काय पोटतिडकीचा संदेश आहे पहा!

संभाजी महाराजांनी हा संदेश मनावर घेतला असेल का हो? इतिहासात याचे उत्तर सापडते!

छत्रपती शिवरायांना एकुण ३५ वर्षांचे सामरिक आयुष्य लाभले...(युद्ध केलेला काळ), या काळात त्यांनी सुमारे २३० लढाया केल्या...त्यात ७ वेळा त्यांना पराभूतही व्हावे लागले...परंतु त्यांनी मोठ्या चातुर्याने नेहेमी एका वेळी एकच शत्रू अंगावर घेतला!

या उलट शंभुराजांना केवळ ९ वर्षात १३० युद्धे करावी लागली...व शत्रू आता सावध झालेला असल्याने सर्वजण मिळुन हिंदवी स्वराज्यावर तुटून पडले होते!डच,फ़्रेंच,पोर्तुगीज,इंग्रज,हबशी,निजामशाह,आदिलशाह,कुतुबशाह,बरीदशाह,इमादशाह,मुघल असे सर्वजण एकदम महाराजांवर तुटून पडले व या सर्वांना दाताडावर आपटवून संभाजी महाराजांनी १३० च्या १३० लढायांत विजय संपादन केला!!!!
काय तोडीचा योद्धा असेल हा!!!
शेवटी शत्रूला कळाले की हा गडी समरांगणात आटोपत नाही! यांना धरावयास केवळ कपटनीतीच करावी लागेल! फ़ंदफ़ितुरीशिवाय हे शक्य नाही!
आणि तेच करीत, राजांच्या सख्या मेहुण्यास फ़ितवून (गणोजी शिर्के), मुकर्रबखानाने हा डाव साधला...शंभुराजांबद्दल,त्यांचा समकालीन एक अरब लेखक, व औरंग्याचा चरित्रलेखक, खफ़ीखान त्याच्या "बादशाही-इ-आलमगिरी" या ग्रंथात म्हणतो,
"संभुजी कपटीपणात, क्रूरपणात,पराक्रमात आपल्या बापाहून दहापट अधीक भयानक आहे!"
आणि इथेच सिद्ध होते की "याहुनी करावे विशेष" या शब्दांना काय वजन महाराज देतहोते!

संभाजी महाराजांच्या बलिदानामुळेच पुढे मराठ्यांनी चवताळून उठत, ना सेना, ना सेनापती, ना राजा, ना राजधानी अशा अवस्थेत दिल्लीवरच काय तर अटकेपार भगवे झेंडे फ़डकविले!
हा इतिहास समाजाच्या लक्षात राहिला तर आपला देश उन्नत होईल, प्रखर होईल, प्रगत होईल..
जोवर संभाजीराजे हिंदूंच्या हृदयात जिवंत आहेत तोवर हिंदुस्थान जगाचा बाप आह!!!

www.dasbodh.com

संथ तुकाराम महाराज व संत रामदास स्वामी

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत वारकरी समाजात सर्वमान्य आहे. या प्रतीच्या प्रस्तावनेत सदानंद मोरे यांनी रामदासी संप्रदायाची यथेच्छ बदनामी केल्याने ब्रिगेड्यांनाही ती प्रत आवडणार! त्याच प्रतीतील जगद्गुरु तुकोबारायांचे काही अभंग (मुख्य ओळी) अभंग क्रमांकानुसार देत
आहे.सर्वांनीच लक्ष देऊन वाचा! व मग ठरवा तुकाराम महाराजांनी आज ब्रिगेडची काय अवस्था केली असती...तुकोबा व समर्थांमध्ये गुरुत्व व अन्य
विषय चघळणे म्हणाजे ब्रिगेडचा समर्थांसोबतच तुकोबांनाही संपविण्याचा हा हिरवा-निळा-पांढरा डाव आहे...

टीप: तुकाराम महाराज हे आम्हाला समर्थ रामदास स्वामींइतकेच वंद्य व पूज्य आहेत...आज हे दोघे जिवंत असते तर त्यांनी एकत्र येऊन ब्रिगेडींचा समाचार घेतला असता..सुदैवाने दोघे वाङ्मय रूपाने जिवंत आहेत! दासबोध आणी गाथा वाचून, सखोल अभ्यासून या कुत्र्यांना उत्तरे देऊन निरुत्तर करणे हेच ख-या वारक-याचे व धारक-याचे काम आहे!

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९७२:

नाम न वदे ज्याची वाचा । तो लेक दो बापांचा॥
हेची ओळख तयाची। खूण जाणा अभक्ताची॥
ज्याची विठठल नाही ठावा। त्याचा संग न करावा॥
नाम न म्हणॆ ज्याचे तोंड । तेचि चर्मकाचे कुंड ॥
तुका म्हणे त्याचे दिवशी । रांड गेली महारापाशी॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९७४

तुका म्हणे नाही जातीसवे काम। ज्याचे मुखी नाम तोची धन्य॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९६२

ऐका कलीचे हे फ़ळ। पुढे होईल ब्रह्मगोळ॥
चारी वर्ण अठरा याती। भोजन करिती एके पंक्ती॥
पुजिती असुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा॥
वामकवळ मार्जन । जन जाईल अधोपतन॥
तुका हरिभक्ती करी। शक्ती पाणी वाहे घरी॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९६३

अन्य जा्ती गुरुत्व करू लागल्याबद्दलचा व त्यांचे शिष्यत्व करणारांबद्दलचा राग-->

गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥1॥
पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ध्रु.॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥2॥
कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥3॥
नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥4॥
इंिद्रयांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥5॥
नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥6॥
तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥7॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २८७२ ते २८७५

चिंचवडचे गणेशभक्त संत श्री मोरया गोसावी यांची भेट घेतल्यावर त्यांनी
तुकोबांना आपल्याच ताटात जेवायला सांगितले त्या सर्व प्रसंगांचे वर्णन
करणारे अभंग...

2872. परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥1॥
न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥
पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी आह्मां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥3॥

2873
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥1॥
देव ह्मणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥2॥
तुका ह्मणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥3॥

2874
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥1॥
भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥2॥
कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका ह्मणे ॥3॥

2875
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥1॥
तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥3॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक २९४४

भिक्षा प्रशस्ती

इहलोकीं आह्मां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥1॥
निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥2॥
तुका ह्मणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥3॥

*******************************************
****** तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०४० ******
*******************************************

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥

कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥

मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥

जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥

*******************************************
*******************************************

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०५६

साधूसंतांना शरण न जाता रांडेकडे जाणा-यास तुकोबा शिव्या हासडतात.

साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥1॥
वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥2॥
तुका ह्मणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥3॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०५७

देवाब्राह्मणास शरण न जाणारा भाग्यहीन!!!

राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥
देवाब्राह्मणासी जाइना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें॥3॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥

**************************************
तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०६७
**************************************

संतांना नावे ठेवणा-या व त्यांचेवर संशोधन करणा-याच्या वीर्यात नक्की
भेसळ आहे! त्याला समाजापासून लांबच ठेवा!

संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥धृ.॥
भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥1॥
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥2॥
तुका ह्मणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥3॥

**********************************************

***********************************************
*****तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३२६२******
***********************************************
या अभंगात तुकोबारायांनी ब्रिगेडचेच वर्णन केले आहे असे वाटते!

संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान॑^ ॥1॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥2॥
तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥3॥

***********************************************
^ http://muslimbrigade.blogspot.in/p/blog-page_27.html
***********************************************

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३५५८

ब्राह्मणाला जो दक्षिणा देत नाही त्याच्या जिण्याचा धिक्कार असो, त्याला
वर्मच कळाले नाही.

दगडाच्या देवा बगाड नवस । बाइल कथेस जाऊं नेदी ॥1॥
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी॥ध्रु.॥
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥2॥
करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥3॥
तुका ह्मणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥4॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३५९८

हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे॥1॥
त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥2॥
तुका ह्मणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥3॥

तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३९४८

तुकोबाराय स्नानसंध्येला किती महत्व देतात पहा. ते न करणारा जन्मजातीचा जरी ब्राह्मण असला तरी त्यास ब्राह्मण मानू नये असे ते सांगताहेत.

जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥1॥
तो एक नांवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥
सांडुनियां शािळग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥2॥
नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥3॥
तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥4॥

***************************************
तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ४०१२

**************************************
तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ॥1॥
आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥
िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥2॥
श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥3॥
चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥4॥
म्हणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥5॥
ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥6॥
तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धी पाणी वाहे घरीं ॥7॥

****************************************
तुकाराम गाथा देहू संस्थान प्रत अभंग क्रमांक ३०२
****************************************
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥

****************************************

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

ब्रिगेडी शिवचरित्रकार

ब्रिगेडी शिवचरित्रकार (खेडेकर ,कोकाटे ,पव्या गायकवाड ,बांडगुळे आणि कंपनी) नेहमी सांगतात कि छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यात ४० टक्के मुस्लिम होते....
ठीक आहे...

महाराजांचे मृत्युसमयी त्यांच्या कडे सुमारे दोन लाख सैन्यदल होते (पायदळ, घोडदळ, आरमार, हेर सर्व एकत्र करून)...
आता याच्या ४०टक्के म्हणजे ८० हजार....
म्हणजे महाराजांच्या पदरी ८० हजार मुसलमान होते...
मला माहिती असलेले (खरे खोटे धरून) इथे नमूद करतो...

१.मदारी मेहतर(काल्पनिक पात्र तरी धरुयात)
२.दौलत खान
३.सिद्धी हिलाल
४. इब्राहीम खान इत्यादी...
मी काही प्रवीण गायकवाड सारखा इतिहास संशोधक नाही...त्यामुळे मला इतकीच नावे ठाऊक आहेत...आता उरलेल्या मुस्लिम सरदारांची नावे कृपया या ब्रिगेडी विचारवंतांनी जाहीर करावीत...
महाराजांच्या सरदारांवर असा अन्याय होणे बरोबर नाही...

८० हजार सोडा ८० नावे दिली तरी चालतील...

शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले हिंदू मावळ्यांची शेकडो नावे इतिहासाला माहिती आहेत....

आणि हजारो माहित नाहीत...
(त्यात तानाजी, बाजी पासलकर, शिवा काशीद, जीवा महाला, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, सूर्याजी काकडे, रामजी पांगारे,सावळ्या तांडेल, मोरोपंत, सोनोपंत, प्रल्हाद निराजी, निळोपंत, रामचंद्रपंत, हंबीर राव मोहिते, येसाजी कंक, मुरारबाजी, चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे, दादाजी कोंड देव (गुरु मार्गदर्शक काहीही माना अथवा नका मानू पण महाराजांच्या सोबत होते), संभाजी कावजी, नेताजी पालकर, माणकोजी दहातोंडे, गोदाजी जगताप, भीमा चोर, गुंड, विसाजी मुरम्बक, त्र्यंबक कोरडे, कवींद्र परमानंद, विठोजी आणि हैबतराव शिलिमकर, कान्होजी सर्जेराव आणि नागोजी जेधे, बालाजी आवजी, हिरोजी इंदलकर, बहिर्जी नाईक,हिरोजी फर्जंद, हरजीराव महाडिक, मरळ, घाटगे,माने,मारणे, दाभाडे, तुपे,बांदल, जाधवराव, घोरपडे, काटे, गायकवाड, शिर्के इत्यादी सरदार.....

माझे ज्ञान मर्यादित असल्याने अनेक नावे राहिली आहेत याचे भान मला आहे...
असो...
तरीही ही संख्या ४० च्या पुढे आहे...
याच्या पण ४० टक्के म्हणजे १६नावे जरी समजली तरी चालेल...

पराशर प्रकाशराव मोने
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (पुणे)

*टीप- या पोस्टशी निगडीत कॉमेंटच कराव्यात, याने हे केलं-त्याने ते केलं नाही अश्या लहान मुलांसारख्या तक्रार करणार्या कॉमेंट करून वेळ वाया घालवू नका!!!!

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

प्यार के दुष्मन : - ब्लडी शिवसैनिक

इंग्लंड कवी शेले म्हणाला होता की ’ तुमच्या देशातील तरुण पिढीच्या ओठावरचे शब्द काय आहेत ते सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’. हाच नियम जर आपल्या देशातील तरूणांना लावायचा झाला तर आपल्या देशातीत तरुणांच्या ओठावरचे शब्दच काय तर मने सुद्धा काहीशी ....."भिगे ओठ तेरे ..प्यासा दिल मेरा"..! अशाप्रकारची झालेली आहेत. मग विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे वास्तव पाहून शेले याने आपल्या देशाचे भवितव्य काय वर्तवले असते ? सध्या वेलेंटाईन डे च्या नावाखाली काहीही व्याभीचार केला तर चालतो अशाप्रकारचे काहीतरी अभद्र समिकरण बानले आहे.

: प्रेम म्हणजे काय :
सध्या आपल्या तरूण तरूणींचे एकमेकांबद्दल प्रेम अक्षरश: उतू चालले आहे की काय असे वाटू लागते. पण शेवटी एक साधा प्रश्न मनामध्ये उभा राहतो की हे प्रेम, प्रेम म्हणतात ते नेमके काय आहे ? वास्तविक सांगायचे झाले तर आज ज्याला ’प्रेम’ म्हणुन वाट्टेल ते करण्याची पद्धत रुढ झालेली अहे ते प्रेम म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसुन ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण’ होय ! याच अकर्षणाला ’प्रेम’ असे गोजीरवाने नाव देवून व्याभीचाराला चालना देण्याचे प्रकार चालू आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर व्याभीचार हा प्रेमाचे कातडे पांघरुन पसरतो आहे .. अगदी वृत्तपत्रे, दुरदर्शन, रेडीऒ यांसारख्या प्रसारमाध्यमांमधून सुद्धा . आजचा(१४ फेब्रुवारी) पेपर उघडा . आज एक विशेष पान छापले गेले असेल त्यात काय आहे ? टिव्ही लावा ..एखादे गाणे लागले असेल त्या गाण्याचे बोल ऐका त्यात काय आढळते ? रेडीऒ ऑन करा एखादे गाणे लगले असेल अथवा एखादा आर.जे. काहीतरी बोलत असेल त्याचा बोलन्याकडे लक्ष द्या काय निष्पन्न होते ..... ? शेवटी फिरुन पिरून आपण ’प्रेम’ अर्थात ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण’ या प्रकाराला चालना देणारी माध्यमांकडेच जातो. परकिय़ांचे पाहून आपण त्यांच्या प्रमाणे मदर्स डे व फादर्स डे साजर करु लागलो व त्यातुनच एक दिवस फक्त आई वडीलांना म्हणजे जे काही आई वडिलांसाठी करायचे आहे ते फक्त याच दिवशी करायचे व उरलेल्या दिवशी त्यांना विचारायचेही नाही साधारण अशाप्रकारची मनोववृत्ती आपली बनत गेली. मग आम्ही याच्याही पुढे गेलो, मदर्श डे व फादर्स डे बरोबरच रोझ डे साजरा करु लागलो अर्थात तेही पाश्चात्यंचे शिकून, यादिवशी आम्ही आमच्या प्रिय व्यक्तींना गुलाबाची फूले देण्यास शिकलो थोडक्यात व्याभीचाराची एक पायरी गाठली. याने समाधान झाले नाही म्हणुन आम्ही फ्रेंडशीप डे ही साजरा करायला लागलो, एकमेकांच्या हातामध्ये रंगीबेरंगी बॅंड्स बांधून आम्ही आपले मित्रप्रेम (मैत्रीणप्रेम सुद्धा) व्यक्त करु लागलो , आत आम्ही याच्याही पुढे गेलो आहोत आम्ही वेलेंटाईन डे म्हणजे प्रेम दिवस व आपल्या भाषेत ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण दिवस’ सुद्धा साजरा करायला लागलो. या दिवशी आमचे तरूण तरुणी एकमेकांजवळ आपले ’प्रेम’ व्यक्त करु लागले. आत याच्याही पुढे जायचे म्हटले तर रेप डे व सेक्स डे तेवढा शिल्लक राहीला आहे . काही दिवसात आम्ही तो सुद्धा टप्पा गठण्यात यशस्वी होऊ यत शंक वाटत नाही.

शिवसैनिकांना सध्या ’प्यार के दुश्मन’ असे म्हटले जाते कारण ते वेलेंटाईन डे ला विरोध करतात अर्थात ते प्रेम दिवसाला विरोध करतात म्हणजेच ते प्रेमाला विरोध करतात असा समज हे ’प्रेम’विर तरुण-तरुणिंचा आहे. एकमेकांपाशी प्रेम व्यक्त करुन आपणच काय ते प्रेम करतो व हे शिवसैनीक या प्रेमाला विरोध करतात हे प्रेमाचे शत्रू.. प्यार के दुश्मन ..ये क्या जाने प्यार क्या होता है ! बंदर क्या जाने अंगूर का स्वाद, ब्लडी शिवसैनिक्स, लाज कशी नाही वाटत यांना प्रेमासारख्या पवित्र नात्याला विरोध करायला , अशाप्रकारची वाक्ये शिवसैनीकांना नविन नाहीत .. थोडक्यात सांगायचे झाले तर आमच्या शिवसैनिकांना अशाप्रकारच्या वाक्यांची सवय झालेली असते . म्हणे काय तर ’प्यार के दुश्मन ..ये क्या जाने प्यार क्या होता है !’ बरोबर आहे !आमच्या शिवसैनिकांना तुमचे हे असले व्याभीचारी प्रेम कधीच क्कळणार नाही , कारण ते प्रेम करतात ते आपल्या मातृभूमिवर , ते प्रेम करतात छत्रपती शिवरायांवर, ते प्रेम करतात बाळासाहेबांवर, महाराष्ट्रावर, देशावर व शेवटी आपल्या धर्मावर त्यांचे प्रेम नि:स्वार्थ आहे अशा निस्वर्थ प्रेम करणार्‍यांना तुमचे ’समवयीन भिन्नलिंगी आकर्षण युक्त व्याभीचार युक्त "प्रेम" कधीच कळणार नाही . कोण्या एका वेलेंटाईन का कोण त्याने कोठे तरी दोन प्रेमविरांना एकत्र आणले म्हणून त्याच्या नावाने या मातीशी काडीचाही संबंध् नसताना आमचे प्रेमविर तरून त्याच्या नावाचा दिवस येथे साजरा करतात. पण या मातृभूमीवर प्रेम करणारे आमचे शिवसैनिक या मातीशी कसलाही संबंध नसनार्‍या वेलेंटाईनच्या नावाचा उदो-उदो कसा काय सहन करुन घेतील ? या देशात जयजयकार होईल तो फक्त शिवरायांचा....महाराणा प्रतापांचा....तुकोबारायांचा....रामदासांचा....संभाजी महाराजांचा....बाळासाहेबांचा ! ना की फॉरेन हून इम्पोर्ट केलेया फडतूस वेलेंटाईन चा !

या वेलेंटाईन ला पाश्चात्य देशात संत म्हणतात म्हणे ! काय केले म्हणे त्याने तर दोन प्रेम करणार्‍यांना एकत्र आणले वगैरे अशा व्यक्तीला पाश्चात्य देशात संत पूजले जाते . बरोबर आहे संतांचा आभाव असलेले व व्याभिचारासाठी आसुसलेल्या देशांमध्ये वेलेंटाईन जर संत ठरत असेल तर आश्चर्य वाटायला नको.... आश्चर्य तर या गोष्टीचे वाटते की जी भूमी देवांची माणले जाते.... ग्रीक लोक आजही भारतभूमीला ’देवभूमि’ माणतात, आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमि मानले जाते .... अशा भूमी मध्ये सुद्धा वेलेंटाईन सारख्या सोम्या-गोम्याला त्याचे संत पद मान्य करुन त्याच्या नावाचा दिवस साजरा केला जातो ?

प.पू. साध्वि रितंभरा यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ’आज आपले आंगण, प्रांगण, धरा, आकाश, सर्वच प्रदुषीत झालेले आहे, मग ते प्रदुषण ग्लोबल वॉर्मिंग सारखे असो अथवा वैचारीक असो.’ योगवादी संस्कृतीचा र्‍हास होऊन भोगवादी संस्कृती जम धरत आहे अशा परिस्थितिमध्ये जर वेलेंटाईन सारखा दिवस साजरा होऊ शकत असेल तर नवल वाटायला नको. " दोन प्रेम करणार्‍यांच्यामध्ये येणारे हे कोण ? " , " एकमेकांची परवानगी असेल तर यांच्यामध्ये येणारे हे कोण ? " , "आमच्या आईवडील आम्हाला बोलत नाहीत तर आम्हाला विचारणारे हे कोण ?" साधारण अशाप्रकारचे पुचाट प्रश्न आमच्या शिवसैनिकांना विचारणारे अक्कलहुशार अपल्याला ठीकठिकाणी अढळतील आणि आपले बिचारे शिवसैनिक मात्र अशा प्रश्नांपुढे गोंधळून जातात. दोन प्रेम करणार्‍यांच्यामध्ये येणारे हे कोण (?) अरे ..! तुम्ही दोघे प्रेम करता ना ? मग तुमचे हे प्रेम तुमच्यापर्यंतच राहूद्या ना ! तुम्ही तुमचे हे ’व्याभीचारी’ प्रेम घेवून शिवरायांच्या गडकोटांवर व पवित्र मंदिरांमध्ये कशासाठी येता ? असा खणखणीत प्रतिप्रश्न आपल्या शिवसैनिकांनी केला पाहीजे ! अरे .. ! तुमचे एकमेकांवर ईतकेच प्रेम असेल ना तर ते दोघांपैकी एकाच्या घरी जावून उतू जावूद्या ना ! ते उतू घालवण्यासाठी तुम्ही आमची पवित्र मंदीरे व छत्रपति शिवरायांच्या आणि मर्द मावळ्यांच्या पुण्यस्पर्शाने पावण झालेल्या गडकोट का निवडता याचे उत्तर आम्हाला ’दोन प्रेम करनार्‍यांच्यामध्ये येणारे तुम्ही कोण’ असा प्रश्न विचारणारा एखादा तरी अक्कल हुशार देवू शकेल काय ?

गडकोट ज्याच्याशिवाय शिवरायांनी उभ्या आयुष्यात दुसर्‍या कशाचाही विचार केला नाही तिच शिवतिर्थे आज पोरी फिरवण्याची आणि दारू पिण्याची अड्डी बनली आहेत . परकिय ’संत’ वेलेंटाईनच्या नावाखाली गडकोट-आणि मंदिरे यांच्या सान्निध्यात चाललेला व्याभीचार शिवरायांवर प्रेम करणारा कोणता शिवप्रेमी, शिवरायांचा सैनिक म्हणवून घेणारा कोणता शिवसैनिक, आणि या मातृभूमीवर नितांत प्रेम करणारा कोणता सच्चा निष्ठावंत खपवून घेईल ?? ज्या शिवरायांवर आमचे शिवभक्त प्राणापेक्षाही अधीक प्रेम करतात, त्याच शिवरायांच्या समाघीखाली, तानाजी मालूसरेंच्या सिंहगडाकाली चाललेले असले प्रेमाचे चाळे कोणता शिवभक्त खपवून घेईल या प्रश्नाचे उत्तर आम्हाला ’दोन प्रेम करणार्‍यांच्यामध्ये येणारे हे कोण ? असा प्रश्न विचारणार्‍यांना द्यावा लागेल !

तुम्हाला तुमचे जे काही प्रेमाचे पर्यायाने व्याभीचाराचे चाळे करायचे असतील ते आपापल्या घरी जावून करावेत, आमचे काहीच म्हणने नाही , परंतु वेलेंटाईन डे च्या नावाने जर का तुमची पाऊले पन्हाळगडावर, रायगडावर, राजगडावर वळू लागलीत तर ती पाहूले मुळापासून उखडण्याची जबाबदारी आमच्या शिवसैनिकांची असेल !

- सुरज महाजन

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने.........

ख्रिस्ती वर्चस्व वाढण्याच्या काळात हीदन आणि पेगन (मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक) लोकांना हालहाल करून ठार करण्यात आले वा बाटविण्यात आले.
इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. त्या काळात क्लॉडियस दुसरा हा राजा होता.रोमन साम्राज्यात गृहयुद्धे व बाहेरील आक्रमणे चालू होती. नित्य युद्धमान असलेल्या त्या देशाला तरुणांची सैन्यात भरती होण्याची आवश्यकता वाटू लागली. प्रेम आणि लग्न या दोन गोष्टी यात बाधा आणू शकतात असा विचार करून राजाने लग्नांवर काही काळ बंदी घातली. राजाविरुद्ध जनमत एकवटावे म्हणून व्हॅलेंटाईन आणि मेरियस यांनी पुढाकार घेऊन बंदी झुगारून लग्ने लावण्याचा धडाका लावला. हे दोघेही ख्रिस्ती धर्मप्रचारक होते. त्यांचे कृत्य म्हणजे राजद्रोह होता. राजाने त्यांना पकडले. शिरच्छेदाची शिक्षा सुनावली असूनही या व्हॅलेंटाईनने तुरुंगातही प्रेम केले. त्याने तुरुंगाधिकार्याच्या मुलीला आपल्या नादी लावले. मरणापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने म्हणे 'लव्ह फ्रॉम युवर व्हॅलेंटाईन' असे लिहिले होते.
१४ फेब्रुवारी २७० मध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला. हा दिवसही नक्की नाही. तो जाणीवपूर्वक पेरण्यात आला, कारण हा दिवस म्हणजे रोमन देव-देवतांच्या ज्युनो नामक राणीचा गौरव दिवस होय. तोच या आक्रमकांनी 'व्हॅलेंटाईन डे' ठरवून पुढे रोमन मूर्तींचा विध्वंस केला.
राजद्रोह करणाऱ्याच्या नावाने आपण हा दिवस साजरा करावा काय? पाश्चात्यांच्या वैचारिक आक्रमणामुळे असे 'दिवस' साजरे करण्याचे फॅड आपल्याकडे बोकाळले आहे.त्यातूनही महाविद्यालयीन जीवनात गम्मत म्हणून 'प्रेमदिवस' साजरा करायचा असेल तर 'रुक्मिणी डे' साजरा करा. माघ शु.दशमीला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह दिवस असतो तेव्हा साजरा करा. जगाला ज्ञात असलेला पहिला प्रेमसंदेश रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पाठवला. त्या गोष्टीला साडेपाच हजार वर्षांचा दिव्य इतिहास आहे. हे प्रेम राजद्रोह,बंडाळी वा अन्यांचे गळे घोटून केले गेले नव्हते.उदाहरणच हवे असले तर ते असे उदात्त आणि आदर्शवत हवे.
रुक्मिणीने तिचा विवाह शिशुपालासमवेत ठरला आहे हे कळताच सुदेवाबरोबर संदेश धाडला. भागवतातील ५२ व्या अध्यायात श्लोक क्र.३७ ते ४३ यात तो आहे. सामराजाने यावर 'रुक्मिणीहरण'ही पद्यरचना केली आहे.
यात रुक्मिणी म्हणते-
या कारणे नियत म्यां वरिलासे भावे|
येऊनिया त्वरित मज आजिन्यावे||
हा लागला जिव असे तुजवीण जाया|
तू आपुली हरि करी मज आजि जाया||९४|| सर्ग-५

हे संपूर्ण काव्य रोचक आहे. श्रीकृष्णान्सारख्या नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयासक्त, सामर्थ्यवान, ज्ञानी, पराक्रमी वीरावर तिचे मन जडले आहे हे लक्षात घ्या. प्रेम असे असावे. तारुण्यातील प्रेममस्ती म्हणजे बहुतेक वेळा वासनेचा धिंगाणा असतो. त्याला हे असे 'डे' साथ देतात.तेव्हा राजद्रोही व्हॅलेंटाईनचे नाव टाका आणि उत्तुंग प्रेमाविष्काराच्या रुक्मिणीच्या नावाला पुढे न्या.युवाशक्तीने पुढाकार घेतला तर काही काळात हा 'डे' जगभर साजरा होऊ शकेल.

(राष्ट्रजागर - डॉ.सच्चिदानंद शेवडे - पृ.१५६-१५७, तृतीय आवृत्ती, गार्गीज प्रकाशन - वसई)
-Dr-Deepak Gokhale

ब्रिगेडी लेखकांना खोटारडे का म्हटले जाते ?


१) शिवरायांचा मूळ इतिहास हा जास्तीत जास्त फारसी,उर्दू,मोडी भाषेत आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रिगेडी इतिहासकाराला(?) मूळ इतिहासाचे आकलन होऊ शकत नाही.कारण त्यांना ह्या भाषा अवगत नाही.
२) ‘समर्थ रामदास,दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे हेर होते’,असे अनेक ब्रिगेडी लेखक लिहितात..पण वस्तुतः ह्या दाव्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ अथवा पत्रव्यवहार उपलब्ध नाही.
३) ‘शिवरायांच्या सैन्यात ४०%-५०% मुस्लीम होते’, हि तर निव्वळ थाप आहे. सैन्य असल्याचे इतिहासात आढळत नाही.
४) समर्थ-शिवराय भेट कधी घडलीच नाही , अशी बोंब मारतात. पण दिवाकर गोसावींचे ऐतिहासिक पत्रव्यवहार,‘चित्रगुप्ता’ची जी बखर, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’ , ‘शिवप्रताप’, ‘शिवदिग्विजय’, ‘मराठी साम्राज्याची छोटी बखर’ इत्यादी ऐतिहासिक ग्रंथांमध्ये समर्थ-शिवराय भेटीचे संदर्भ आहेत , हे सांगायला सगळे ब्रिगेडी जाणीवपूर्वक विसरतात.
५) ‘समर्थ रामदासांनीच देहूतील ब्राह्मणांकरवी तुकाराम महाराजांचा खून केला’, ह्या धादांत असत्याला आजतागायत कुठलाही पुरावा मिळालेला नाही .
६) ‘शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज,शाहू महाराज,नामदेव महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांचा खून ब्राह्मणांनी केला’, अश्या ब्रिगेडी अफवांना सुद्धा कुठलाही पुरावा नाही...अथवा असा कुठलाही इतिहासात कागद सापडत नाही.
७) ‘शिवरायांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी सगळ्या ब्राह्मण मंत्र्यांना ठार केले’, हा तर कोकाटेफेम विनोद आहे. ह्या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.

ब्रिगेडी,मूळनिवश्यांना आवाहन- तुम्ही जर ब्रिगेडी लिखित इतिहासाशी सहमत असाल,तर आम्हाला ऐतिहासिक पुरावे,संदर्भ,दस्तावेज दाखवा.

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०१४

शिवराय


जयतु जयतु हिंदुराष्ट्रम


लक्ष देउन वाचा....सध्या एक व्हिडीयो फिरतोय त्यातील प्रश्नांची उत्तरे-

महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत.... आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल…
मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही...
आम्ही मराठा बंधुना समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट फाडले.... हे खरे आहे… पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर
कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही?
उत्तर-कारण,कृष्णा कुलकर्णी अफझलखानासोबत आलेला,म्लेंछबाधीत हिंदुसुध्दा मुसलमानाइतकेच घातक असतात.

⚪शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय?
उत्तर-होय होतात.तसे नसते तर प्रतिकुल परिस्थिती असताना अफझलखानाशी युध्द व अनुकुल परिस्थीती,सैन्य असुनदेखील मिर्झा राजांशी तह नसता केला.

⚪औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो…
उत्तर-जसे मुसलमान हिंदुंना सैन्यात घ्यायचे तसे राजेही.
शत्रुला शत्रुविरुध्द वापरणे म्हणजे सर्वधर्मसमभाव होत नसतो तो एक मुत्सद्दीपणा असतो.

⚪शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता?
इब्राहीम खान...
उत्तर-जर मुसलमान विरोधक नसते तर नेताजी पालकरांना परत हिंदु केलेच नसते.मुसलमान काय नी हिंदु काय एकच म्हणाले असते.

⚪शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
दौलत खान…
उत्तर-याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली,त्या अगोदर राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होत!!े

⚪शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता?
सिद्दी हिलाल...
उत्तर-हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी वाटेतच ठार केला.

⚪शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता?
नूर खान…
उत्तर-पहीले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.नुरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात.

⚪शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर…
उत्तर-येड्यांनो मेहतरी करणे म्हणजे भंगीकाम करणे.मदारी भंगी होता जातीने मुसलमान नव्हे.

⚪शिवाजी महाराजांचा एकमेव वकील?
काझी हैदर...
उत्तर-शिवप्रभुंचे वकील होते कृष्णाजी बोकील..खुप वकील होते.काझी हैदर हा निशानबारदार होता..म्हणजे पोस्टमन होता शत्रुचा.

⚪शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव?
मीर मोहम्मद...
उत्तर-याला 3 लक्ष होन दिले तेव्हा काढायला आला तो चित्र...कवी भुषणासारखे स्वयंस्फुर्त नाही आला होता.

आणि
⚪शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा?
रुस्तुमे जमाल...
उत्तर-वाघनखे खुद्द शिवरायांनी बनवलेले शस्त्र होय.याअगोदर वाघनखे हे हत्यार कोणीच नव्हते वापरले.
रुस्तुम जमाल हा हशबी, यांचा आणि लोहारकामाचा दुरवर संबंध नसतो.

⚪एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय?
उत्तर-वरील सर्व मुसलमान पात्रे ही फितुर झाली पुढच्या काऴात तर काही काल्पनिक..!

⚪शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा…
उत्तर -शिवरायांचे फक्त 10 अंगरक्षक होते.
1) तानाजी मालुसरे
2) सुर्याजी काकडे
3) जीवाजी महाले
4) संभाजी कोंढाऴकर
5) रामजी ढमारे
6) विसाजी खेचर
7) येसाजी कंक
8) गोदाजी जगदाप
9) शिवाजी जैधे
10) भिकाजी चोर
यात एकही मुसलमान नाही आहे.100 वेऴा बखरी तपासा

⚪शिवाजी महाराजांनी एक हि मशिद पाडली नाही. एकही कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे…
उत्तर-जिथे मंदीरे पाडुन मशिदी झाल्या त्या नक्कीच पाडुन तिथे मंदीरे बाधली.
जशास तसे उत्तर देणे म्हणजे जातीय वाद नव्हे.शत्रुला शत्रु म्हणणे गुन्हा नाही.

रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ??
उत्तर-रायगडवर कुठेही मशिदीचे अवशेष नाही.सर्व राजवाडे कोठारे भग्न स्थितीत आहेत.मशिद तर प्रार्थनास्थऴ.ते हवे होते ना ?
कुठेच कसे नाही.
उलट शेकडो मंदीरे अजुन सुस्थितीत आहेत.

⚪जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल …
आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ?
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर ….
आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण
बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर
उत्तर-आम्ही कबर नाही तर मदरसा पाडा म्हणतो.तिथल्या पिरजादेच्या अंगात अफजलखान येतो आणि म्हणतो शिवाजीने मुझे दगा दिया..हे चाऴे बंद करा म्हणतो.

⚪शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले ... जिजाऊनी विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले मासाहेब
अफझल खान मारला गेला … त्याचं प्रेत कुठ आहे ? …
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय म्हणाल्या जिजाऊ ?
शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला (मेला )
आता वैर हि संपले …
अन
तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही … त्याच्या प्रेताचे सन्मानाने
दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक
बांध …
शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर
बांधली ….
शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली …
ती तोडुन आपण शिवबाला चुकीचे ठरवणार आहोत का ?
उत्तर-मग अफझल्याचे धड प्रतापगडावर आणि मुंडी राजगडावर कोणी आणली ?
का हवेत उडत आली ती...!
आम्ही शत्रुचा कोथऴा काढुन मुंड्या कापुन ठेवतो.
हो,कोणीजर आमची मंदीरे फोडुन आयाबहीणींच्यावर बलात्कार करत असेल तर मुंडी कापणार आम्ही.
आणि ही विषारी प्रतीके असणारी कबरी जाऴुन फोडुन सत्व स्वाभिमानाचे पराक्रमाचे हिंदवी राज्य निर्माण करणार.
शांततेसाठी हाती शस्त्रच घ्यावे लागते

ll जय शिवाजी ll

कृपया चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका ही विनंती.!!!

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

छ. शिवरायांचे आलमगीर औरंगजेबास पत्र

आम्ही आपल्या परवानगीशिवाय [आग्र्‍याहून] परत आलो. हे करावे लागणे आमचे दुर्भाग्य. परंतु आम्ही हरप्रकारे आपली सेवा करण्यास यापुढेही कटिबद्ध आहोत. आपला हितेच्छू या नात्याने आम्हास काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्यावयाच्या आहेत.

आमच्या कानी असे आले आहे, की आमच्याबरोबर युद्ध करता करता आपले खजिनेही रिते होत चालले आहेत; आणि हा खर्च भरून काढण्यासाठी आपण हिंदूंवर जिझिया कर लादण्याचा निर्णय घेतला आहात.

सम्राट अकबर यांनी तुमच्या साम्राज्याची स्थापना केली आणि बावन्न वर्षे राज्य केले. ख्रिस्ती, यहूदी, मुसलमान, दादूपंथी [कबीरांचे शिष्य दादू (१५४४-१६०३) यांचे अनुयायी], Stargazers [म्हणजे कोण?!], malaki [म्हणजे सुद्धा कोण?!], नास्तिक [सेतू माधवराव पागडी यांनी Atheist शब्द वापरला आहे.  मूळ शब्द "काफ़िर" असू शकेल, ज्याचा आलमगीरकरता लौकिकार्थ "हिंदू" होतो], ब्राह्मण, जैन, वास्तविक सर्वच धर्म-पंथांना शांततेने आणि समानतेने वागविण्याची अत्यंत उत्कृष्ठ अशी नीती त्यांनी अंगीकारली होती. सर्वांचेच कल्याण आणि रक्षण हे त्यांचे ध्येय होते. म्हणूनच तर ते जगद्गुरू मानले गेले. आणि याचाच परिणाम म्हणून ते ज्या ज्या दिशेने गेले त्या त्या दिशेने त्यांच्याकडे सुयश आणि सुकीर्तीच त्यांना मिळाली. देशाचा जवळपास सर्व भूप्रदेश त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणला.

त्यांच्या नंतर नूर-उल-दीन जहांगीर यांनी बावीस वर्षे राज्य केले. अतिशय उत्तम कार्ये करून ते अमर झाले.

शाहजहान यांनी बत्तीस वर्षे राज्य केले. त्यांनीही उत्तम कार्याने आपले आयुष्य सुफल केले.

म्हणूनच हे राज्यकर्ते जिकडे जातील तिकडे त्यांना यश मिळत राहिले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक प्रदेश, गड-किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली आले. ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांची नावे आजही आपण घेतो आहोत. त्यांची महत्ता अवर्णनीय आहे. याचा एक दाखला हा देखील आहे की खुद्द आलमगीर त्यांचे अनुकरण करण्याचा निष्फल प्रयत्न करीत आहेत, आणि हे प्रयत्न निष्फल होण्याचे कारण त्यांना अद्याप समजले नाही.

या आपल्या पूर्वसूरींनी मनात आणले असते तर जिझिया कर लावण्याची क्षमता त्यांच्यातही निश्चितच होती. परंतु त्यांना जाणवले की सर्व लहानथोर व्यक्ती ही परमेश्वराचीच अपत्ये आहेत, आणि सर्व धर्म हे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची आराधना करण्याचे विविध मार्ग आहेत. धार्मिक द्वेष त्यांनी मनाला शिवू देखील दिला नाही. सर्व लहानथोर त्यांची स्तुती करतात, त्यांना दुवा देतात. त्यांच्या कारकीर्दीत लोकांना शांतता मिळत राहिली, ज्यामुळे त्यांची कीर्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत राहिली आणि प्रत्येक कार्यात त्यांना यश मिळत गेले.

परंतू आपल्या कारकीर्दीमध्ये कित्येक प्रांत आणि किल्ले आपल्या हातातून निसटून गेले. जे प्रांत आणि किल्ले शिल्लक आहेत ते देखील जातील अशी स्थिती आहे. फार कशाला, अगदी आम्ही स्वतः देखील या प्रांतांवर चाल करावयाला मागेपुढे पाहणार नाही! आपले मांडलिक ध्वस्त झाले आहेत.  परगणे आणि महालांमधून आपणाला मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस घटत चालले आहे. जेथे पूर्वी लाखांचे उत्पन्न यावे तेथून हजारांचेही उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. राजे आणि राजकुमारांनाही गरीबीच्या झळा पोहोचत आहेत. आपले सरदार आणि मन्सबदार देखील अडचणीत आल्याचे सर्वश्रृत आहे. सांप्रत आपले सैन्य असंतुष्ट आहे, मुसलमान त्रस्त आहेत, हिंदू दैन्य-दारिद्र्याच्या झळा सोसत आहेत. स्वतःच्या तोंडात मारून घेऊन त्यांची तोंडे आरक्त आहेत.

ते या दुःखाच्या गर्तेत आहेत, आणि तरीही आपण जिझिया लावला आहे. आपण हे कसे करू शकता? ही दुष्ट वार्ता पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या आपल्या साम्राज्यात वार्‍यासारखी पसरेल. नागरिक म्हणतील "हिंदुस्थानच्या सम्राटाने भिकेचा कटोरा हाती घेतला आहे, आणि तो ब्राह्मण, जैन, साधू, योगी, सन्यासी, बैरागी, गरीब आणि भुकेल्या लोकांमडून जिझिया वसूल करतो आहे. आणि हे करण्यात त्याला अभिमान वाटतो आहे. त्याने तैमूर खानदानाचे नाव धुळीला मिळवले." लोकांची ही अशी तीव्र प्रतिक्रिया येईल.

हुजूर, कुरआन मध्ये परमेश्वराचे वर्णन "रब-उल-अल-आमीन" म्हणजे विश्वाचा परमेश्वर असे केलेले आहे, "रब-उल-मुस्लिमीन" म्हणजे मुसलमानांचा परमेश्वर असे नव्हे. वस्तुतः इस्लाम आणि हिंदुत्व हे दोन्ही दैवी प्रेरणेच्या सुंदर निर्मिती आहेत. मशिदींमधून बांग दिली जाते तश्याच मंदिरांतून घंटा निनादित केल्या जातात. धर्मांध आणि धर्मद्वेष्टे हे परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करतात असे म्हणावे लागेल. त्या कलाकार असलेल्या परमेश्वराने काढलेल्या सुंदर चित्रावर रेघोट्या मारण्याचे हे मनसुबे त्या दैवी कलाकाराला दूषण आहे. [To presume to draw lines on these pictures is verily to lay blame on the Divine Artist (God).] एखाद्या निर्मितीतील दोष काढणे हे त्याच्या निर्मात्याचेच दोष काढणे आहे. तसे आपण करू नका.

सदसद्विवेकाच्या दृष्टीने पाहता जिझिया कोणत्याही आधारावर समर्थनीय नाही. हा केवळ भारतापुरता लावलेला "शोध" [जावईशोध] आहे. हा अन्याय आहे.

तरीही जर आपणास धार्मिक आणि न्यायिक आधारांवर जिझिया कर लावणे आवश्यक वाटत असेल, तर आपण सर्वप्रथम राजा राजसिंग यांचेकडून तो वसूल करून घ्यावा. कारण ते हिंदूंचे प्रमुख नेते आहेत. त्यानंतर या आपल्या हितेच्छूकडून तो वसूल करणे आपणास अवघड जाणार नाही.

संदर्भ: http://pakteahouse.net/2012/04/26/shivajis-letter-to-aurangzeb/

श्री परशुराम

परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही.
परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला.
परशुरामाने पित्याक़डून वेदविद्येचे ज्ञान मिळविले. त्यानंतर गंधमादन पर्वतावर जाऊन त्याने तप केले व शिवाला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्याला शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम हा धनुर्विद्येत विशेष निष्णात होता. एकदा चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले व रेणुकेचा वध करण्याची त्यांनी आपल्या पाच मुलांना आज्ञा केली. त्यांपैकी एकट्या परशुरामानेच पित्याची आज्ञा पाळली व आईचा शिरच्छेत केला. त्यामुळे जमदग्नी परशुरामावर संतुष्ट झाले व त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचाच वर मागितला. रेणुका पुन्हा जिंवत झाली.
अधम अशा क्षत्रियांचा वध : `वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन' न म्हणता `राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.'
कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.' या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.
क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.
तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर', असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
दानशूर : परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.
भूमीची नवनिर्मिती : जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.' यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र' ही संज्ञा आहे.
परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.
धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक : एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.
रामभार्गवेय याच्या नावावर ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ११० वे सूक्त आहे. परशुरामाचा अप्रत्यक्ष उल्लेख अथर्ववेदातही (५.१८,१९) आढळतो. परशुराम कल्पसूत्र नावाचा तंत्रशास्त्रावरील एक ग्रंथ त्याच्या नावावर आहे. ‘परशुरामशक’ नावाने केरळात एक कालगणनाही रूढ आहे. परशुरामाची क्षेत्रे भारतात ठिकठिकाणी आढळून येतात. स्यमंतपंचकतीर्थ, महेंद्र पर्वत, चिपळूण, माहूर (रेणुकेचे स्थान) इ. क्षेत्रे प्रसिद्ध आहेत.

परशुराम जयंतीला विदर्भातून वंजारी समाज मोठ्या संख्येने कोकणात
येतो.

शिवरात्रीला कोळी समाज दिंडी घेऊन परशुराम गावात येतो.

म्हणजे परशुराम हे दैवत केवळ एका जातीपुरता मर्यादित नाही !

भगवान परशुराम यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाभारतकालीन क्षत्रिय राजकुमारांना त्यांनी स्वत: धनुर्विद्या शिकविली.

याचाच अर्थ युद्धनीतीमध्ये शस्त्रास्त्रांचा वापर कसा करावा याचा प्राचीन काळातील पहिला विद्यागुरू म्हणून परशुरामांचेच महत्त्व असाधारण आहे.